Satyendra Kumar Jain Dainik Gomantak
देश

सत्येंद्र जैन यांच्या सहकाऱ्यांच्या घरावर छापा; कोट्यवधींची रोकड जप्त

अंमलबजावणी संचालनालय ने सात ठिकाणी हे छापे मारले आहेत.

दैनिक गोमन्तक

केजरीवाल सरकारमधील आरोग्य मंत्री सत्येंद्र जैन (Satyendra Kumar Jain) यांच्या अडचणी कमी होण्याचे नाव घेत नाहीत यातच आज ईडीने सत्येंद्र जैन सहकाऱ्यांच्या घरावर छापेमारी केली. यामध्ये ईडीच्या हाती कोट्यवधींची रोकड आणि दागिने लागले. अंमलबजावणी संचालनालय (ED) ने तब्बल सात ठिकाणी छापेमारी केली. यामध्ये प्रकाश ज्वेलर्सकडे 2.23 कोटींची रोकड सापडल्याचा दावा केला जात आहे. तर दुसरा सहकारी वैभव जैन याच्याकडे 41.5 लाख रोख 133 सोन्याची नाणी देखील मिळाली आहेत. तर जीएस मथारू यांच्याकडे 20 लाखांची रोकड सापडल्याचे सांगण्यात येत आहे. (Raids on the house of Health Minister Satyendra Jain colleagues Billions in cash confiscated)

दरम्यान, अंमलबजावणी संचालनालयाने (ED) मंगळवारी मनी लाँड्रिंग कायद्यांतर्गत ही छापेमारी केली आहे. हे छापे सत्येंद्र जैन-पूनम जैन आणि त्यांचे सहकारी तसेच या प्रकरणाशी प्रत्यक्ष-अप्रत्यक्षपणे संबंधित लोकांवर देखील टाकण्यात आले आहेत. यामध्ये प्रामुख्याने अंकुश जैन, वैभव जैन, नवीन जैन आणि सिद्धार्थ जैन यांचा देखील समावेश आहे.

दुसरीकडे, जीएस मथारू आणि अन्य काही जणांवरही ही EDने मोठी कारवाई केली आहे. झडतीदरम्यान विविध गुन्ह्यांचे दाखले आणि डिजिटल रेकॉर्ड जप्त करण्यात आले आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Crime News: माहेरी गेलेली बायको परत आली नाही, नैराश्यातून तीन पोरींचा जीव घेऊन स्वतःला संपवलं; सुधाकरनं ओलांडली 'क्रूरतेची सीमा'

PM Kisan Nidhi 23rd Installment: पीएम किसानचा 2,000 रुपयांचा हप्ता उद्या खात्यात! यादीत नाव नसल्यास पैसे अडकू शकतात, आत्ताच अशी करा पडताळणी

Goa Development: गोव्यासाठी दिल्लीतून सुटला तब्बल 2000 कोटींचा निधी! केंद्र आणि राज्य सरकार मिळून गोव्याचा चेहरामोहरा बदलणार; कामतांचा विश्वास

Goa Tourism: 'पर्यटनात विविधता, कुशल मनुष्यबळ निर्मितीवर सरकारचा भर', राज्यात 5 नवीन महाविद्यालयांची मुख्यमंत्र्यांकडून घोषणा

Goa Water Crisis: "गोव्यातील पाणीटंचाईला सावंत सरकारच जबाबदार", युरी आलेमाव यांचा हल्लाबोल

SCROLL FOR NEXT