PM Narendra Modi  Dainik Gomantak
देश

Diwali at Kargil: कारगिल येथे 'वंदे मातरम'चा नारा; पाहा पंतप्रधानांचे जवानांसोबत खास क्षण

जवानाने गायलेल्या वन्दे मातरम गीतासह मोदींनी धरला ठेका

गोमन्तक डिजिटल टीम

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दरवर्षीप्रमाणे दिवाळीचा सण भारतीय जवानांसोबत साजरा केला. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जवानांना मिठाई भरवली व दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या. यावेळी जवानांनी भारत माता की जय तसेच, वंदे मातरमच्या घोषणा दिल्या.

यावेळी लष्कराला संबोधित करताना पंतप्रधान मोदी म्हणाले, “आम्ही युद्ध हा पहिला पर्याय म्हणून कधीच पाहिलेला नाही… लंकेतील युद्ध असो किंवा कुरुक्षेत्र, आम्ही ते नेहमीच पुढे ढकलण्याचा प्रयत्न केला.

आम्ही युद्धाच्या विरोधात आहोत पण ताकदीशिवाय शांतता असू शकत नाही. जर कोणी आमच्याकडे वाईट नजरेने पाहण्याचे धाडस केले तर आमचे सैन्य दल चोख प्रत्युत्तर देईल. असे पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले.

कारगिलमध्ये आपल्या सेनेने दहशतवादाचा फणा ठेचला होता. देशात विजय हा दिवाळी सारखा साजरा करण्यात आला जो आजही लोकांच्या स्मरणात आहे.

यावेळी जवानांनी वंदे मातरम गीत गायले यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील सहभाग नोंदवत वंदे मातरम गीताचे बोल गायले. मोदींनी हा व्हिडिओ आपल्या सोशल मिडिया हँडलवरती शेअर केला असून, तो मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहे. तसेच, अनेकांनी हा व्हिडिओ शेअर करत पंतप्रधान मोदी आणि जवानांना दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

एखादे राष्ट्र तेव्हांच अमर होते, ज्यावेळेस त्या राष्ट्राची शूर पुत्रांना आणि मुलींना स्वतःच्या शक्तीवर पूर्ण विश्वास असतो.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Crime News: माहेरी गेलेली बायको परत आली नाही, नैराश्यातून तीन पोरींचा जीव घेऊन स्वतःला संपवलं; सुधाकरनं ओलांडली 'क्रूरतेची सीमा'

PM Kisan Nidhi 23rd Installment: पीएम किसानचा 2,000 रुपयांचा हप्ता उद्या खात्यात! यादीत नाव नसल्यास पैसे अडकू शकतात, आत्ताच अशी करा पडताळणी

Goa Development: गोव्यासाठी दिल्लीतून सुटला तब्बल 2000 कोटींचा निधी! केंद्र आणि राज्य सरकार मिळून गोव्याचा चेहरामोहरा बदलणार; कामतांचा विश्वास

Goa Tourism: 'पर्यटनात विविधता, कुशल मनुष्यबळ निर्मितीवर सरकारचा भर', राज्यात 5 नवीन महाविद्यालयांची मुख्यमंत्र्यांकडून घोषणा

Goa Water Crisis: "गोव्यातील पाणीटंचाईला सावंत सरकारच जबाबदार", युरी आलेमाव यांचा हल्लाबोल

SCROLL FOR NEXT