Airport Dainik Gomantak
देश

देशातील 13 विमानतळांच्या नावात होणार बदल, जाणून घ्या औरंगाबाद विमानतळाचे नाव

मोदी सरकार (Modi government) देशातील 13 विमानतळांची नावे बदलण्याच्या तयारीत आहे (13 Airport Renames). या यादीत महाराष्ट्रातील औरंगाबाद शहराचाही समावेश आहे.

दैनिक गोमन्तक

देशातील विमानतळ, शहरे आणि ऐतिहासिक स्थळांची नावे बदलण्याची योजना सुरु झाली आहे. आता मोदी सरकार (Modi Government) देशातील 13 विमानतळांची नावे बदलण्याच्या तयारीत आहे (13 Airport Renames). या यादीत महाराष्ट्रातील औरंगाबाद शहराचाही समावेश आहे. याच्या एक दिवस आधी भाजपशासित आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा (Himanta Biswa Sarma) यांनी राज्यातील सर्व ठिकाणांची नावे बदलण्यात येणार असल्याचे सांगितले होते. त्यासाठी जनतेकडून सूचना मागवल्या जाणार असून, सूचनांसाठी पोर्टलही तयार करण्यात येत आहे. (Plans are afoot to rename the country's airports, cities and historic sites)

औरंगाबादमध्ये असताना केंद्रीय अर्थ राज्यमंत्री भागवत कराड (Bhagwat Karad) म्हणाले, ''विमानतळाचे नाव बदलून छत्रपती संभाजी महाराजांच्या नावाने करण्याचा प्रस्ताव यापूर्वीच केंद्राकडे पाठवण्यात आला आहे. या निर्णयाकडे मी नियमित प्रक्रियेचा भाग असल्याचे म्हणून पाहतो. भारतातील 13 विमानतळांची नाव बदलण्यात येणार असून या विमानतळांच्या नवीन नावांवर मंत्रिमंडळ निर्णय घेईल.''

दरम्यान, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, कर्नाटक या भाजपशासित राज्यांच्या धर्तीवर आसाममधील अनेक ठिकाणांची नावे बदलण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांनी एक दिवस आधी ही माहिती दिली होती. नागरिकांच्या सूचना घेण्यासाठी आसाममध्ये लवकरच एक पोर्टल सुरु करण्यात येणार आहे. यामध्ये आसाममधील ज्या ठिकाणांची संस्कृती आणि सभ्यता दिसून येत नाही, त्यांची नावे बदलण्यासाठी सूचना मागवल्या जातील.

यापूर्वी मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, हरियाणा आणि इतर अनेक भाजपशासित राज्यांमध्ये अनेक मोठ्या स्थानकांची आणि शहरांची नावे बदलण्यात आली आहेत. यामध्ये मध्य प्रदेशातील हबीबगंज रेल्वे स्थानकाचे नाव बदलून गोंड राणी कमलापती स्थानक करण्यात आले आहे. पूर्वी पाटलपाणी रेल्वे स्थानकाचे नाव तंट्या मामा रेल्वे स्थानक असे करण्यात आले. यूपीमध्येही अलाहाबादचे नाव बदलून प्रयागराज करण्यात आले आहे. फैजाबाद जंक्शन स्थानकाचे अयोध्या कॅंट असे नामकरण करण्यात आले आहे. फैजाबाद जिल्ह्याचे नावही बदलून अयोध्या करण्यात आले आहे. आग्रासारखी इतर अनेक शहरांची नावे बदलण्याची मागणीही भाजप नेत्यांनी मांडली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Islamic State Rebels Attack: कांगोमध्ये रक्तपात! चर्चवरील हल्ल्यात 21 जणांचा मृत्यू, IS समर्थित दहशतवाद्यांचा हात

IND vs ENG 4th Test: गिल-राहुलचा मोठा पराक्रम! इंग्लंडच्या भूमीवर रचला नवा इतिहास, मोडला 23 वर्ष जुना रेकॉर्ड

Viral: मास्तर बनला प्रभु देवा...मुकाबला गाण्यावर केला जबरदस्त डान्स; पोरं झाली थक्क, WATCH VIDEO

Shravan Somvar 2025: मन:शांती आणि समस्यामुक्तीसाठी श्रावण सोमवार; जाणून घ्या रुद्राभिषेकाचे महत्त्व आणि सोपी पद्धत

Goa Village Tourism: "आम्हाला प्रकल्प हवाच!" सुर्ला ग्रामस्थांकडून इको-टुरिझमचे स्वागत; शासनाच्या प्रकल्पाला ग्रामसभेचा पाठिंबा

SCROLL FOR NEXT