भारतीय संघाने महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वाखाली २०११ चा एकदिवसीय विश्वचषक जिंकला, त्यानंतर टीम इंडियाने अंतिम सामन्यात श्रीलंकेचा ६ विकेट्सने पराभव केला. आता २०११ चा एकदिवसीय विश्वचषक जिंकणाऱ्या संघाचा सदस्य असलेल्या पियुष चावलानं निवृत्तीची घोषणा केली आहे. त्यांनी इंस्टाग्रामवर पोस्ट करून ही माहिती दिली आहे.
भारतासाठी दोन विश्वचषक जिंकले
पियुष चावलाने इंस्टाग्राम पोस्टमध्ये लिहिले आहे की दोन दशकांहून अधिक काळ घालवल्यानंतर, आता या खेळाला निरोप देण्याची वेळ आली आहे. भारतासाठी खेळण्यापासून ते २००७ चा टी-२० विश्वचषक आणि २०११ चा एकदिवसीय विश्वचषक जिंकणाऱ्या संघाचा भाग होण्यापर्यंत, हा अद्भुत प्रवास होता.
माझ्यावर विश्वास ठेवणाऱ्या आयपीएल फ्रँचायझींचे मनापासून आभार. पंजाब किंग्ज, कोलकाता नाईट रायडर्स, चेन्नई सुपर किंग्ज आणि मुंबई इंडियन्स. आयपीएल माझ्या कारकिर्दीतील एक खास अध्याय आहे. मी माझे प्रशिक्षक केके गौतम आणि दिवंगत पंकज सारस्वत यांचे मनापासून आभार मानतो, ज्यांनी मला क्रिकेटपटू म्हणून घडवले, असं पियुष चावलाने इंस्टाग्राम पोस्टमध्ये म्हटलंय.
२००६ मध्ये कसोटी पदार्पण केले
पियुष चावलाने २००६ मध्ये भारतासाठी कसोटी पदार्पण केले. परंतु खराब फॉर्ममुळे तो संघातून येत-जात राहिला आणि त्याला खेळण्याच्या फारशा संधी मिळाल्या नाहीत. त्याने टीम इंडियासाठी ३ कसोटी सामन्यांमध्ये ७ बळी घेतले. याशिवाय, त्याने २५ एकदिवसीय सामन्यांमध्ये ३२ बळी घेतले. टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये त्याच्या नावावर ४ बळी आहेत.
आयपीएलमध्ये १९२ विकेट्स
पीयुष चावलाला आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळण्याची संधी मिळाली नसली तरी, त्याने आयपीएलमध्ये चमकदार कामगिरी केली आणि एकूण १९२ विकेट्स घेतल्या. गेल्या हंगामात तो मुंबई इंडियन्स संघाचा भाग होता.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.