Indian Fishermen Dainik Gomantak
देश

Indian Fishermen : 200 भारतीय मच्छिमारांची पाकिस्तान सुटका करणार

Bilawal Bhutto: परराष्ट्र मंत्री भुट्टो यांनी एका ट्विटमध्ये म्हटले आहे की, आज पाकिस्तान 200 भारतीय मच्छिमार आणि तीन नागरी कैद्यांची सुटका करत आहे.

Ashutosh Masgaunde

पाकिस्तानचे परराष्ट्र मंत्री बिलावल भुट्टो झरदारी यांनी शुक्रवारी जाहीर केले की पाकिस्तान मानवतावादी आधारावर 200 भारतीय मच्छिमार आणि तीन नागरी कैद्यांची सुटका करेल.

देशाच्या सागरी हद्दीत बेकायदेशीर मासेमारी केल्याच्या आरोपाखाली अटक केल्यानंतर पाकिस्तानी अधिकाऱ्यांनी गेल्या महिन्यात कराचीमध्ये तुरुंगात असलेल्या 198 भारतीय मच्छिमारांची सुटका केली.

वाघा सीमेवर त्याला भारताच्या ताब्यात देण्यात आले. आता पाकिस्तान आणखी 200 भारतीय मच्छिमारांची सुटका करणार असल्याची माहिती पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्र्यांनी केली.

बिलावल भुट्टो यांनी ट्विट करून माहिती दिली

बिलावल भुट्टो झरदारी यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे की, "आज पाकिस्तान 200 भारतीय मच्छिमार आणि तीन नागरी कैद्यांची सुटका करत आहे.

यापूर्वी 12 मे 2023 रोजी 198 भारतीय मच्छिमारांची सुटका करण्यात आली होती. हे पाकिस्तानच्या मानवतावादी प्रकरणांचे राजकारण न करण्याच्या धोरणाशी सुसंगत आहे. राजकारणापेक्षा करुणेला प्राधान्य दिले पाहिजे."

198 मच्छिमारांची 12 मे रोजी सुटका

यापूर्वी 12 मे रोजी कराचीच्या मालीर तुरुंगातून 200 मच्छिमारांची सुटका होणार होती, मात्र दोघांचा मृत्यू झाल्याने 198 मच्छिमारांची सुटका करण्यात आली. तुरुंग अधीक्षक नाझीर टुनियो म्हणाले, "तुरुंगात असलेल्या भारतीय मच्छिमारांची पहिली तुकडी सोडण्यात आली आहे.

जून आणि जुलैमध्ये आणखी दोन बॅचेस सोडण्यात येणार आहेत. 200 आणि 100 कैद्यांना नंतर सोडण्यात येईल." सागरी सीमांचे उल्लंघन केल्याबद्दल पाकिस्तान आणि भारत नियमितपणे प्रतिस्पर्धी मच्छिमारांना अटक करतात.

मच्छिमारांचे अपहरण

पाकिस्तान सागरी सुरक्षा दलाने गेल्या दोन वर्षांत गुजरातमधून २०,०७४ मच्छिमारांचे अपहरण केले आहे. पाकिस्तान इंडिया पीस फोरमने वारंवार निवेदन दिल्यानंतर, 12 मे रोजी पोरबंदरमधील 5 मच्छिमारांसह 198 मच्छिमारांना प्रथम सोडण्यात आले. आता पाकिस्तानने आणखी 200 मच्छिमारांना सोडण्याची घोषणा केली आहे.

हे मच्छिमार वर्षांनंतर त्यांच्या कुटुंबीयांना भेटणार आहेत. मच्छीमारांच्या कुटुंबात आनंद पसरला आहे. उना, गीर सोमनाथ, वलसाडसह बहुतांश मच्छीमार पोरबंदर भागातील आहेत. बरीच विनवणी केल्यानंतर त्यांची सुटका झाल्याची बातमी कळताच मच्छिमारांच्या नातेवाईकांच्या डोळ्यात अश्रू तरळले.

पाकिस्तानच्या तुरुंगात बंद असलेल्या १०० मच्छिमारांची तिसऱ्या टप्प्यात १४ जुलै रोजी सुटका करण्यात येणार आहे. मच्छिमार नेते जीवनभाई झुंगी यांनी पाकिस्तान सरकारने उचललेल्या आणखी एका पाऊलाबद्दल पाकिस्तान आणि भारत सरकारचे आभार मानले. पाकिस्तान सागरी सुरक्षेने जप्त केलेल्या ११८८ बोटी लवकरात लवकर सोडवाव्यात अशी मागणी मच्छीमार समाजाचे नेते जीवनभाई झुंगी यांनी सरकारकडे केली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Earthquake Prediction: धोक्याची घंटा! 10 मार्चला जगभरात तीव्र भूकंपाचे संकेत, डच संशोधकाचे नवे भाकीत चर्चेत; सोशल मीडियावर चर्चांना उधाण

Navpancham Yog 2026: बुध-गुरुचा नवपंचम योग घेऊन आला आनंदाची बातमी! 'या' 3 राशींना मिळणार अमाप संपत्ती; आर्थिक अडचणींपासून होणार कायमची सुटका

Vajari: सफर गोव्याची! पांडवकालीन इतिहासाचा वारसा सांगणारे, निसर्गसंपन्न 'वजरी'

"आखातातील गोवेकरांसाठी सावंत सरकार आलं धावून'' सरदेसाईंच्या धारदार सवालावर मुख्यमंत्र्यांनी विधानसभेत स्पष्टचं सांगितलं

International Women's Day 2026: न्यू यॉर्कमध्ये रंगला आंतरराष्ट्रीय महिला दिनाचा सोहळा, कर्तृत्ववान भारतीय महिलांचा 'गौरव'

SCROLL FOR NEXT