Pak Ex-Pak Air Chief Marshal Sohel Aman Khan Dainik Gomantak
देश

... तर तेव्हा भारताची 8 विमाने पाडली असती, पाकिस्तानचे माजी हवाईदल प्रमुख बरळले

Pakistan news: पाकिस्तानचे माजी हवाईदल प्रमुख युद्धाची भाषा करतांना दिसत आहेत.

दैनिक गोमन्तक

Ex-Pak Air Chief Marshal: पाकिस्तान सध्या आर्थिक समस्यांना सामोरे जात आहे. देशात बेरोजगारी, भुकमरी पायाभूत सुविधांचा अभाव, महागाई यामुळे सर्व सामान्य नागरिक मेटकुटीला आहेत.

याची जाणीव झाल्याने पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांनी भारतासोबत केलेली तीन युद्धे महागात पडली असून यामुळे पाकिस्तानवर आर्थिक संकट ओढवले अशी जाहीर कबुली दिली.

तसेच भारतासोबत चांगले संबंध देखील ठेवणे गरजेचे आहे असे सांगितले आहे. त्यांचे माजी हवाई दल प्रमुख युद्धाची भाषा करत आहे. त्यांनी भारताने पाकिस्तानवर केलेल्या एयर स्ट्राईक वरुन वादग्रस्त वक्तव्य केले आहे.

पाकिस्तानचे माजी हवाई दल प्रमुख सोहेल अमन यांनी शनिवारी एका कार्यक्रमात प्रमुख पाहुणे असतांना हे वादग्रस्त वक्तव्य केले. त्यांच्या या वक्तव्यामुळे दोन्ही देशातील संबंध जैसे थे राहण्याची शक्यता आहे.

सोहेल अमन म्हणाले, 'बालाकोट एअर स्ट्राईकच्या वेळी आमच्या निशाण्यावर 8 भारतीय लढाऊ विमाने होती. पण आम्ही त्यातील फक्त एकच लढाऊ विमानं पाडले. कारण, आम्हाला दोन्ही देशांमधील तणावपूर्व परिस्थिती अजून वाढवायची नव्हती.'

सोहेल अमन यांच्या या वक्तव्यामुळे दोन्ही देशातील संबंध आणखी तणाव पूर्ण होण्याची शक्यता आहे. पंतप्रधान शाहबाज शरीफ (Shahbaz Sharif) सध्या आर्थिक मदतीसाठी अनेक देशांकडे हात पसरवत आहेत. पण त्यांना पाहिजे तशी मदत मिळेनाशी झाली आहे.

कर्जाचा डोंगर देखील वाढत असून देशातील महागाईने सर्व सामान्य नागरिक मेटकुटीला आहे. ही स्थिती आणखी भीषण होण्याची शक्यता आहे.

यावर नियंत्रण मिळवायचे असेल तर भारतासोबत चांगले संबंध ही काळाची गरज असल्याचे पंतप्रधान शाहबाज शरीफ म्हणाले होते.

त्यांनी अल अरेबिया चॅनेलचा दिलेल्या मुलाखतीत म्हटले की, "मी पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Modi) यांना आवाहन करतो की त्यांनी पाकिस्तानशी चर्चा करावी, भारत आणि पाकिस्तानचे प्रश्न चर्चेने सोडवू. भारत (India) आणि पाकिस्तान एकमेकांचे शेजारी आहोत.

शांततेत जगणे हे आपल्यावर अवलंबून आहे. प्रगती करा किंवा एकमेकांशी लढून वेळ आणि साधनसंपत्ती वाया घालवावी हे आपल्यावर आहे. पाकिस्तान आणि भारत यांच्यात तीन युद्धे झाली आहेत आणि या युद्धामुळे आपल्या देशात गरिबी आणि बेरोजगारीत वाढ झाली आहे. आम्ही आमचा धडा शिकलो आहोत आणि आम्हाला शांततेने जगण्याची इच्छा आहे, असे पंतप्रधान शाहबाज शरीफ म्हणाले होते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Positive Story: ..घे उंच भरारी! मयेतील कुटुंबाचा जिद्दीचा प्रवास; अळंबी उत्पादनातून स्वयंपूर्णतेकडे वाटचाल

Viral Video: दगड उगारला अन् माकड चवताळलं! आजीला 'ती' चूक पडली महागात, सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल; नेटकऱ्यांनी घेतली मजा

US Iran War: 'तुमची लढाई तुम्ही लढा, अमेरिका मदतीला येणार नाही!'; इराण युद्धावरुन डोनाल्ड ट्रम्प यांचा ब्रिटनसह 'नाटो' देशांवर संताप

"वैभव सूर्यवंशी लहान आहे, टीम इंडियात आणण्याची घाई कशाला?" अश्विनची रोखठोक प्रतिक्रिया; नेमकं काय म्हणाला दिग्गज फिरकीपटू?

US Iran War: होर्मुझची सामुद्रधुनी बंद राहिली तरी युद्ध संपवण्याची तयारी; इराणची लष्करी ताकद नष्ट करण्यासाठी ट्रम्पचा 'मास्टर प्लॅन'!

SCROLL FOR NEXT