PM Narendra Modi Dainik Gomantak
देश

देशवासीयांनो आता फक्त 'स्वदेशी' वापरा, वाराणसीतून पंतप्रधान मोदी यांचे आवाहन

PM Narendra Modi At Varanasi : ‘‘जागतिक अर्थव्यवस्था अनिश्चिततेच्या गर्तेमध्ये असून या काळात कोणत्याही देशाने स्वतःचे हितसंबंध जपण्याला प्राधान्य द्यायला हवे,’’ असे सांगत पंतप्रधान मोदी यांनी ‘स्वदेशी’चा नारा दिला.

Sameer Amunekar

वाराणसी : ‘‘जागतिक अर्थव्यवस्था अनिश्चिततेच्या गर्तेमध्ये असून या काळात कोणत्याही देशाने स्वतःचे हितसंबंध जपण्याला प्राधान्य द्यायला हवे,’’ असे सांगत पंतप्रधान मोदी यांनी ‘स्वदेशी’चा नारा दिला. ‘‘देशातील नागरिकांनी स्वदेशीचा स्वीकार करण्याबरोबर स्थानिक उत्पादनांना प्रोत्साहन द्यावे, तीच खरी देशसेवा आहे,’’ असे आवाहनही त्यांनी केले. व्यापारी, उद्योजकांनी यासाठी पुढाकार घ्यावा, असे ते म्हणाले.

अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतासह सत्तर देशांवर आयात शुल्क लादले असून, भारतीय उत्पादनांना अमेरिकेमध्ये २५ टक्के शुल्क द्यावे लागणार आहे. या पार्श्वभूमीवर, मोदी यांनी वाराणसी मतदारसंघातील बनौली गावात झालेल्या सभेमध्ये स्वदेशी उत्पादनांवर लक्ष केंद्रित करण्याचे आवाहन केले.

देशासाठी शेतकरी, लघुउद्योग आणि तरुणांचा रोजगार या सरकारसमोरील प्राधान्याच्या गोष्टी आहेत. त्याविषयी सरकार शक्य ते सर्व प्रयत्न करत असून, नागरिकांचीही जबाबदारी आहे, असे नमूद करीत मोदी म्हणाले, ‘‘जागतिक अर्थव्यवस्था अस्थिर आणि अनिश्चित अवस्थेमध्ये आहे. या काळामध्ये देशाच्या हितसंबंधांवर लक्ष देण्याची गरज आहे.

भारत जगातील तिसऱ्या क्रमांकाची अर्थव्यवस्था होण्याच्या मार्गावर असून, आर्थिक प्राधान्यक्रमांविषयी आपण सावध असायला हवे. कोणतीही वस्तू खरेदी करण्यापूर्वी, ती स्वदेशी आहे का, याचा विचार करायला हवा. ती वस्तू आपल्या लोकांच्या घामातून कौशल्यातून तयार झाली असेल, तर ती स्वदेशी आहे.

सर्व दुकानदार आणि व्यापाऱ्यांनीही आपल्या दुकानांमध्ये स्वदेशी उत्पादनेच असावीत, याचा आग्रह धरावा. भारतीय उत्पादनांना प्रोत्साहन देणे, हीच खरी देशसेवा आहे. आपल्या प्रत्येक कृतीमध्ये स्वदेशीची भावना असायला हवी आणि तेच महात्मा गांधींना खरे अभिवादनअसेल.’’

आपल्याला जगातील तिसऱ्या क्रमांकाची अर्थव्यवस्था व्हायची असेल, तर प्रत्येक राजकीय पक्ष आणि प्रत्येक नेत्याने मतभेद बाजूला ठेवून देशाच्या हितसंबंधांविषयी काम करायला हवे आणि नागरिकांच्या मनामध्ये ‘स्वदेशी’ची ज्योत पेटवायला हवी. - नरेंद्र मोदी, पंतप्रधान.

‘भारताचे रौद्ररूप जगाने पाहिले’ : ‘‘जगाने ‘ऑपरेशन सिंदूर’मध्ये भारताचे रौद्ररूप पाहिले आहे. भारतावर हल्ला करणारा शत्रू पाताळातही लपला तरी तो वाचू शकत नाही, हेच दाखवून दिले,’’ असे गौरवोद्‍गार पंतप्रधान मोदी यांनी काढले. ‘‘आपली कारवाई यशस्वी होत असतानाच आपल्याच देशातील काही लोक विघ्ने आणत होते.

भारताने दहशतवाद्यांचे पाकिस्तानातील अड्डे नष्ट केले, ही गोष्ट काँग्रेस आणि त्यांचे मित्रपक्ष सहन करू शकले नाहीत,’’ अशी टीका मोदी यांनी केली. तसेच, तुम्हाला ‘ऑपरेशन सिंदूर’चा अभिमान वाटत नाही का? असा प्रश्न त्यांनी यावेळी विरोधकांना उद्देशून विचारला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Winter Session 2026: विधानसभेत विधेयकांचा 'पंच'! शिक्षण, कृषी, व्यापार अन् पंचायतींसाठी कायदे मंजूर; अधिवेशनाच्या चौथ्या दिवशी राज्याच्या हिताचे मोठे निर्णय

Operation Sindhur: 'ऑपरेशन सिंदूर'चा थरार! भारतीय लष्कराने जारी केला सर्जिकल स्ट्राईकचा व्हिडिओ; पाकच्या एअरबेस आणि रडार यंत्रणेच्या विध्वंसाचा पुरावा जगासमोर

"ऑपरेशन सिंदूर सर्वात मोठा हल्ला, अल्लाहनचं आम्हाला वाचवलं," लष्कर-ए-तैयबाच्या टॉप कमांडरची जाहीर कबुली; पाकड्यांचा पुन्हा बुरखा फाटला

Goa Winter Session 2026: "आधार कार्ड म्हणजे नागरिकत्वाचा पुरावा नाही!" मुख्यमंत्री सावंतांनी विधानसभेत स्पष्टचं सांगितलं; मतदार यादीतून गैर-नागरिकांची नावं हटवणार

Indian Army: भविष्यातील युद्धांसाठी भारतीय सेना सज्ज! 'फ्युचर रेडी' फोर्स म्हणून जगात ठरणार वरचढ, लष्करप्रमुखांनी शत्रूंना दिली तंबी VIDEO

SCROLL FOR NEXT