Mehbooba mufti warns central government Dainik Gomantak
देश

जम्मू-काश्मीरबद्दल केलेली चूक मोदी सरकारने सुधारावी, अन्यथा... :मेहबूबा मुफ्ती

Taliban ला मी आवाहन करते, की असे काहीच करू नका ज्यामुळे जग तुमच्या विरोधात जाईल, असेही मेहबूबा मुफ्ती पुढे म्हणाल्या.

दैनिक गोमन्तक

जम्मू -काश्मीरच्या माजी मुख्यमंत्री मेहबूबा मुफ्ती यांनी शनिवारी तालिबानच्या विषयावर बोलताना केंद्र सरकारवर निशाणा साधला. त्यांनी केंद्र सरकारला जम्मू -काश्मीरच्या लोकांशी संवाद साधण्याचे आवाहन केले आहे. जम्मू -काश्मीरला पुन्हा विशेष दर्जा देण्यात यावा. तालिबान्यांनी अमेरिके साऱख्या देशाला आपला गाशा गुंडाळायला लावला, आपणही आमच्या सहनशक्तीची परीक्षा घेऊ नका, कारण ज्या दिवशी आमची सहनशीलता संपेल त्या दिवशी तुम्ही उरणार नाही असा इशाराच मेहबूबा मुफ्ती यांनी यावेळी दिला आहे.

मेहबूबा मुफ्ती म्हणाल्या की, जर केंद्र सरकारला जम्मू -काश्मीरमध्ये शांतता हवी असेल तर त्यांनी जम्मू -काश्मीरमध्ये कलम 370 पुन्हा लागू करावे. काश्मिरवर संवादातून तोडगा काढला जाऊ शकतो. अफगाणिस्तानात तालिबान्यांनी अमेरिके सारख्या देशाला पळून जाण्यास भाग पाडले.

पुढे त्या असेही म्हणाल्या की, संपूर्ण जग तालिबानच्या वागण्यावर लक्ष ठेवून आहे. त्या म्हणाल्या, "तालिबानला मी आवाहन करते, की असे काहीच करू नका ज्यामुळे जग तुमच्या विरोधात जाईल."

तालिबान बद्दल बोलताना महेबूबा मुफ्ती पुढे असेही म्हणाल्या की, तालिबान्यांनी आपली बंदुकीची भुमिका बदलली पाहिजे. तालिबान अफगाणिस्तानच्या लोकांशी कसे वागतात याकडे जगातील प्रत्येक देश लक्ष ठेवून आहे. 1947 मध्ये तत्कालीन पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांनी जम्मू -काश्मीरच्या नेतृत्वाला आश्वासन दिले होते की, आम्ही स्थानिकांच्या सुरक्षेची पूर्ण काळजी घेऊ. या राज्याला विशेष दर्जा द्या. पीडीपीच्या प्रमुख मेहबूबा मुफ्ती यांनी दावा केला आहे की, स्वातंत्र्याच्या वेळी भाजप सरकार सत्तेत असते तर जम्मू -काश्मीर भारताचा भाग नसता.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Sant Dnyaneshwari Philosophy: 'ज्ञानेश्वरी' आजही जीवनाचा शाश्वत दीपस्तंभ! कृत्रिम बुद्धिमत्ता, तणाव आणि वेगवान जीवनशैलीच्या युगात विवेक, करुणा अन् संतुलनाचा मार्ग

Goa Cricket: गोवा क्रिकेट संघाची बहरीनवारी होणार? क्रिकेट विकासासाठी सामंजस्य कराराची चर्चा; मन्सूर यांनी दिले गोवा संघाला बहरीन भेटीचे निमंत्रण

9/11 हल्ल्याच्या आधी 'भारत' होता लादेनच्या टार्गेटवर! CIAच्या सीक्रेट रिपोर्टमध्ये खळबळजनक खुलासा; अल-कायदाचा जागतिक विनाशाचा मास्टरप्लॅन

शिलाहारांची सत्ता कमकुवत झाली अन् प्रतापबिंबाची कोकणावर स्वारी! १० हजारांच्या फौजेसह जिंकला प्रदेश; उजाड भूमी पुन्हा वसवण्याचा घेतला ध्यास

Goa Politics: काँग्रेसला बाजूला सारुन ‘गोवा फर्स्ट’चा प्रयोग कितपत यशस्वी होणार? सरदेसाईंच्या नव्या राजकीय प्रयोगावर सवाल; विरोधकांच्या ऐक्याची खरी कसोटी आता

SCROLL FOR NEXT