Manoj Muntashir Shukla Dainik Gomantak
देश

''जागतिक शांततेचा नोबेल जर कोणाला द्यायचा असेल तर...''; राम मंदिराच्या कार्यक्रमात मनोज मुंतशीर स्पष्टच बोलले

Manoj Muntashir Shukla: 'साहित्य आज तक लखनऊ'मधील 'मेरे घर राम आये हैं' या सत्रात गीतकार आणि लेखक मनोज मुंतशीर शुक्ला प्रमुख पाहुणे म्हणून सहभागी झाले होते.

Manish Jadhav

Ram Mandir: अयोध्येतील राम मंदिरात 22 जानेवारी रोजी होणाऱ्या प्रभू श्रीरामांच्या प्राणप्रतिष्ठेची तयारी जोरात सुरु आहे. या कार्यक्रमाबाबत जगभरातील रामभक्तांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. यातच, 'साहित्य आज तक च्या लखनऊ'मधील 'मेरे घर राम आये हैं' या सत्रात गीतकार आणि लेखक मनोज मुंतशीर शुक्ला प्रमुख पाहुणे म्हणून सहभागी झाले होते. यावेळी त्यांनी श्री राम मंदिर अभिषेक सोहळ्याच्या संदर्भात मंचावरुन आपले विचार व्यक्त केले. मुंतशीर म्हणाले की, साक्षात प्रभु श्रीरामांनी मला बोलावले आहे.

दरम्यान, साहित्य आज तक च्या मंचावर येताच मनोज मुंतशीर शुक्ला यांनी जय श्री रामाचा जयघोष केला. विशेष म्हणजे, त्यांनी या जयघोषणेचा आवाज मंगळ ग्रहापर्यंत पोहोचला पाहिजे असे आवाहनही उपस्थितांना केले. कार्यक्रमादरम्यान जेव्हा त्यांना विचारण्यात आले की, तुम्ही कधी राम मंदिर बांधले जाईल याबाबत विचार केला होता. यावर मनोज म्हणाले की, ''खरं सांगायचं तर मी असा विचार कधीच केला नव्हता.'' ते पुढे म्हणाले की, 'मी खूप आशावादी आहे, माझा जन्म याच राज्यात झाला आहे. मी इथे अमेठीमध्ये लहानाचा मोठा झालो, पण असा विचार कधीच केला नाही. पण आज जेव्हा हे राम मंदिर बांधले जात आहे. खरे सांगायचे तर हे सारं स्वप्नवत वाटतं. मला भीती वाटते की, या स्वप्नातून कोणीतरी मला जागे करेल.''

दुसरीकडे, रामप्रतिष्ठा सोहळ्याला अवघे काही तास उरले आहेत. हे स्वप्न असेल तर हे स्वप्न आयुष्यभर अखंड राहावे अशी माझी इच्छा आहे. त्याचबरोबर हे स्वप्न आयुष्यभर टिकावं अशी माझी इच्छा आहे, असेही मुंतशीर पुढे म्हणाले. ते पुढे म्हणाले की, ''प्रभु श्रीरामाचा जन्म अयोध्येत झाला हे आपल्याच देशात सिद्ध करत राहणे ही मोठी विडंबना आहे. 1885 ते 2019 पर्यंत आपण अशी कायदेशीर लढाई लढत राहिलो, ही अत्यंत खेदाची बाब आहे.''

मुंतशीर पुढे म्हणाले की, ''या गोष्टीने मला नेहमीच त्रास दिला की आपण राम मंदिर मक्केत किंवा मदिनेमध्ये मागत नाही. आपण अयोध्येत ही मागणी करत होतो. त्यांनी ते प्रेमाने द्यायला हवे होते, पण हा मूर्खपणा इतकी वर्षे कायदेशीर लढला गेला. जे सरकारी वकील दरवर्षी रामनवमी, दसरा, दिवाळीला सुटी घेत असत, त्यांनाही श्रीराम अस्तित्वात आहेत का याचा पुरावा कोर्टात हवा होता.'' मनोज मुंतशीर पुढे म्हणाले की, 'मला कळत नाही की मंदिराची मागणी करताच आपण असहिष्णू कसे काय होतो.''

मुंतशीर पुढे म्हणाले की, '' एकदा इतिहासात डोकावून बघा आणि असे उदाहरण कुठेही सापडेल का, जिथे बहुसंख्य असलेल्या लोकांना 500 वर्षे आपल्या हक्कासाठी लढावे लागले आणि तेही रक्ताचे पाट न वाहता. हा हिंदू किती सहिष्णू आहे हे मी कसे सांगू? जागतिक शांततेचे नोबेल जर कोणाला द्यायचे असेल तर ते कोणा एका व्यक्तीला नको तर 100 कोटी भारतीयांना द्यायला हवे ज्यांनी आपल्या हक्कांसाठी इतक्या शांततेने लढा दिला.'' ते पुढे म्हणाले की, 'आम्ही संपूर्ण जगाला आमची मातृभूमी मानतो, आम्ही हिंदू आहोत.'

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT