Mamata Banerjee Dainik Gomantak
देश

'अग्निवीरांच्या निवृत्तीचे वय 65 वर्षे करा', ममता बॅनर्जींनी मोदी सरकारकडे केली मागणी

दैनिक गोमन्तक

पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री आणि टीएमसीच्या सुप्रीमो ममता बॅनर्जी यांनी मोदी सरकारला 'अग्निवीर'चे निवृत्तीचे वय 65 वर्षे करावे अशी मागणी केली आहे. चार वर्षांत त्यांची सेवा संपुष्टात आल्यास तरुणांचे भवितव्य धोक्यात येईल, असेही त्या म्हणाल्या. ममता बॅनर्जी पुढे म्हणाल्या, चार वर्षांनी हे सैनिक काय करतील? त्यांच्या भविष्याचे काय असणार?'

ममता बॅनर्जी (Mamata Banerjee) पुढे म्हणाल्या, रोजगाराच्या अधिकाधिक संधी निर्माण करणे आपले ध्येय आहे. केंद्र सरकारने (Central Government) अग्निवीरांच्या निवृत्तीचे वय 65 वर्षे करावे'.

दरम्यान, या योजनेंतर्गत 17 ते 21 वर्षे वयोगटातील तरुणांना केवळ चार वर्षांसाठी सैन्य दलात भरती करण्यात येणार आहे. एकूण भरती झालेल्या तरुणांपैकी केवळ 25 टक्के तरुणांना 15 वर्षांहून अधिक काळ सशस्त्र दलात नियमितपणे नियुक्त केले जाईल. 2022 साठी भरतीसाठी उच्च वयोमर्यादा 23 वर्षे करण्यात आली आहे.

बॅनर्जी यांनी यापूर्वी दावा केला होता की, भाजप (BJP) या योजनेचा वापर आपला "सशस्त्र केडर बेस" तयार करण्यासाठी करत आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Subhash Velingkar: सुभाष वेलिंगकरांची अटक अटळ? कोर्टाचा दिलासा नाही, जामीन अर्जावर सोमवारी सुनावणी

Saint Francis Xavier: सुभाष वेलिंगकरांच्या अटकेसाठी उद्रेक; पर्यटक, विद्यार्थ्यांचे हाल, गोव्यात दिवसभर कुठे काय घडलं?

BKC ते आरे JVLR पंतप्रधान मोदींचा मेट्रोने प्रवास; शाळकरी विद्यार्थी, महिलांशी साधला संवाद पाहा Video

Goa HSE Board Exam: गोवा बारावी बोर्ड परीक्षेच्या वेळापत्रकात बदल, JEE परीक्षेमुळे मोठा निर्णय

गिरीत बंदिस्त खोलीत आढळला मृतदेह , संशयास्पद मृत्यूचा कुटुंबियांचा अंदाज; गोव्यातील ठळक बातम्या

SCROLL FOR NEXT