Mamata Banerjee Dainik Gomantak
देश

'अग्निवीरांच्या निवृत्तीचे वय 65 वर्षे करा', ममता बॅनर्जींनी मोदी सरकारकडे केली मागणी

पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री आणि टीएमसीच्या सुप्रीमो ममता बॅनर्जी यांनी मोदी सरकारला 'अग्निवीर'चे निवृत्तीचे वय 65 वर्षे करावे अशी मागणी केली आहे.

दैनिक गोमन्तक

पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री आणि टीएमसीच्या सुप्रीमो ममता बॅनर्जी यांनी मोदी सरकारला 'अग्निवीर'चे निवृत्तीचे वय 65 वर्षे करावे अशी मागणी केली आहे. चार वर्षांत त्यांची सेवा संपुष्टात आल्यास तरुणांचे भवितव्य धोक्यात येईल, असेही त्या म्हणाल्या. ममता बॅनर्जी पुढे म्हणाल्या, चार वर्षांनी हे सैनिक काय करतील? त्यांच्या भविष्याचे काय असणार?'

ममता बॅनर्जी (Mamata Banerjee) पुढे म्हणाल्या, रोजगाराच्या अधिकाधिक संधी निर्माण करणे आपले ध्येय आहे. केंद्र सरकारने (Central Government) अग्निवीरांच्या निवृत्तीचे वय 65 वर्षे करावे'.

दरम्यान, या योजनेंतर्गत 17 ते 21 वर्षे वयोगटातील तरुणांना केवळ चार वर्षांसाठी सैन्य दलात भरती करण्यात येणार आहे. एकूण भरती झालेल्या तरुणांपैकी केवळ 25 टक्के तरुणांना 15 वर्षांहून अधिक काळ सशस्त्र दलात नियमितपणे नियुक्त केले जाईल. 2022 साठी भरतीसाठी उच्च वयोमर्यादा 23 वर्षे करण्यात आली आहे.

बॅनर्जी यांनी यापूर्वी दावा केला होता की, भाजप (BJP) या योजनेचा वापर आपला "सशस्त्र केडर बेस" तयार करण्यासाठी करत आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Mitchell Marsh Drinking Beer: वादग्रस्त बोलणं पडलं महागात! फक्त '6 बिअर' बोलल्यामुळे मिचेल मार्शला संघातून 'डच्चू'! काय आहे नेमकं प्रकरण? Watch Video

Goa Police Constable Fraud: पोलिस कॉन्स्टेबलचा भांडाफोड! आंध्र प्रदेशातील बनावट जन्म प्रमाणपत्राच्या आधारे मिळवली नोकरी; पणजी पोलिसांत फसवणुकीचा गुन्हा

Gold Silver Rate: सोन्या-चांदीच्या दरात मोठा उलटफेर! सोन्याच्या दरात घसरण, तर चांदीचे दर 'जैसे थे'; 10 ग्रॅम सोन्याचा भाव किती?

Horoscope: पैसा आणि नोकरीचे संकट! मंगळाच्या अधोगतीमुळे 'या' राशींची आर्थिक स्थिती ढासळणार! सावध राहा

IND vs AUS 5th T20: मालिकेचा फैसला 'गाबा'वर! सूर्या ब्रिगेड देणार कांगारुंना कडवं आव्हान, कसा आहे ब्रिस्बेनमध्ये टीम इंडियाचा रेकॉर्ड?

SCROLL FOR NEXT