Mamata Banerjee

 

Dainik Gomantak

देश

Lakhimpur Kheri Case: 'योगी आदित्यनाथ यांनी मुख्यमंत्री पदाचा राजीनामा द्यावा'

शेतकऱ्यांना (Farmers) वाहनाने चिरडण्याची संपूर्ण घटना सुनियोजित कट होता.

दैनिक गोमन्तक

पश्चिम बंगालच्या (West Bengal) मुख्यमंत्री आणि तृणमूल काँग्रेसच्या (TMC) प्रमुख ममता बॅनर्जी (Mamata Banerjee) यांनी पणजी येथे एका मेळाव्याला संबोधित करताना सांगितले की, ''उत्तर प्रदेशातील लखीमपूर खेरी हिंसाचार प्रकरण (Lakhimpur Kheri Case) अत्यंत क्लेशदायक होते. एसआयटीने देखील हे मान्य केले आहे की, शेतकऱ्यांना वाहनाने चिरडण्याची संपूर्ण घटना वेदनादायक होती. हे एक सुविचारित षड्यंत्र होते. याबाबत उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांनी तात्काळ राजीनामा द्यावा. त्याचबरोबर केंद्रीय गृहमंत्र्यांनी राजीनामा द्यावा. या प्रकरणावर पंतप्रधानांनी शांत राहणे ही सर्वात मोठी शोकांतिका आहे. गोव्यावर दिल्लीची दादागिरी चालणार नाही.''

तसेच त्या पुढे म्हणाल्या, उत्तर प्रदेशातील लखीमपूर खेरी हिंसाचार प्रकरणात एसआयटीनेही कबूल केले आहे की, शेतकऱ्यांना वाहनाने चिरडण्याची संपूर्ण घटना सुनियोजित कट होता. याबाबत उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांनी राजीनामा द्यावा.

दरम्यान त्या पुढे म्हणाल्या, “मीही ब्राह्मण कुटुंबातील आहे. मला भाजपच्या प्रमाणपत्राची गरज नाही. निवडणूक आली की ते देवळात जातात.'' एमजीपीच्या मदतीने टीएमसी सरकार स्थापन करेल, असा दावा त्यांनी केला. ज्यांना त्यांच्यासोबत जायचे आहे त्यांनी जावे. गोव्यात भाजपचा सूर्यास्त सुरु झाला आहे. तसेच त्यांचा सूर्यास्त गोव्यापासून उत्तर प्रदेशपर्यंत होईल.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Curchorem: कुडचडे रेल्वे स्टेशनलगतच्या शौचालयाची नळजोडणी तोडली, आस्थापनाची 2.75 लाखांची थकबाकी

Trump Tariff Policy: ट्रम्प यांची ‘टॅरिफ’ पॉलिसी फसली! अमेरिकेत वाढली बेरोजगारी, महागाईनेही गाठला नवा उच्चांक

School Discipline: कच्च्या मडक्यांना योग्य वळण देणारी शाळेची शिकवण; विद्यार्थी आणि शिक्षकांची अविस्मरणीय गाथा

रुद्रेश्वरासमोर दामू नाईकांचे 'मिशन 27'! प्रदेशाध्यक्षांचा वाढदिवस, भाजपने केला निवडणुकीचा श्रीगणेशा

Opinion: शिक्षण, संशोधन आणि कौशल्यविकासाच्या संगमातून भारताचा दबदबा; 'विक्रम' चिप ठरते स्वदेशी सामर्थ्याचे प्रतीक

SCROLL FOR NEXT