<div class="paragraphs"><p>Mamata Banerjee</p></div>

Mamata Banerjee

 

Dainik Gomantak

देश

Lakhimpur Kheri Case: 'योगी आदित्यनाथ यांनी मुख्यमंत्री पदाचा राजीनामा द्यावा'

दैनिक गोमन्तक

पश्चिम बंगालच्या (West Bengal) मुख्यमंत्री आणि तृणमूल काँग्रेसच्या (TMC) प्रमुख ममता बॅनर्जी (Mamata Banerjee) यांनी पणजी येथे एका मेळाव्याला संबोधित करताना सांगितले की, ''उत्तर प्रदेशातील लखीमपूर खेरी हिंसाचार प्रकरण (Lakhimpur Kheri Case) अत्यंत क्लेशदायक होते. एसआयटीने देखील हे मान्य केले आहे की, शेतकऱ्यांना वाहनाने चिरडण्याची संपूर्ण घटना वेदनादायक होती. हे एक सुविचारित षड्यंत्र होते. याबाबत उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांनी तात्काळ राजीनामा द्यावा. त्याचबरोबर केंद्रीय गृहमंत्र्यांनी राजीनामा द्यावा. या प्रकरणावर पंतप्रधानांनी शांत राहणे ही सर्वात मोठी शोकांतिका आहे. गोव्यावर दिल्लीची दादागिरी चालणार नाही.''

तसेच त्या पुढे म्हणाल्या, उत्तर प्रदेशातील लखीमपूर खेरी हिंसाचार प्रकरणात एसआयटीनेही कबूल केले आहे की, शेतकऱ्यांना वाहनाने चिरडण्याची संपूर्ण घटना सुनियोजित कट होता. याबाबत उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांनी राजीनामा द्यावा.

दरम्यान त्या पुढे म्हणाल्या, “मीही ब्राह्मण कुटुंबातील आहे. मला भाजपच्या प्रमाणपत्राची गरज नाही. निवडणूक आली की ते देवळात जातात.'' एमजीपीच्या मदतीने टीएमसी सरकार स्थापन करेल, असा दावा त्यांनी केला. ज्यांना त्यांच्यासोबत जायचे आहे त्यांनी जावे. गोव्यात भाजपचा सूर्यास्त सुरु झाला आहे. तसेच त्यांचा सूर्यास्त गोव्यापासून उत्तर प्रदेशपर्यंत होईल.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Mapusa Goa: गोव्यात गृहमंत्री अमित शहांच्या सभास्थळी हृदयविकाराच्या झटक्याने वृद्धाचा मृत्यू

Loksabha Election 2024: दोन वर्षात मायनिंग सुरुळीत होणार, जाहीरनाम्यात मच्छिमार बांधवासाठी अनेक योजना; शाह गोव्यात काय म्हणाले?

Loksabha Election 2024: म्हापसामधून अमित शाह यांचा हल्लाबोल; ''भ्रष्टाचाराने लिप्त इंडिया आघाडी...’’

Loksabha Election 2024: ‘’भ्रष्टाचार, वॉशिंग मशिनचे राजकारण थांबवण्यासाठी अन्...’’; गोव्यातून शशी थरुर यांचा भाजपवर हल्लाबोल

VIDEO: ‘’नोव्हेंबर 2026 मध्ये भारताचे इतके तुकडे होतील...’’, पाकिस्तानी सिनेटरच्या वक्तव्याने वादंग

SCROLL FOR NEXT