India-China Dainik Gomantak
देश

India-China: चिनी सैनिकांसोबत झालेल्या झटापटीनंतर मोठे केंद्रीय मंत्री पोहोचले तवांगला, शेअर केले फोटो

भारतीय लष्कराच्या शूर सैनिकांमुळे हा परिसर पूर्णपणे सुरक्षित आहे.

Pramod Yadav

भारतीय आणि चिनी सैनिकांमध्ये तवांग भागात झटापट झाली. त्यांनंतर दोन्ही देशांमध्ये तणावपूर्ण वातावरण पाहायला मिळत आहे. दरम्यान, या संघर्षानंतर केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू यांनी शनिवारी (17 डिसेंबर) तवांगच्या यांगत्से प्रदेशाला भेट दिली. किरेन रिजिजू म्हणाले, "भारतीय लष्कराच्या शूर सैनिकांमुळे हा परिसर पूर्णपणे सुरक्षित आहे."

केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू म्हणाले, "राहुल गांधी केवळ भारतीय लष्कराचाच अपमान करत नाहीत, तर देशाच्या प्रतिमेलाही मलिन करत आहेत. हे फक्त काँग्रेस पक्षासाठीच अडचणीचे नाहीत, तर त्यांच्यासाठी मोठा पेचही आहे. "आम्हाला आमच्या सशस्त्र दलांचा अभिमान आहे." किरेन रिजिजू यांनी ट्विटरवर भारतीय जवानांसोबतचा एक फोटोही शेअर केला आहे.

काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी चीन युद्धाच्या तयारीत असून सरकार याकडे दुर्लक्ष करत असल्याचा दावा त्यांनी केला होता. ‘मोदी गाढ झोपले आहेत आणि परिस्थिती स्वीकारायला तयार नाहीत’, असेही राहुल गांधी म्हणाले होते. चीनने भारताचा 2000 चौरस किलोमीटरचा भूभाग बळकावला आहे. 20 भारतीय सैनिक मारले आहेत आणि अरुणाचल प्रदेशात आमच्या जवानांना मारहाण करत असल्याचा आरोपही राहुल गांधींनी केला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

मोपा विमानतळावर कस्टम विभागाची मोठी कारवाई! 3.16 कोटींचा अंमली पदार्थ जप्त; बँकॉकहून आलेल्या प्रवाशाला बेड्या

Rivona: सफर गोव्याची! पांडवांचा पदस्पर्श लाभलेले, देवदेवतांची प्राचीन मंदिरे असणारे तपस्वींचे ऋषीवन; हिरवेकंच 'रिवण'

Youth Migration: भारतीयांना खुणावतेय परदेशातील करिअर! 52 टक्के तरुणांचा देश सोडण्याचा विचार; 'टर्न ग्रुप'चा खुलासा

किंग कोहली अन् रोहितच्या फौजेचं व्यवस्थापन आता गोमंतकीयाच्या हाती, महेश देसाईंची टीम इंडियाच्या व्यवस्थापकपदी निवड

मुंबईत मराठी माणूस खरंच श्रीमंत झाला की फक्त 'उपरा'? 25 वर्षांच्या सत्तेचा लेखाजोखा अन् वास्तव; आगामी निवडणुकीत कोणाला कौल?

SCROLL FOR NEXT