नवी दिल्ली: भारत आणि पाकिस्तान या दोन्ही देशांनी युद्धविराम करण्यासाठी सहमती दर्शवली असल्याची माहिती समोर आली आहे. आज (शनिवारी) सायंकाळी पाज वाजेपासून या दोन्ही देशांनी सर्व प्रकारच्या मिलिटरी ऑपरेशन थांबविण्याचा निर्णय घेतला आहे, अशी माहिती परराष्ट्र सचिव विक्रम मिस्री यांनी दिली. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ड्रम्प यांनी यासाठी मध्यस्थी केली असून, त्याला यश आले आहे.
"पाकिस्तानच्या डिजीएमओ यांनी भारतीय डिजीएमओ यांना दुपारी साडे तीन वाजता फोन केला होता. दोन्ही देशांनी जमीन, जल आणि हवाई मार्गे सुरु असलेले हल्ले आणि लष्करी कारवाई थांबविण्याबाबत सहमती दर्शवली आहे. याबाबत १२ मे रोजी पुन्हा चर्चा होणार आहे", अशी माहिती परराष्ट्र सचिव विक्रम मिस्त्री यांनी दिली.
पाकिस्तानचे उप-पंतप्रधान इशाक दार यांनी एक्सवर दोन्ही देशातील शस्त्रसंधीबाबत माहिती दिली आहे.
"गेल्या ४८ तासांपासून मी आणि उपराष्ट्राध्यक्ष जेडी व्हॅन्स भारतीय आणि पाकिस्तानी पंतप्रधान, परराष्ट्र मंत्री, राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार यांच्याशी चर्चा करत होतो. दोन्ही देशांनी शस्त्रसंधी करण्यावर एकमत दर्शवले आहे. दोन्ही देशांच्या पंतप्रधानांनी शांततेचा मार्ग निवडल्याबाबत आम्ही त्यांचे कौतुक करतो", अशी माहिती अमेरिकेचे परराष्ट्र सचिव मार्को रिबियो यांनी एक्सवरुन दिली आहे.
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी देखील याबाबत एक्सवरुन दोन्ही देशांतील शस्त्रसंधीची माहिती दिली आहे.
भारताने पाकिस्तानात ऑपरेशन सिंदूर राबविल्यानंतर बिथरलेल्या पाकिस्तानकडून भारतावर भ्याड हल्ले सुरु केले होते. भारतातील विविध ठिकाणांवर पाकिस्तानने हल्ले करण्याचा प्रयत्न केला. भारतीय लष्कराने हे हल्ले यशस्वीपणे परतवून लावले पण, काही प्रमाणात देशाच्या विविध भागात नुकसान झाले. दरम्यान, दोन्ही देशांचे शनिवारी सायंकाळी पाच वाजेपासून शस्त्रसंधीबाबत एकमत झाले आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.