Rahul gandhi
Rahul gandhi 
देश

सरकारने झोपा काढल्या

Dainik Gomantak

नवी दिल्ली

चीनला ठोस प्रत्युत्तर देण्यासाठी राजकीय सहमतीच्या हेतूने सरकारने बोलावलेल्या सर्वपक्षीय बैठकीआधीच काँग्रेसने सरहद्दीवरील हिंसक घटनाक्रमांनंतर मोदी सरकारवर प्रहार केला. चीन सुनियोजित हल्ला करत असताना सरकार झोपा काढत राहिले आणि सैनिकांना त्याची किंमत चुकवावी लागली, असा घणाघाती आरोप काँग्रेस नेते राहुल गांधींनी केला.
राहुल गांधींनी खरमरीत शब्दांत ट्विट करून सरकारवर टीकास्त्र
सोडले. ‘आता स्पष्ट झाले आहे, की गलवानमध्ये झालेला चिनी हल्ला पूर्णपणे पूर्वनियोजित होता; परंतु सरकार झोपा काढत राहिले आणि समस्या नाकारत राहिले. याची किंमत आपल्या हुतात्मा झालेल्या जवानांनी चुकवली’, असे आक्रमक ट्विट केले; तसेच सरकारमधील मंत्री पंतप्रधान मोदींना वाचविण्यासाठी ओळीने खोटे बोलत असल्याचा टोलाही राहुल यांनी लगावला. या खोटेपणातून हुतात्म्यांचा अपमान केला जाऊ नये, असेही आवाहन त्यांनी केले.
चिनी घुसखोरीवरून राहुल गांधींनी मोदी सरकारवर लक्ष्य करणे चालविले आहे. गलवान खोऱ्यात २० भारतीय जवान हुतात्मा होण्याला कोण जबाबदार आहे, असा सवाल काल राहुल यांनी केला होता; तसेच सरहद्दीवर नेमके काय झाले, यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी मौन का आहेत, अशीही खोचक विचारणा राहुल यांनी केली होती.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Loksabha Election 2024 : दोन्‍ही जागा ‘इंडिया’च जिंकणार! विरियातो फर्नांडिस

Siolim News : देशाच्या अधोगतीस काँग्रेस जबाबदार : मुख्यमंत्री प्रमोद सावंत

Israel Hamas War: इस्रायलचा गाझावर पुन्हा हवाई हल्ला, अनेक घरांवर डागली क्षेपणास्त्रे; लहान मुलांसह 13 जणांचा मृत्यू

Goa News : राज्यात ७० टक्क्यांहून अधिक मतदान अपेक्षित! सदानंद शेट तानावडे

Crime News : काणकोणात बारचालकाचा संशयास्पद मृत्यू; मृतदेहाजवळ गावठी बॉम्ब, काडतुसेही सापडल्याने तर्कवितर्क

SCROLL FOR NEXT