Father's position higher than heaven, says Jharkhand High Court Dainik Gomantak
देश

'बापाचे स्थान स्वर्गापेक्षा उंच,' बाप-लेकाच्या वादात हायकोर्टाकडून महाभारताचा संदर्भ

Father-Son controversy: पुढे त्यांनी एका शास्त्रवचनातून देखील उद्धृत केले: “वडील तुमचा देव आणि आई हा तुमचा स्वभाव आहे. ते बीज आहेत तुम्ही रोपटे आहात.”

Ashutosh Masgaunde

'Father's position higher than heaven', reference to Mahabharata by Jharkhand High Court in father-son controversy:

एक व्यक्ती आणि त्याचे वडील यांच्यातील वादाच्या प्रकरणात निकाल देताना झारखंड उच्च न्यायालयाने महाभारत आणि धर्मग्रंथांचा हवाला देत मुलाची त्याच्या पालकांप्रती असलेली भूमिका अधोरेखित केली आहे.

न्यायमूर्ती सुभाष चंद यांनी यक्ष देवाच्या प्रश्नांवर युधिष्ठिराच्या उत्तरांचा उल्लेख केला आहे. "पिता स्वर्गापेक्षा वरचा आहे" हे महाभारतातील ज्येष्ठ पांडव भावाचे विधान आहे.

देवकी साओ या 60 वर्षीय व्यक्तीने कोडरमा येथील कौटुंबिक न्यायालयात आपला धाकटा मुलगा मनोज साओ याच्याकडून देखभाल खर्च मिळावा यासाठी याचिका दाखल केली होती. न्यायालयाने त्या मुलाला त्याच्या वृद्ध वडिलांना दरमहा ३ हजार रुपये देण्याचे निर्देश दिले.

आपल्या वडिलांकडे उत्पन्नाचे अनेक स्त्रोत आहेत असा दावा करून, मनोजने कौटुंबिक न्यायालयाच्या आदेशाला आव्हान देत उच्च न्यायालयात धाव घेतली.

यावर न्यायमूर्ती चंद यांनी निरीक्षण केले की, आई-वडिलांची काळजी घेणे हे मुलाचे कर्तव्य आहे.

न्यायालयाने आपल्या आदेशात म्हटले आहे की, “महाभारतात यक्षाने युधिष्ठिराला विचारले: ‘पृथ्वीपेक्षा मोठे काय आहे? स्वर्गापेक्षा उंच काय आहे?’ युधिष्ठिराने उत्तर दिले: ‘माता पृथ्वीपेक्षा मोठी आहे; तर पिता स्वर्गापेक्षा उंच आहे.”

बाप जरी काहीही कमवत असला तरी आपल्या वृद्ध वडिलांची देखभाल करणे हे मुलाचे धार्मिक कर्तव्य आहे. असेही न्यायमूर्ती चंद यांनी आदेशात नमूद केले आहे.

पुढे त्यांनी एका शास्त्रवचनातून देखील उद्धृत केले: “वडील तुमचा देव आणि आई हा तुमचा स्वभाव आहे. ते बीज आहेत तुम्ही रोपटे आहात.”

या खटल्याचा निकाल देताना न्यायालयाने मुलगा मनोज साओने दाखल केलेली याचिका फेटाळून लावत वडिलांना दरमहा तीन हजार रुपये देण्याचे कौटुंबिक न्यायालयाचे आदेश कायम ठेवले.

यापूर्वी पतीकडून भरणपोषणाची मागणी करणाऱ्या एका अस्वस्थ पत्नीच्या याचिकेतही आदेशात न्यायमूर्ती चंद यांनी धार्मिक ग्रंथांचा हवाला दिला होता.

सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाचा हवाला देत न्यायमूर्ती चंद यांनी सांगितले की, विभक्त होण्याचे भक्कम न्याय्य कारण असल्याशिवाय पत्नीने लग्नानंतर पतीच्या कुटुंबासोबत असणे अपेक्षित आहे. त्यांनी यासाठी ऋग्वेद, यजुर्वेद आणि मनुस्मृतीचे दाखले दिले होते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Vijay Deverakonda Accident: मोठी दुर्घटना टळली! विजय देवरकोंडाचा कार अपघात, अज्ञात वाहनाने मागून दिली जोरदार धडक VIDEO

IND vs WI: दुसऱ्या कसोटीत जडेजा रचणार इतिहास! कपिल देवच्या 'खास क्लब'मध्ये एंट्रीची नामी संधी; कराव्या लागणार फक्त 'इतक्या' धावा

Viral Video: शाळेला दांडी मारुन रस्त्यावर 'आशिकी'! दोन मुलींसोबत रोमान्स करणाऱ्या पठ्ठ्याचा व्हिडिओ व्हायरल; नेटकरी म्हणाले, 'अशा सडकछाप आशिकांनीच...'

Coldrif Cough Syrup Bans: मुलांचा बळी घेणाऱ्या 'त्या' जीवघेण्या कफ सिरपवर गोव्यात बंदी, 'FDA'कडून आदेश जारी

IND vs PAK मॅचमधील 'या' घटनेनंतर पाकिस्तानी खेळाडू अडचणीत, ICC च्या नियमांचं उल्लंघन करणं पडलं भारी; काय घडलं नेमकं?

SCROLL FOR NEXT