पुणे: मान्सूनची प्रगती सुरू असतानाच अरबी समुद्र आणि बंगालच्या उपसागरावर उद्भवलेल्या वैशिष्ट्यपूर्ण स्थितीमुळे देशातील अनेक राज्यांत पावसात मोठी तूट नोंदली गेली आहे. अरबी समुद्रावर वायव्येकडून येणाऱ्या कोरड्या वाऱ्यांनी मोसमी वाऱ्यांना रोखून धरले असतानाच, दुसरीकडे बंगालच्या उपसागरावरील बाष्प थेट प्रशांत महासागराकडे खेचले जात आहे.
प्रशांत महासागरात तयार झालेल्या ‘एल निनो’चा प्रभाव जूनपासूनच मान्सूनवर पडू लागल्याचे हवामान शास्त्रज्ञांचे म्हणणे आहे. देशात एक ते १६ जूनदरम्यान सरासरीच्या तुलनेत ३५ टक्के कमी पाऊस नोंदला गेला. महाराष्ट्रासह देशातील नऊ राज्यांमध्ये पावसाची तूट ६० टक्क्यांपेक्षा जास्त आहे. वातावरणात तीन किलोमीटरच्या वर वायव्येकडून येणाऱ्या कोरड्या वाऱ्यांमुळे अरबी समुद्र आणि लगतच्या राज्यांमध्ये ढगांच्या निर्मितीत अडथळे निर्माण झाले आहेत.
प्रशांत महासागरात विकसित झालेल्या ‘एल निनो’मुळे वाऱ्यांच्या जागतिक प्रवाहांमध्ये बदल होऊन मोसमी वाऱ्यांचा प्रवाह क्षीण झाला आहे. ‘एमजेओ’ दीर्घकाळ प्रशांत महासागरावर सक्रिय राहणे आणि मोसमी वाऱ्यांचा प्रवाह क्षीण होणे हा ‘एल निनो’चा मान्सूनवर झालेला परिणाम म्हणता येईल. - डॉ. रॉक्सी कोल, वरिष्ठ शास्त्रज्ञ, आयआयटीएम
नवी दिल्ली
समुद्रातील तापमान आणि वायूमंडळाच्या स्थितीमधील बदलामुळे (एल-निनो) मान्सूनचा पाऊस लांबला आहे. या पार्श्वभूमीवर ‘एल-निनो’चा सर्वाधिक फटका बसणाऱ्या राज्यांवर लक्ष केंद्रित करण्याचे निर्देश कृषिमंत्री शिवराजसिंह चौहान यांनी दिले आहेत. आपत्कालीन योजना तयार करण्याच्या सूचनाही चौहान यांनी मंगळवारी झालेल्या उच्चस्तरीय बैठकीत दिल्या.
पिकांच्या हिशेबाने राज्यांनी पर्यायी योजना तयार करावी.
संवेदनशील जिल्ह्यांसाठी वेगळी रणनीती.
पिकांच्या पर्यायी व्यवस्थेकडे विशेष लक्ष देणे गरजेचे.
वैज्ञानिक विश्लेषणावर भर द्यायला हवा.
कापूस तसेच डाळवर्गीय पिकांच्या लागवडीवर भर देण्याची गरज.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.