Gujarat Earthquake  Dainik Gomantak
देश

Earthquake: अमृतसरसह पंजाबच्या काही भागात भूकंपाचा जोरदार धक्का, रिश्टर स्केलवर 4.1 तीव्रता

नॅशनल सेंटर फॉर सिस्मॉलॉजी (NCS) नुसार, भूकंपाचा केंद्रबिंदू पंजाब, पाकिस्तानमध्ये होता. भूकंपाची खोली 120 किमी असल्याचे सांगण्यात आले.

दैनिक गोमन्तक

अमृतसरसह पंजाबच्या (Panjab) काही भागात आज सकाळी 3:42 वाजता भूकंपाचे सौम्य धक्के जाणवले. त्याची तीव्रता रिश्टर स्केलवर 4.1 इतकी मोजली गेली. नॅशनल सेंटर फॉर सिस्मॉलॉजी (NCS) नुसार, भूकंपाचा केंद्रबिंदू पंजाब, पाकिस्तानमध्ये होता. भूकंपाची खोली 120 किमी असल्याचे सांगण्यात आले आहे.

यापूर्वी शनिवारी नेपाळमध्ये 5.4 रिश्टर स्केल तीव्रतेच्या भूकंपाचे धक्के दिल्ली आणि राष्ट्रीय राजधानी क्षेत्र (NCR) ते उत्तराखंडपर्यंत जाणवले . हा भूकंप उत्तराखंडमधील पिथौरागढच्या पूर्व-दक्षिणपूर्व 101 किमी अंतरावर झाला. अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे.

याआधी, शनिवारी सायंकाळी ४.१५ वाजता उत्तराखंडमध्ये ३.४ रिश्टर स्केलचा भूकंप झाला, ज्याचा केंद्रबिंदू पौरी गढवाल प्रदेशात होता. नॅशनल सेंटर फॉर सिस्मॉलॉजीच्या आकडेवारीनुसार, 8 ते 12 नोव्हेंबर दरम्यान उत्तराखंड-नेपाळ सीमेला लागून असलेल्या हिमालयीन प्रदेशात वेगवेगळ्या तीव्रतेचे किमान आठ भूकंप झाले आहेत. पिथौरागढचे आपत्ती व्यवस्थापन अधिकारी बीएस महार यांनी 'पीटीआय' या वृत्तसंस्थेला सांगितले की, भूकंपाचा केंद्रबिंदू नेपाळच्या सिलांग शहरापासून तीन किलोमीटर अंतरावर होता, मात्र त्याचे धक्के भारत, चीन आणि नेपाळमध्ये जाणवले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

मोपा विमानतळावर कस्टम विभागाची मोठी कारवाई! 3.16 कोटींचा अंमली पदार्थ जप्त; बँकॉकहून आलेल्या प्रवाशाला बेड्या

Rivona: सफर गोव्याची! पांडवांचा पदस्पर्श लाभलेले, देवदेवतांची प्राचीन मंदिरे असणारे तपस्वींचे ऋषीवन; हिरवेकंच 'रिवण'

Youth Migration: भारतीयांना खुणावतेय परदेशातील करिअर! 52 टक्के तरुणांचा देश सोडण्याचा विचार; 'टर्न ग्रुप'चा खुलासा

किंग कोहली अन् रोहितच्या फौजेचं व्यवस्थापन आता गोमंतकीयाच्या हाती, महेश देसाईंची टीम इंडियाच्या व्यवस्थापकपदी निवड

मुंबईत मराठी माणूस खरंच श्रीमंत झाला की फक्त 'उपरा'? 25 वर्षांच्या सत्तेचा लेखाजोखा अन् वास्तव; आगामी निवडणुकीत कोणाला कौल?

SCROLL FOR NEXT