Congress Dainik Gomantak
देश

भाजप विरोधात कॉंग्रेसची सोशल मीडियावर मोहीम सुरू

काँग्रेसच्या सोशल मीडिया विभागाचे अध्यक्ष रोहन गुप्ता म्हणाले की, भाजपच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकार लोकशाहीचा आवाज दाबण्याचा प्रयत्न करत आहे.

दैनिक गोमन्तक

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पंजाब दौऱ्यात सुरक्षेचा भंग झाल्यानंतर सुरू झालेला राजकीय वाद अद्याप संपलेला नाही. या मुद्द्यावरून भाजप आणि कॉंग्रेसचे नेते एकमेकावर चिखलफेक करत आहेत. भाजप (BJP) हा मुद्दा जनतेत जोरात मांडत असतानाच आता काँग्रेसने (Congress) उलट रणनीती म्हणून सोशल मीडियावर मोहीम सुरू केली आहे. (Congress launches a social media campaign against BJP)

काँग्रेसच्या सोशल मीडिया विभागाचे अध्यक्ष रोहन गुप्ता म्हणाले की, भाजपच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारचा उद्देश केवळ देशाचे लक्ष खर्‍या मुद्द्यांवरून वळवण्याचा नाही तर पंजाबमधील मुख्यमंत्री चरणजीत सिंग यांच्या नेतृत्वाखालील सरकारला बदनाम करण्याचाही आहे.

ते पुढे म्हणाले की, भाजपच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकार (Central Government) लोकशाहीचा आवाज दाबण्याचा प्रयत्न करत आहे. काँग्रेसने आपल्या सोशल मीडिया मोहिमेत नोटाबंदी, साथीच्या रोगाचे व्यवस्थापन, लॉकडाऊन दरम्यान स्थलांतरित मजुरांची दुर्दशा, शेतकऱ्यांचे प्रश्न, लखीमपूर खेरी हिंसाचार आणि इतर मुद्द्यांवर प्रकाश टाकला आहे. गेल्या सात वर्षांपासून देश ज्या खर्‍या समस्यांना तोंड देत आहे, त्याकडे देशाचे लक्ष वेधणे हा काँग्रेस पक्षाचा उद्देश आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Camel Tear: उंटाचे अश्रू सापाच्या विषावर गुणकारी, एक थेंब 26 सापांच्या विषावर ठरेल जालीम औषध; अभ्यासातून स्पष्ट

CO2 To Alcohol: विज्ञानाचा चमत्कार! कार्बनचे अल्कोहोलमध्ये रुपांतर करण्यात कोरियाच्या वैज्ञानिकांना यश

Anaya Bangar: 'पुरुषाच्या देहात एक कोमल स्त्री जगत होती'; अनाया बांगरने जागवल्या लिंगबदल काळातील नाजूक आठवणी

Goa Crime: पार्किंगचा वाद विकोपाला गेला, पर्ये सत्तरीत दोन तरुणांमध्ये तुंबळ हाणामारी; एकाला अटक

Pandharpur Wari: गोव्यातून पंढरपूरला जाऊन यायला दीड महिना लागायचा, परतल्यावर गावातील लोक भजन करीत त्यांना घरी न्यायचे

SCROLL FOR NEXT