Korba Flood Rescue Dainik Gomantak
देश

VIDEO: पिकनिकसाठी गेले अन् पुराच्या पाण्यात अडकले! 15 तास मृत्यूशी झुंज, तिघांचा थरारक रेस्क्यू; व्हिडिओ समोर

Korba Flood Rescue: छत्तीसगडमधील कोरबा जिल्ह्यात देवपहरी धबधब्याजवळ पिकनिकसाठी गेलेल्या तीन तरुणांवर तब्बल 15 तास जीव मुठीत धरून राहण्याची वेळ आली.

Sameer Amunekar

छत्तीसगडमधील कोरबा जिल्ह्यात देवपहरी धबधब्याजवळ पिकनिकसाठी गेलेल्या तीन तरुणांवर तब्बल 15 तास जीव मुठीत धरून राहण्याची वेळ आली. मुसळधार पावसानंतर नदीच्या पाण्याची पातळी अचानक वाढल्याने तिघेही नदीच्या मध्यभागी असलेल्या एका छोट्या बेटावर अडकले. पाण्याचा प्रवाह वेगाने वाढत असल्याने त्यांना स्वतःहून किनाऱ्यावर परतणे शक्य नव्हते. अखेर पोलीस, एसडीआरएफ आणि स्थानिक नागरिकांच्या मदतीने तिघांचे सुरक्षित रेस्क्यू करण्यात आले.

पावसाने अचानक वाढला नदीचा प्रवाह

मिळालेल्या माहितीनुसार, हे तिन्ही तरुण सोमवारी देवपहरी वॉटरफॉल परिसरात फिरण्यासाठी आणि पिकनिक करण्यासाठी गेले होते. परिसरात पावसाला सुरुवात झाल्यानंतर काही वेळातच नदीच्या पाण्याची पातळी झपाट्याने वाढू लागली. सुरुवातीला परिस्थिती सामान्य वाटत असली तरी काही वेळात नदीचा प्रवाह इतका वेगवान झाला की तिघांना परत किनाऱ्यावर येण्याची संधीच मिळाली नाही. त्यामुळे त्यांनी नदीच्या मध्यभागी असलेल्या बेटाचा आधार घेतला.

रात्रभर बेटावरच काढली

पाणी वाढत असल्याने तरुणांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं. रात्री अंधार झाल्यानंतर रेस्क्यू करणेही धोकादायक ठरत होते. त्यामुळे तिघांना संपूर्ण रात्र त्याच बेटावर काढावी लागली. जवळपास 15 तास ते मदतीच्या प्रतीक्षेत होते. पाऊस, थंडी, भूक आणि पाण्याचा वाढता प्रवाह यामुळे त्यांची परिस्थिती बिकट झाली होती. मात्र, तिघांनीही धीर न सोडता सकाळपर्यंत सुरक्षित राहण्याचा प्रयत्न केला.

पोलीस आणि एसडीआरएफकडून बचावकार्य

घटनेची माहिती प्रशासनाला मिळताच पोलीस आणि एसडीआरएफच्या पथकाला घटनास्थळी पाठवण्यात आलं. नदीचा प्रवाह कमी होण्याची वाट पाहत बचावकार्याची तयारी करण्यात आली. परिस्थिती काहीशी नियंत्रणात आल्यानंतर बचाव पथकाने स्थानिक नागरिकांच्या मदतीने रेस्क्यू ऑपरेशन सुरू केलं. दोरीच्या सहाय्याने तिन्ही तरुणांना नदीतील बेटावरून बाहेर काढण्यात आलं. अखेर सर्वांना सुरक्षित ठिकाणी आणण्यात यश आलं.

सुदैवाने तिघेही सुखरूप

सुमारे 15 तास चाललेल्या या थरारक बचाव मोहिमेनंतर तिघांनाही सुखरूप बाहेर काढण्यात आलं. या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र, मुसळधार पावसाच्या काळात पर्यटनस्थळी जाताना किती मोठा धोका निर्माण होऊ शकतो, याची जाणीव या घटनेमुळे पुन्हा झाली आहे.

धबधबे आणि नद्यांजवळ जाणाऱ्यांना प्रशासनाचा इशारा

पावसाळ्यात छत्तीसगडमधील अनेक नद्या, नाले आणि धबधबे दुथडी भरून वाहत आहेत. अशा परिस्थितीत पाण्याचा प्रवाह काही मिनिटांत बदलू शकतो. त्यामुळे नदीच्या पात्रात, बेटांवर किंवा धबधब्यांच्या अगदी जवळ जाणं धोकादायक ठरू शकतं. देवपहरी परिसरातील घटनेनंतर प्रशासनाने पर्यटकांना विशेष खबरदारी घेण्याचं आवाहन केलं आहे. पावसाळ्यात नदी किंवा धबधब्याजवळ पाणी वाढत असल्याचे दिसताच सुरक्षित ठिकाणी जाणे आणि धोकादायक ठिकाणी जाणे टाळणे गरजेचे आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Omkar Elephant Goa: ओंकार आला दारी; सीमेवरती दहशत भारी!

CM Pramod Sawant Meeting: समन्वयातून राज्यातील प्रलंबित प्रश्न सोडवा; मुख्यमंत्र्यांचे वरिष्ठ केंद्रीय अधिकाऱ्यांसोबतच्या बैठकीत निर्देश

'E20 Petrol' विरोधात 'आप'चा एल्गार; वाहनचालकांच्या तक्रारींसाठी व्‍हॉट्सॲप क्रमांक जारी

क्रिकेटविश्वात खळबळ! स्टार खेळाडूला पोलिसांनी बेड्या ठोकल्या, कसोटी मालिकेदरम्यान कारवाई; नेमकं घडलं काय? VIDEO

खरी कुजबुज: केजरीवालांच्या दाव्‍यावर नागरिकांचा विश्‍‍वास!

SCROLL FOR NEXT