Court Dainik Gomantak
देश

मुलाच्या मालमत्तेवर पालकांचा हक्क असतो का? मुलगा आणि मुलीसाठी वेगवेगळे आहेत नियम, जाणून घ्या

Hindu Succession Act: कायद्यानुसार पालकांना त्यांच्या मुलांच्या मालमत्तेवर स्वयंचलित अधिकार नसतात. पण, अशी काही विशिष्ट उदाहरणे आहेत ज्यात ते त्यावर दावा करू शकतात.

Pramod Yadav

Hindu Succession Act

पालकांच्या मालमत्तेवर मुलांचा हक्क असतो याची सर्वांना कल्पान आहे. पण, मुलांच्या मालमत्तेवर पालक मालकी हक्क सांगू शकतात का? या प्रश्नाचे उत्तर अनेकांना माहिती नाही. अशा प्रकरणांसाठी कायद्याचे वेगळे नियम वेगळे असून, स्त्री आणि पुरुषांसाठी हे नियम बदलतात. हिंदू उत्तराधिकार कायद्यात केलेल्या महत्त्वाच्या सुधारणांनंतर, भारतीय उत्तराधिकार कायद्यांतर्गत पालकांना त्यांच्या मुलांच्या मालमत्तेवर हक्क सांगता येतो का? याची माहिती आपण घेणार आहोत.

सर्वसाधारण नियम

कायद्यानुसार पालकांना त्यांच्या मुलांच्या मालमत्तेवर स्वयंचलित अधिकार नसतात. पण, अशी काही विशिष्ट उदाहरणे आहेत ज्यात ते त्यावर दावा करू शकतात. 2005 मध्ये दुरुस्त केलेला हिंदू उत्तराधिकार कायद्यातील अटींनुसार, मृत्यूपत्राशिवाय मुलाचा मृत्यू झाल्यास पालकांना त्यांच्या मुलाच्या मालमत्तेचा वारसा मिळू शकतो.

पालकांना मुलाच्या मालमत्तेत हक्क केव्हा मिळतो?

हिंदू उत्तराधिकार कायद्यानुसार एखाद्या प्रौढ, अविवाहित मुलाचे मृत्यूपत्र न करता निधन झाल्यास पालकांना मुलाच्या मालमत्तेचा वारसा मिळण्याचा हक्क आहे. महत्त्वाची बाब म्हणजे पालकांना मुलाच्या मालमत्तेची पूर्ण मालकी मिळत नाही. तर, आई आणि वडील दोघांनाही मालमत्तेचे वेगळे - वेगळे अधिकार दिले जातात. याचा अर्थ असा की वारसा हक्क दोन पालकांमध्ये सामायिक केले जातात परंतु दोघांपैकी एकाला पूर्ण मालकी दिली जात नाही.

आई प्रथम वारस

मुलाचा अकाली मृत्यू झाल्यास हिंदू उत्तराधिकार कायदा प्रथम वारस म्हणून आईला प्राधान्य देतो. तर वडिलांना दुसरा वारस म्हणून मालमत्तेवर दावा करण्याचा अधिकार आहे. आई हयात नसेल किंवा वारसा हक्क सांगू शकत नसेल, तर दुसरा वारस म्हणून वडिलांचे हक्क लागू होतात. ज्या प्रकरणांमध्ये वडील आणि इतर दावेदार वारसाहक्कासाठी इच्छुक आहेत, वडील इतर वारसांसोबत समान रीतीने इस्टेट शेअर करतील.

मुलगा आणि मुलीसाठी वेगवेगळे नियम

मुलाच्या मालमत्तेवर पालकांचे वारसा हक्क देखील मूल स्त्री किंवा पुरुष यावर अवलंबून असतात. हिंदू उत्तराधिकार कायद्यात या लिंग-आधारित भेदांची रूपरेषा स्पष्ट करण्यात आली आहे.

मुलगा: जर मुलगा मृत्यूपत्र न करता मरण पावला, तर आई ही पहिली वारस असते, त्यानंतर वडील असतात. पण, जर आई हयात नसेल, तर वडील, इतर संभाव्य वारसांचा, इस्टेटमध्ये समान वाटा असतो.

मुली: याउलट, जर एखाद्या मुलीचे मृत्युपत्राशिवाय निधन झाले, तर तिची मालमत्ता प्रामुख्याने तिच्या मुलांना आणि तिच्या पतीनंतर वारसांना मिळते. मृत मुलीचे पालक सामान्यत: तिच्या मालमत्तेचा वारसा घेण्यात सर्वात शेवटी असतात.

तसेच, मुलगी अविवाहित असल्यास, तिच्या पालकांना तिचे वारस मानले जाते. तथापि, जर मुलगी विवाहित असेल आणि तिचे निधन झाले असेल तर, वारसा प्रणाली तिच्या मुलांना (असल्यास) आणि नंतर तिच्या पतीला प्राधान्य दिले जाते बदलते. या वारसांना त्यांचा वाटा मिळाल्यानंतरच पालकांना मालमत्तेचा हक्क मिळतो.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

India Nuclear Weapons Report 2026: भारताच्या अण्वस्त्रांबाबत अमेरिकन संस्थेचा मोठा दावा! भारतीय शस्त्रागारात 190 अण्वस्त्रे, क्षेपणास्त्रांचे वेगाने आधुनिकीकरण सुरु

Duleep Trophy Winner 2026: 13 वर्षांनंतर चॅम्पियनशिपचा महासंग्राम जिंकला! ईस्ट झोनने जिंकली दुलीप ट्रॉफी; ईशान किशन ठरला विजयाचा 'हिरो' VIDEO

Canacona Coarse Farming: पावसाने ऐन पेरणीच्या काळात दिला दगा; काणकोणातील भरड शेतीला मोठा फटका, 2520 हेक्टरपैकी मोठ्या क्षेत्रावर पेरणीच नाही

Goa Politics: 'गोवा फर्स्ट' 2027चा नवा राजकीय पर्याय ठरणार? सरदेसाईंचे संकेत; काँग्रेससोबतची युतीची बोलणी सध्या स्थगित

Houthi Missile Attack Saudi Arabia: हुतींच्या सौदीवरील हल्ल्याने बिथरला पाकिस्तान, इराणला दिली तंबी; मुस्लीम जगतात खळबळ

SCROLL FOR NEXT