Jawaharlal Nehru
Jawaharlal Nehru Dainik Gomantak
देश

Video: फाळणीचा व्हिडीओ शेअर करत भाजपने डागली नेहरुंवर तोफ

दैनिक गोमन्तक

Independence Day: भारताच्या 'विभाजन विभिषिका मेमोरियल डे' निमित्त, भाजपने काँग्रेसवर निशाणा साधत एक व्हिडिओ जारी केला आहे, ज्यामध्ये भाजपने 1947 च्या घटनांवर प्रकाश टाकला आहे. सात मिनिटांच्या या व्हिडिओमध्ये भारताच्या फाळणीसाठी जवाहरलाल नेहरुंना जबाबदार धरण्यात आले आहे. मोहम्मद अली जिना यांच्या नेतृत्वाखालील मुस्लिम लीगच्या पाकिस्तान निर्मितीच्या मागणीला बळी पडल्याचा ठपका नेहरुंवर ठेवण्यात आला आहे.

दरम्यान, या व्हिडिओवरुन काँग्रेसने (Congress) प्रत्युत्तर दिले आहे. काँग्रेसचे सरचिटणीस जयराम रमेश म्हणाले की, '14 ऑगस्ट हा 'फाळणी विभिषिका स्मृती दिन' म्हणून साजरा करण्यामागील पंतप्रधानांचा खरा हेतू आपल्या राजकीय फायद्यासाठी अत्यंत वेदनादायक ऐतिहासिक घटनांचा वापर करणे हा आहे.'

त्याचवेळी ते म्हणाले, 'आधुनिक काळातील सावरकर आणि जीना देशाचे विभाजन करण्याचे प्रयत्न आजही करत आहेत.'

दुसरीकडे, गेल्या वर्षी 14 ऑगस्ट रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी (Prime Minister Narendra Modi) यांनी घोषणा केली होती की, 1947 च्या फाळणीदरम्यान भारतीयांनी भोगलेल्या दु:खाची आणि बलिदानाची देशाला आठवण करुन देण्यासाठी दरवर्षी 14 ऑगस्ट हा दिवस 'विभाजन विभिषिका स्मृती दिन' म्हणून साजरा केला जाईल. रविवारी सकाळी पंतप्रधान मोदींनीही याबाबत ट्विट केले आहे.

तसेच, भाजपचा (BJP) व्हिडिओ सिरिल जॉन रॅडक्लिफ दाखवतो, ज्यांच्या विभाजनाचा नकाशा जवळपास पंजाब आणि बंगालला अर्ध्या भागात विभाजित करतो. यासोबतच भारतीय सांस्कृतिक वारशाची माहिती नसलेल्या व्यक्तीला अवघ्या काही आठवड्यात भारताचे विभाजन कसे होऊ दिले, असा प्रश्नही विचारण्यात आला. फाळणीची भीषणता सांगणाऱ्या व्हॉइस-ओव्हरसह नेहरुंचे व्हिज्युअल संपूर्ण व्हिडिओमध्ये दाखवले आहेत.

भाजपने हा व्हिडीओ ट्विट करत लिहिले की, 'ज्यांना भारताचा सांस्कृतिक वारसा, सभ्यता, मूल्ये, तीर्थक्षेत्रांची माहिती नव्हती, त्यांनी अवघ्या तीन आठवड्यात शतकानुशतके एकत्र राहणाऱ्या लोकांमधील सीमारेषा आखून दिली. या फुटीरतावादी शक्तींविरुद्ध लढण्याची जबाबदारी त्या वेळी कुठे होती?'

शिवाय, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते जयराम रमेश यांनी या व्हिडीओवर जोरदार प्रहार करत एकामागून एक ट्विट करत म्हटले की, 'सत्य हे आहे की, द्विराष्ट्राचा सिध्दांत सावरकरांनी दिला होता.'

जयराम रमेश यांनी ट्विटमध्ये पुढे म्हटले की, 'सत्य हे आहे की, द्विराष्ट्राचा सिध्दांत हा सावरकरांनी दिला आणि तो जीनांनी ते पुढे नेला. पटेल यांनी पुढे असेही म्हटले की, 'मला वाटते की, फाळणी मान्य केली नसती तर तर भारताचे अनेक तुकडे झाले असते.'

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Kanguva: 'कंगुवा'चा टीझर घालतोय धूमाकूळ; गोव्यासह ‘या’ खास ठिकाणी झालं बीग बजेट चित्रपटाचं शूटिंग

Goa Congress: सार्दिन घरात बसून विरियातोंचा प्रचार करतात; पाटकरांनी टोचले MP फ्रान्सिस यांचे कान

Prajwal Revanna: आम्ही व्हिसा दिला नाही… प्रज्वल रेवन्ना जर्मनीला पळून गेल्याच्या प्रश्नावर परराष्ट्र मंत्रालयाची प्रतिक्रिया

Shashi Tharoor In Goa: भाजपला धक्का बसणार, 400 नव्हे 200 पार करने देखील जड जाणार - थरुर

Goa Police : २४ वर्षांपासून अजूनही ‘ते’ न्यायाच्या प्रतिक्षेत; बडतर्फ पोलिसाची व्यथा

SCROLL FOR NEXT