PM Kisan Scheme Dainik Gomantak
देश

पीएम किसान सन्मान निधीसाठी करावी लागेल बायोमेट्रिक ई-केवायसी

केंद्र सरकारने ई-केवायसी करण्याची अंतिम मुदत वाढवली आहे, परंतु किसान पोर्टलवर eKYC चा पर्याय उपलब्ध नाही.

दैनिक गोमन्तक

नुकताच केंद्र सरकारने (Central Government) पंतप्रधान किसान सन्मान निधीबाबत (Pradhan Mantri Kisan Samman Nidhi) महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे . ज्या अंतर्गत किसान निधीच्या पात्र शेतकऱ्यांसाठी अनिवार्य e-KYC (E-KYC) करण्याची अंतिम मुदत 30 मार्च 2022 ते 22 मे 2022 पर्यंत वाढवण्यात आली. दरम्यान, केंद्र सरकारने एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. ज्यामध्ये केंद्र सरकारने मोबाईल नंबरवर येणार्‍या ओटीपीद्वारे ई-केवायसीची सुविधा तात्पुरती स्थगित केली आहे . त्यानंतर काही दिवस शेतकरी मोबाईल ओटीपीद्वारे ई-केवायसी करू शकणार नाहीत.

शेतकऱ्यांना आता बायोमेट्रिक ई-केवायसी करावे लागणार आहे

केंद्र सरकारने ई-केवायसी करण्याची अंतिम मुदत वाढवली आहे, परंतु किसान पोर्टलवर eKYC चा पर्याय उपलब्ध नाही. यानंतर आता शेतकऱ्यांना बायोमेट्रिक ई-केवायसी करावं लागणार आहे. पीएम किसान निधीच्या वेबसाइटवरही या संदर्भातील माहिती देण्यात आली आहे. ज्यानुसार नोंदणीकृत शेतकऱ्यांसाठी eKYC अनिवार्य आहे. OTP प्रमाणीकरणाद्वारे आधार आधारित eKYC तात्पुरते निलंबित करण्यात आले आहे. अशा परिस्थितीत बायोमेट्रिक प्रमाणीकरणासाठी जवळच्या CSC केंद्रांशी संपर्क साधा.

संगणक केंद्रावर आधारशी अंगठा जुळवला जाईल

बायोमेट्रिक ई-केवायसी करण्यासाठी शेतकऱ्यांना त्यांच्या जवळच्या संगणक केंद्रात जावे लागेल. या अंतर्गत शेतकऱ्यांना ई-केवायसी करण्याबाबत संगणक ऑपरेटरला माहिती द्यावी लागेल. यादरम्यान शेतकऱ्याला आधार कार्ड किंवा आधार क्रमांक सोबत ठेवावा लागेल. ज्यामध्ये ऑपरेटर बायोमेट्रिक मशिनद्वारे रेकॉर्ड केलेला अंगठ्याचा ठसा शेतकऱ्याच्या अंगठ्याशी जुळवणार आहे. जुळणी योग्य असल्यास, ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण केली जाईल.

सन्मान निधीच्या 11व्या हप्त्यासाठी प्रक्रिया सुरू आहे

पंतप्रधान किसान सन्मान निधीचा 11 वा हप्ता केंद्र सरकारकडून शेतकऱ्यांच्या खात्यावर पाठवला जाणार आहे. त्यासाठी नोंदणीकृत शेतकऱ्यांचे ई-केवायसी करण्याची प्रक्रिया सुरू आहे. खरे तर, प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना ही केंद्रीय योजना आहे. या योजनेअंतर्गत केंद्र सरकार देशभरातील सर्व जमीनधारक शेतकरी कुटुंबांना आर्थिक मदत करते. त्याअंतर्गत शेतकऱ्यांच्या खात्यावर दरवर्षी 6 हजार रुपये पाठवले जातात. ही रक्कम दरवर्षी 3 हप्त्यांमध्ये पाठवली जाते. त्यानुसार शेतकर्‍यांच्या खात्यावर एकावेळी 2000 रुपये पाठवले जातात.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Kendra Drishti Yog 2026: शुक्र-गुरुची गट्टी जमणार, पैसा आणि प्रेम दोन्ही मिळणार! केंद्र दृष्टी योग 'या' 4 राशींसाठी ठरणार वरदान

RO Water: आर.ओ.चं पाणी खरंच आरोग्यासाठी घातक? तज्ज्ञ डॉक्टरांनी स्पष्टच सांगितलं; अफवांवर विश्वास ठेवण्यापूर्वी जाणून घ्या

Budh Margi 2026: "तुमची स्वप्ने होणार पूर्ण, बुध ग्रहाचा मेगा धमाका'' 21 मार्चपासून 'या' 7 राशींच्या नशिबात मोठा राजयोग

High Court: 'रागाच्या भरात मुलगी बापावर बलात्काराचा आरोप कधीच करणार नाही', जन्मठेपेची शिक्षा कायम ठेवताना हायकोर्टाने ओढले ताशेरे; काय नेमकं प्रकरण?

डोळ्यांत पाणी अन् हृदयात धडधड... कुवेतमध्ये अडकलेल्या उर्वशी रौतेलाला विमानातचं कोसळलं रडू; युद्धजन्य स्थितीतील मांडली व्यथा VIDEO

SCROLL FOR NEXT