Bilkis Bano case | SC Dainik Gomantak
देश

Bilkis Bano case: 14 वर्षे शिक्षा भोगल्यानंतर सुटका कशी झाली? SC ने गुजरात सरकारवर उपस्थित केले गंभीर प्रश्न

उर्वरित कैद्यांना 14 वर्षांच्या कारावासानंतरही सुटका का मिळाली नाही, असा सवाल न्यायालयाने गुजरात सरकारला विचारला आहे.

गोमन्तक डिजिटल टीम

Bilkis Bano case: बिल्किस बानो प्रकरणातील दोषींच्या सुटकेवर सर्वोच्च न्यायालयाने प्रश्न उपस्थित केले आहेत. या दोषींना फाशीच्या शिक्षेनंतर जन्मठेपेची शिक्षा देण्यात आली होती. मग 14 वर्षे शिक्षा भोगल्यानंतर त्यांची सुटका कशी झाली? अशी विचारणा न्यायालयाने केली आहे.

उर्वरित कैद्यांना 14 वर्षांच्या कारावासानंतरही सुटका का मिळाली नाही, असा सवाल न्यायालयाने गुजरात सरकारला विचारला आहे.

2002 मध्ये गोध्रा दंगलीत बिल्किस बानोवर सामूहिक बलात्कार झाला होता. त्यांच्या कुटुंबातील 7 जणांची हत्या करण्यात आली होती. या प्रकरणात 11 जण दोषी आढळले होते.

देशातील तुरुंग कैद्यांनी भरलेली आहेत, मग त्यांना सुधारण्याची संधी का दिली जात नाही, असे सर्वोच्च न्यायालयाने म्हटले आहे. बिल्कीसच्या दोषींसाठी तुरुंग सल्लागार समिती कशाच्या आधारावर स्थापन करण्यात आली? असा सवाल देखील सुप्रीम कोर्टाने उपस्थित करत, सल्लागार समितीचा तपशील मागितला.

बिल्किस बानोच्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात पुढील सुनावणी आता 24 ऑगस्ट रोजी होणार आहे.

गुजरात सरकारच्या समितीच्या अहवालानंतर, 15 ऑगस्ट 2022 रोजी, बिल्किस बानो प्रकरणातील सर्व दोषींना मुदतीपूर्वी सोडण्यात आले. दोषींना जन्मठेपेची शिक्षा ठोठावण्यात आली होती, परंतु गेल्या वर्षी गुजरात सरकारने शिक्षा माफीच्या धोरणाखाली त्यांची सुटका केली. सुटका झालेल्यांपैकी काहींनी 15 वर्षे तर काहींनी 18 वर्षे तुरुंगात घालवली आहेत.

सर्व दोषींना वेळेपूर्वी सोडण्याच्या निर्णयाविरोधात बिल्किस बानो यांनी प्रथम उच्च न्यायालयात आणि नंतर सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली. गुजरात सरकारच्या निर्णयाविरोधात त्यांनी याचिका दाखल केली होती. अन्यायकारक निर्णय म्हणत बिल्किस बानो यांनी गुजरात सरकारच्या या निर्णयावर टीका केली होती.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

India vs Pakistan: भारत- पाकिस्तान सामना थांबला, मैदानात नेमकं घडलं काय? पंचांनी 15 मिनिटं घेतली Watch Video

Viral Video: राजकारणासोबतच फुटबॉलमध्येही 'मास्टर'! CM प्रमोद सावंतांनी लगावला अचूक गोल, सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल

India vs Pakistan: इतिहास रचण्यापासून थोडक्यात हुकली! पाकिस्तानविरुद्ध 'स्मृती' ठरली फेल; अजून वाट पाहावी लागणार

Irani Cup 2025: महाराष्ट्राची गर्जना! पाटीदार, किशन, ऋतुराज... स्टार खेळाडूंसमोर 'विदर्भाचा' डंका, तिसऱ्यांदा इराणी कप जिंकला

Viral Post: "भारतीय चित्रपट निर्मात्यांना लाज वाटली पाहिजे" कांतारा चॅप्टर 1 पाहिल्यानंतर राम गोपाल वर्माची प्रतिक्रिया, पोस्ट चर्चेत

SCROLL FOR NEXT