Bihar Crime Dainik Gomantak
देश

प्रेमाचा सापळा आणि मृत्यूचा खेळ! एकाच कुटुंबातील चौघांना मरेपर्यंत कारावासाची शिक्षा; इभ्रतीसाठी क्रौर्याची सीमा ओलांडणाऱ्यांना दणका

Bihar Crime: बिहारमधील रोहतास जिल्ह्यातील भगवानपूर गावात सात वर्षांपूर्वी घडलेल्या मन्नू कुमार या तरुणाच्या अमानवीय आणि नृशंस हत्याकांडाचा निकाल अखेर लागला.

Manish Jadhav

Bihar Crime: बिहारमधील रोहतास जिल्ह्यातील भगवानपूर गावात सात वर्षांपूर्वी घडलेल्या मन्नू कुमार या तरुणाच्या अमानवीय आणि नृशंस हत्याकांडाचा निकाल अखेर लागला असून जिल्हा न्यायाधीश-4 अनिल कुमार यांच्या न्यायालयाने या प्रकरणात ऐतिहासिक न्याय निवाडा केला. न्यायालयाने या प्रकरणी मृताची प्रेमिका, तिचा पती, भाऊ आणि वडील या चारही आरोपींना दोषी ठरवत जन्मठेपेची शिक्षा सुनावली.

याशिवाय, प्रत्येक दोषीला पाच हजार रुपयांचा आर्थिक दंडही ठोठावण्यात आला. या निकालामुळे समाजात कायद्याचा धाक निर्माण झाला असून, दीर्घकाळ चाललेल्या या लढाईत मन्नूच्या कुटुंबाला न्याय मिळाल्याची भावना व्यक्त होत आहे. ही घटना केवळ हत्येची नव्हती, तर त्यामध्ये क्रौर्याच्या सर्व सीमा ओलांडल्या गेल्या होत्या, ज्यामुळे त्यावेळी संपूर्ण परिसर हादरुन गेला होता.

या प्रकरणाची पार्श्वभूमी मार्च 2019 मधील आहे. अगरेर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील भगवानपूर गावात ही थरारक घटना घडली. 5 मार्च 2019 रोजी मन्नू कुमार हा रात्रीचे जेवण करुन घरातून बाहेर पडला, मात्र तो पुन्हा कधीच परतला नाही. दुसऱ्या दिवशी सकाळी गावातील एका व्यक्तीला मोहरीच्या शेतात मन्नूचा छिन्नविच्छिन्न अवस्थेतील मृतदेह सापडला. आरोपींनी मन्नूची हत्या केल्यानंतर त्याच्या मृतदेहासोबत जे अमानवीय कृत्य केले, ते पाहून पोलिसांच्याही अंगावर काटा आला होता.

मारेकऱ्यांनी चाकूने मन्नूचे पोट फाडले होते आणि त्याचे गुप्तांग कापून मोहरीच्या झाडाला लटकवले होते. या भीषण कृत्यामुळे परिसरात दहशत पसरली होती. मन्नूचे वडील अशोक चौधरी यांच्या तक्रारीवरुन पोलिसांनी गुन्हा दाखल केला होता आणि तपासाअंती सुमन देवी, तिचे वडील दूधेश्वर चौधरी, भाऊ फूलचंद चौधरी आणि पती प्रकाश चौधरी ऊर्फ प्रभाकर या चार जणांना अटक केली होती.

न्यायालयात (Court) सादर करण्यात आलेल्या पुराव्यांनुसार, ही हत्या अतिशय नियोजनबद्ध पद्धतीने करण्यात आली होती. मन्नू आणि सुमन देवी यांचे जुने प्रेमसंबंध होते आणि याच अवैध संबंधातून त्याला संपवण्याचा कट रचण्यात आला होता. हत्येच्या दोन दिवस आधी सुमन आपल्या पतीसह प्रयागराज येथून माहेरी भगवानपूरला आली होती. 4 मार्चच्या संध्याकाळी सुमननेच मन्नूला फोन करुन भेटायला बोलावले होते. सुमनवर विश्वास ठेवून मन्नू कोणालाही न सांगता घराबाहेर पडला, जिथे आधीच टपून बसलेल्या सुमनच्या कुटुंबीयांनी त्याला गाठले आणि त्याची क्रूरपणे हत्या केली. या जघन्य गुन्ह्यात एकाच कुटुंबातील चार सदस्यांचा सहभाग असल्याचे सिद्ध झाले आहे.

या खटल्यादरम्यान सरकारी वकील अनिल कुमार सिंह यांनी भक्कम पुरावे आणि साक्षीदार न्यायालयात सादर केले. पुराव्यांवरुन हे स्पष्ट झाले की, ही केवळ क्षणिक रागातून केलेली हत्या नव्हती, तर पूर्ववैमनस्य आणि कौटुंबिक इभ्रतीचा मुद्दा बनवून रचलेले हे एक कारस्थान होते. न्यायालयाने सर्व बाजू पडताळून पाहिल्यानंतर आरोपींचे कृत्य समाजमनाला धक्का देणारे असल्याचे मानले आणि त्यांना जन्मठेपेची शिक्षा सुनावली.

सात वर्षांच्या प्रदीर्घ प्रतिक्षेनंतर मिळालेल्या या निकालामुळे न्यायव्यवस्थेवरचा विश्वास अधिक दृढ झाला असून, अशा प्रकारचे क्रूर कृत्य करणाऱ्यांना समाजात कोणताही थारा नाही, असाच संदेश या ऐतिहासिक निकालातून देण्यात आला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

FIFA World Cup 2026: रोनाल्डो, मेस्सी आणि एमबाप्पे...फुटबॉल विश्वातील दिग्गज खेळाडू मैदानात उतरणार; येथे पाहा सामन्यांचे संपूर्ण वेळापत्रक

Goa Road Accidents: राज्यात अवघ्या 15 दिवसांत 17 जणांचे अपघाती मृत्यू , जून घात महिना, मृत्यूंचा आकडा वाढला

Water Conservation: फक्त सक्ती नको, लोकसहभाग हवा! मांद्रेच्या ‘धवरुख’ संस्थेचा जलसंवर्धन उपक्रम ठरतोय राज्यासाठी आदर्श

Monsoon Delay: पावसाने फिरवली पाठ; गोव्यातील धरणांची पाणी पातळी खालावली, 'या' भागात पिण्याच्या पाण्याचा प्रश्न चिघळणार?

Viral Video: "तुला खोट्या प्रकरणात अडकवेन!" महिला कर्मचाऱ्याची तरुणाला थेट धमकी, पोस्ट ऑफिसमधील हाय व्होल्टेज ड्रामा व्हायरल; नेटकऱ्यांनी घेतला समाचार

SCROLL FOR NEXT