भारत आणि पाकिस्तान यांच्यातील आशिया कप २०२५ चा हायव्होल्टेज सामना आज दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर रंगणार आहे. चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ नंतर पहिल्यांदाच हे दोन कट्टर प्रतिस्पर्धी एकमेकांसमोर येणार असल्याने क्रिकेटप्रेमींच्या नजरा या सामन्याकडे लागल्या आहेत. विशेषत: टीम इंडियाचा स्टार ऑलराउंडर हार्दिक पंड्या या सामन्यात ऐतिहासिक विक्रमाच्या उंबरठ्यावर उभा आहे.
हार्दिकने आत्तापर्यंत टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये ९४ विकेट्स घेतल्या आहेत. तो सध्या भारताकडून सर्वाधिक विकेट्स घेणाऱ्या गोलंदाजांच्या यादीत तिसऱ्या क्रमांकावर आहे. जर हार्दिकने आज पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात तीन विकेट्स घेतल्या, तर तो युजवेंद्र चहलला मागे टाकेल आणि दुसऱ्या क्रमांकावर झेपावेल. चहलच्या नावावर सध्या ९६ विकेट्स आहेत.
भारतासाठी टी-२० आंतरराष्ट्रीयमध्ये सर्वाधिक विकेट्स घेणाऱ्या गोलंदाजांच्या यादीत अव्वल स्थान वेगवान गोलंदाज अर्शदीप सिंगच्या नावावर आहे. त्याने ९९ विकेट्स घेतल्या असून, आजच्या सामन्यात त्याला संधी मिळाली तर तो शतक गाठणारा पहिला भारतीय गोलंदाज ठरेल. दुसरीकडे जसप्रीत बुमराह ९० विकेट्ससह चौथ्या क्रमांकावर असून आशिया कपमध्ये तो देखील १०० चा टप्पा ओलांडू शकतो.
अर्शदीप सिंग – ९९
युजवेंद्र चहल – ९६
हार्दिक पंड्या – ९४
जसप्रीत बुमराह – ९०
हार्दिक पंड्याचा पाकिस्तानविरुद्धचा रेकॉर्ड पाहिला तर त्याने ७ सामन्यांत १३ विकेट्स घेतल्या आहेत. गोलंदाजी करताना त्याची सरासरी १२ आहे आणि त्याची सर्वोत्तम कामगिरी म्हणजे फक्त ८ धावांत ३ विकेट्स. गोलंदाजीसह फलंदाजीतही हार्दिकने पाकिस्तानविरुद्ध ९१ धावा केल्या आहेत.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.