Asia Cup 2025 final controversy
दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर झालेल्या आशिया कप २०२५ च्या अंतिम सामन्यात भारत आणि पाकिस्तान यांच्यात इतिहासातील अत्यंत चुरशीची स्पर्धा पाहायला मिळाली. ४१ वर्षांच्या आशिया कप इतिहासात या दोन कट्टर प्रतिस्पर्धी संघांमध्ये पहिल्यांदाच फायनल सामना झाला. रविवारी रात्री झालेल्या या सामन्यात इतिहासात कधीही न पाहिलेली घटना घडली.
टीम इंडियाने कामगिरी करत पाकिस्तानचा पराभव केला. विजयानंतरही भारताच्या खेळाडूंनी ट्रॉफी स्वीकारली नाही, हे पाहून सर्वांना धक्का बसला. सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वाखालील संघाने पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे प्रमुख आणि आशियाई क्रिकेट परिषदेचे अध्यक्ष मोहसीन नक्वी यांच्याकडून ट्रॉफी स्वीकारण्यास ठाम नकार दिला.
इतिहासात पहिल्यांदाच असा प्रकार घडला आहे जिथे कर्णधाराने विशिष्ट व्यक्तीकडून ट्रॉफी स्वीकारण्यास नकार दिला. आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेसारख्या संस्थेच्या आचारसंहितेनुसार, हा प्रकार खेळाच्या भावनेचे उल्लंघन मानला जाऊ शकतो. तरीही, शिक्षेबाबत कोणतेही ठोस नियम नसल्यामुळे, त्याच्यावर थेट दंडाची शक्यता कमी आहे.
मात्र, आयसीसीच्या पुनरावलोकनादरम्यान, सूर्यकुमार यादवकडून या निर्णयाचे कारण विचारले जाऊ शकते. त्यानंतर, खेळाच्या भावनेचे उल्लंघन झाल्याचे आढावा घेऊन आवश्यक ती कारवाई केली जाऊ शकते.
टीम इंडियाला आशिया कप २०२५ ची ट्रॉफी मिळणे निश्चित आहे. आयसीसीच्या नियमांनुसार, विजेत्या संघाला स्टेजवर ट्रॉफी सादर केली जाते आणि नंतर संघ स्वतःकडे ठेवू शकतो. त्यामुळे मोहसीन नक्वी यांना ही ट्रॉफी भारतीय क्रिकेट नियामक मंडळाकडे (बीसीसीआय) सोपवावी लागेल. कारण खेळाडूंनी कठोर परिश्रम आणि उत्कृष्ट कामगिरीद्वारे विजेतेपद मिळवले आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.