Arvind Kejriwal Dainik Gomantak
देश

मोदीजी मी तुम्हाला हात जोडून विनंती करतो की..: अरविंद केजरीवाल

अरविंद केजरीवाल यांनी शुक्रवारी पत्रकार परिषद घेऊन केंद्रावर बोचरी टीका केली.

दैनिक गोमन्तक

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी निवडणूक आयोगाने महानगरपालिका निवडणुका पुढे ढकलल्याबद्दल नाराजी व्यक्त केली आहे. निवडणूक आयोग केंद्र सरकारपुढे झुकल्याचा आरोपही त्यांनी केला आहे. मुख्यमंत्र्यांनी शुक्रवारी पत्रकार परिषद घेऊन केंद्रावर बोचरी टीका केली.

पत्रकार परिषदेत केजरीवाल म्हणाले, राज्य निवडणूक आयोग (Election Commission) 9 मार्च रोजी महानगरपालिका निवडणुकांच्या तारखा जाहीर करणार होते, मात्र केंद्राने निवडणूक आयोगाला पत्र लिहून कळवले की त्यांना दिल्लीतील (Delhi) तीन महानगरपालिका एकत्र करायच्या आहेत. यानंतर निवडणूक आयोगाने निवडणुका पुढे ढकलण्याची घोषणा केली, असा आरोप केजरीवाल यांनी केला.

केजरीवाल म्हणाले, लोक विचारत आहेत की तीन महानगरपालिका एकत्र करण्यासाठी निवडणुका पुढे ढकलण्याची काय गरज आहे? ते पुढे म्हणाले, मी पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांना हात जोडून विनंती करतो की निवडणूक रद्द करू नका. देशात सत्तांतर होत राहील. आज आपण आहोत, उद्या कुणी दुसरे असेल. मात्र हा देश बदलणार नाही. आपण सर्वजण एकत्र येऊन देशासाठी काम करूया.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Bank Holiday: संप, शनिवार-रविवारची सुट्टी अन्‌ गणेश चतुर्थी! शुक्रवारपासून बँका सलग 5 दिवस बंद; ग्राहकांची होणार गैरसोय

Horoscope: शुक्रवार ठरणार भाग्यवान! 'या' राशींना मिळणार शुभवार्ता; नोकरी, व्यवसायात यशासोबत आर्थिक लाभाचीही शक्यता

India Nuclear Weapons Report 2026: भारताच्या अण्वस्त्रांबाबत अमेरिकन संस्थेचा मोठा दावा! भारतीय शस्त्रागारात 190 अण्वस्त्रे, क्षेपणास्त्रांचे वेगाने आधुनिकीकरण सुरु

Duleep Trophy Winner 2026: 13 वर्षांनंतर चॅम्पियनशिपचा महासंग्राम जिंकला! ईस्ट झोनने जिंकली दुलीप ट्रॉफी; ईशान किशन ठरला विजयाचा 'हिरो' VIDEO

Canacona Coarse Farming: पावसाने ऐन पेरणीच्या काळात दिला दगा; काणकोणातील भरड शेतीला मोठा फटका, 2520 हेक्टरपैकी मोठ्या क्षेत्रावर पेरणीच नाही

SCROLL FOR NEXT