An Government Employee Cannot Be Fired For Marrying Second Time Says Allahabad High Court Dainik Gomantak
देश

दुसरे लग्न केले म्हणून कर्मचाऱ्याला नोकरीवरुन काढता येणार नाही, हायकोर्टाचा निर्णय

Bigamy: न्यायमूर्ती क्षितिज शैलेंद्र यांनी पुढे असे निरीक्षण नोंदवले की, जरी कर्मचाऱ्याने दुसरे लग्न केले असले तरी त्याला सेवेतून बडतर्फ केले जाऊ शकत नाही.

Ashutosh Masgaunde

An Government Employee Cannot Be Fired For Marrying Second Time Says Allahabad High Court:

उत्तर प्रदेशातील एका सरकारी कर्मचाऱ्याने पहिले लग्न झालेले असताना दुसरे लग्न (Bigamy) केल्याच्या आरोपावरुन नोकरीवरुन बडतर्फ करण्यात आले होते. यावर, हा निर्णय अन्यायकारक असल्याचे निरीक्षण अलाहबाद उच्च न्यायालयाने नोंदवले आहे.

न्यायमूर्ती क्षितिज शैलेंद्र यांनी पुढे असे निरीक्षण नोंदवले की, जरी कर्मचाऱ्याने दुसरे लग्न केले असले तरी त्याला सेवेतून बडतर्फ केले जाऊ शकत नाही. कारण उत्तर प्रदेश (Uttar Pradesh) सरकारी नोकर वर्तणूक नियमांमध्ये सरकारी कर्मचाऱ्याने दुसरे लग्न केल्यास केवळ किरकोळ शिक्षेची तरतूद आहे.

उत्तर प्रदेशच्या प्रभात भटनागर नावाच्या व्यक्तीने उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. ते बरेली जिल्हा विकास अधिकारी यांच्या कार्यालयात कर्मचारी होते. पण एकाचवेळी दोन लग्न केल्याच्या आरोपावरून त्यांना नोकरीवरून काढून टाकण्यात आले.

सेवेतून बडतर्फ करण्यापूर्वी कोणतीही चौकशी करण्यात आली नाही, असा युक्तिवाद याचिकाकर्त्याच्या वतीने न्यायालयात करण्यात आला.

याचिकाकर्त्याच्या वकिलांनी असा युक्तिवाद केला की, पहिल्या पत्नीने सादर केलेल्या पुराव्यानुसार त्यांनी याचिकाकर्त्याचे दोन कागदपत्रे वगळता इतर कोठेही पती म्हणून नाव वापरले नाही. त्यामुळे याचिकाकर्त्याचे दुसरे लग्न सिद्ध करणारा कोणताही पुरावा उपलब्ध नाही.

उत्तर प्रदेश सरकारी नोकर वर्तणूक नियमांमध्ये अशी तरतूद आहे की, जर एखाद्या विवाहीत सरकारी नोकरदाराने सरकारच्या परवानगीशिवाय दुसरे लग्न केले तर तीन वर्षांसाठी वेतनवाढ रोखण्याच्या स्वरूपात फक्त किरकोळ शिक्षा दिली जाते. त्याला सेवेतून बडतर्फ केले जाऊ शकत नाही.

न्यायमूर्ती क्षितिज शैलेंद्र यांनी न्यायालयात सांगितले की, 'हिंदू विवाह कायद्यातील तरतुदींचा विचार करता, न्यायालय आणि संबंधित अधिकाऱ्यांसमोर कर्मचाऱ्याने दुसरा विवाह केल्याचे कोणतेही कोणतेही पुरावे उपलब्ध नाहीत. तसेच अशा गुन्ह्यासाठी किरकोळ शिक्षेची तरतूद आहे. त्यामुळे कर्मचाऱ्याची नोकरी हिरावता येणार नाही.

यावेळी न्यायालयाने याचिकाकर्त्याला पुन्हा नोकरीवर रुजू करण्याचे आदेश दिले आहेत. याचिकाकर्त्याला नोकरीतून बडतर्फ केल्याच्या दिवसापासून आर्थिक मदत देण्यात यावी, असेही आदेश न्यायालयाने दिले आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Grah Gochar 2026: 1 सप्टेंबरला बनणार 6 शक्तिशाली राजयोग! 'या' राशींची तिजोरी पैशांनी भरणार; होणार अफाट धन वर्षाव

Weather Update: ऑगस्टमध्ये समाधानकारक पाऊस, सर्वाधिक वाळपईत; जुलैमधील पावसाचा तुटवडा मात्र कायम

Marcel Road Issue: माशेलात 'वर्दळीचा' रस्ता धोकादायक, खड्ड्यांमुळे वाहतुकीला अडथळा; पावसात दुचाकीस्वारांसमोर मोठे संकट

Panaji: थकीत घरपट्टीचा फटका भाडेकरूंना; उत्पन्नाचा दाखला मिळविताना भाडेकरूंच्या मुलांची मोठी कसरत

Police Attack Viral Video: पीएसआयचा गळा आवळला, लोखंडी साखळीने हल्ला... लखनऊमध्ये अतिक्रमण हटवताना राडा; दोन महिलांसह 6 जणांना बेड्या

SCROLL FOR NEXT