Delhi High Court

 

Dainik Gomantak

देश

Delhi High Court: सुब्रमण्यम स्वामींची याचिका फेटाळली

एअर इंडिया सतत तोट्यात जात आहे आणि सरकार अधिक तोटा सहन करू शकत नाही. टाटा सन्सच्या वतीने दिल्ली उच्च न्यायालयाला सांगण्यात आले आहे की एअर इंडियाची बोली लावणारी कंपनी 100% भारतीय आहे. Air India bid

दैनिक गोमन्तक

एअर इंडियाची निर्गुंतवणूक प्रक्रिया रद्द करण्याबाबत भाजप नेते सुब्रमण्यम स्वामी (BJP leader Subramanian Swamy) यांनी दाखल केलेली याचिका दिल्ली उच्च न्यायालयाने (Delhi High Court) फेटाळून लावली आहे. या प्रकरणावर सुनावणी करताना न्यायालयाने सांगितले की, निर्गुंतवणुकीची प्रक्रिया हा धोरणात्मक निर्णय आहे.

केंद्र सरकारची (Central Government) बाजू मांडणारे सॉलिसिटर जनरल तुषार मेहता यांनी दिल्ली उच्च न्यायालयात सांगितले की एअर इंडिया (Air India) सतत तोट्यात जात आहे आणि सरकार अधिक तोटा सहन करू शकत नाही. टाटा सन्सच्या (Tata Sons) वतीने दिल्ली उच्च न्यायालयाला सांगण्यात आले आहे की एअर इंडियाची बोली (Air India bid) लावणारी कंपनी 100% भारतीय आहे.

भाजप खासदार सुब्रमण्यम स्वामी यांनी आपल्या याचिकेत एअर इंडियाच्या निर्गुंतवणुकीची बोली प्रक्रिया मनमानी, भ्रष्ट, दुर्भावनापूर्ण, असंवैधानिक आणि सार्वजनिक हिताच्या विरोधात असल्याचे म्हटले आहे. टाटा सन्सने याबाबतीत हेराफेरी केल्याचा आरोपही त्यांनी याचिकेत केला आहे.

स्वामी यांनी अधिवक्ता सत्य साबेरवाल यांच्यामार्फत दाखल केलेल्या याचिकेत अधिकाऱ्यांची भूमिका आणि कार्यप्रणालीची सीबीआय (CBI) चौकशी आणि त्याच्या तपशीलवार अहवाल न्यायालयासमोर सादर करण्याची विनंतीही केली होती.

गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्ये, केंद्र सरकारने टाटा सन्स कंपनीने (Tata Sons Company) एअर इंडिया आणि एअर इंडिया एक्स्प्रेसमधील 100 टक्के समभाग तसेच 'ग्राउंड हँडलिंग' कंपनी एआयएसएटीएसमधील 50 टक्के समभागांसाठी देऊ केलेली सर्वोच्च बोली स्वीकारली होती.

येथे असे मानले जाते की एअर इंडियाला टाटा समूहाकडे सोपवण्याचे काम या महिन्यात पूर्ण होऊ शकते. नियामक मंजुरीला उशीर झाल्यामुळे डिसेंबरअखेर हा करार पूर्ण व्हायला हवा होता, तो आता एका महिन्यात पूर्ण होईल. 20 डिसेंबर रोजी, या कराराला CCI म्हणजेच भारतीय स्पर्धा आयोगाने देखील मान्यता दिली होती.

25 ऑक्टोबर रोजी सरकारने टाटा सन्ससोबत एअर इंडियाची 18,000 कोटी रुपयांची विक्री करण्यासाठी खरेदी करार केला होता. टाटा या कराराच्या बदल्यात सरकारला 2,700 कोटी रुपये रोख देईल आणि एअरलाईनवरील 15,300 कोटी रुपयांचे थकबाकीदार कर्ज घेणार आहे.

अन्य एका अधिकाऱ्याने सांगितले की, अधिग्रहण प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतरच सरकारला या डील अंतर्गत रोख रक्कम मिळेल. 2007-08 मध्ये इंडियन एअरलाइन्समध्ये विलीन झाल्यापासून एअर इंडियाला सातत्याने तोटा होत होता. 31 ऑगस्टपर्यंत त्यांच्याकडे एकूण 61,562 कोटी रुपयांची थकबाकी होती.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

ओळखणंही झालं कठीण! WWE दिग्गज John Cenaचा धक्कादायक लूक; फोटो पाहून चाहतेही अवाक्!

Ardh Kendra Yog 2026: बँक बॅलन्स वाढणार, सगळ्या चिंता मिटणार! 'अर्धकेंद्र योग' बदलणार 5 राशींचे भाग्य; धनाचा होणार वर्षाव

Bicholim Heavy Rain: डिचोलीत पावसाचा पुन्हा तडाखा; दोन ठिकाणी झाडे कोसळली

Indus Waters Treaty Row: "...तर हात कापून टाकू!" सिंधु जल करारावरुन पाकिस्तानी मंत्र्यांचा जळफळाट; दहशतवाद्यांना पोसणाऱ्या पाकड्यांची भारताविरोधात आगपाखड

'एमआरएम' गेमचेंजर की नुसताच प्रयोग?

SCROLL FOR NEXT