Odisha Train Accident Dainik Gomantak
देश

Odisha Train Tragedy: एका-एका मृतदेहावर अनेक कुटुंबांचा दावा, प्रशासनाकडून डीएनए चा आधार

एम्सचे उपअधीक्षक डॉ.प्रवास त्रिपाठी यांनी सांगितले की, सहा महिने मृतदेह सुरक्षित राहू शकतात, त्यामुळे मृतदेहांवर अंतिम संस्कार करण्याची घाई करण्याची गरज नाही.

Ashutosh Masgaunde

Coromandel Express Accident: ओडिशातील बालासोर रेल्वे अपघातात आतापर्यंत २७८ जणांचा मृत्यू झाला आहे. यापैकी 101 मृतदेहांची ओळख अद्याप पटलेली नाही. हावडाचे अतिरिक्त जिल्हाधिकारी जितिन यादव यांनी सांगितले की, मृतदेहांची ओळख पटवण्यात आम्हाला सर्वाधिक अडचणी येत आहेत.

अनेक कुटुंबे एकाच मृतदेहावर दावा करत आहेत. भुवनेश्वर एम्सचे म्हणणे आहे की त्यांनी या समस्येचा सामना करण्यासाठी डीएनए सॅम्पलिंग सुरू केले आहे. दावा करणाऱ्या कुटुंबीयांकडून 10 डीएनए नमुने घेण्यात आले आहेत.

सहा महिने मृतदेह सुरक्षित राहतील

एम्सचे उपअधीक्षक डॉ. प्रवाह त्रिपाठी यांनी सांगितले की, 278 मृतदेहांपैकी 177 मृतदेहांची ओळख पटल्यानंतर नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आली आहे. आम्हाला 123 मृतदेह सापडले होते. यापैकी 64 मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आले आहेत.

101 मृतदेहांची ओळख अद्याप पटलेली नाही. मृतदेह खराब होऊ नयेत, मृतदेह जास्त काळ खराब होऊ नयेत म्हणून मृतदेह पाच वेगवेगळ्या डब्यात ठेवतात. आता सहा महिने मृतदेह सुरक्षित राहतील, त्यामुळे मृतदेहांवर अंतिम संस्कार करण्याची घाई करण्याची गरज नाही.

झारखंडच्या तरुणाचा आरोप

एम्स प्रशासनावर आरोप करताना झारखंडमधील एका तरुणाने सांगितले की, सोमवारी आम्ही उपेंद्र कुमार शर्मा यांच्या मृतदेहाची ओळख पटवली. असे असतानाही त्यांनी मंगळवारी मृतदेह दुसऱ्याच्या ताब्यात दिला.

मृतदेह इतरांना द्यायचा असताना डीएनए सॅम्पलिंगची काय गरज आहे. मी टॅटूच्या आधारे उपेंद्रला ओळखले होते. या आरोपांना उत्तर देताना डॉ.त्रिपाठी म्हणाले की, असे काही नाही. संपूर्ण तपासानंतरच मृतदेह ताब्यात देण्यात येत आहेत.

होय, हे खरे आहे की अनेक कुटुंबे एका मृतदेहावर दावा करत आहेत, म्हणून आम्ही डीएनए सॅम्पलिंग करत आहोत. अहवाल यायला सात ते आठ दिवस लागतील.

मृतांपैकी बहुतांश पश्चिम बंगाल, बिहार, झारखंडमधील

पश्चिम बंगाल आणि ओडिशा प्रशासनाने संयुक्तपणे एम्स भुवनेश्वर येथे हेल्पडेस्क सुरू केला आहे. बहुतेक बळी पश्चिम बंगाल, बिहार, झारखंड, आंध्र प्रदेश, तामिळनाडू आणि ओडिशा या राज्यांतील होते, असे एका अधिकाऱ्याने सांगितले.

सीबीआय, रेल्वे सुरक्षा आयुक्त आणि जीआरपी यांनी रेल्वे अपघाताची चौकशी सुरू केली आहे. उपकरणांमध्ये छेडछाड झाल्याचा संशय खुर्दाचे डीआरएम रिंकेश रॉय यांनी व्यक्त केला असून त्यामुळेच एवढी मोठी दुर्घटना घडली आहे.

बालासोर दुर्घटनेचे आतापर्यंतचे अपडेट्स

ओडिशाच्या बालासोरच्या बहनगा मार्केटमध्ये शुक्रवारी रेल्वे अपघात झाला. रेल्वेने मृतांच्या नातेवाईकांना 10 लाख रुपये, गंभीर जखमींना 2 लाख रुपये आणि इतर जखमींना 50 हजार रुपयांची मदत जाहीर केली आहे.

परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी स्वतः ओडिशात पोहोचले होते. पंतप्रधानांनी जखमी आणि मृतांच्या नातेवाईकांशी संवाद साधला. या प्रकरणाची चौकशी केली जाईल, असे ते म्हणाले. चौकशीनंतर दोषींवर कारवाई केली जाईल. त्यांना सोडले जाणार नाही. ओडिशात रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णवही उपस्थित होते. 

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

India Nuclear Weapons Report 2026: भारताच्या अण्वस्त्रांबाबत अमेरिकन संस्थेचा मोठा दावा! भारतीय शस्त्रागारात 190 अण्वस्त्रे, क्षेपणास्त्रांचे वेगाने आधुनिकीकरण सुरु

Duleep Trophy Winner 2026: 13 वर्षांनंतर चॅम्पियनशिपचा महासंग्राम जिंकला! ईस्ट झोनने जिंकली दुलीप ट्रॉफी; ईशान किशन ठरला विजयाचा 'हिरो' VIDEO

Canacona Coarse Farming: पावसाने ऐन पेरणीच्या काळात दिला दगा; काणकोणातील भरड शेतीला मोठा फटका, 2520 हेक्टरपैकी मोठ्या क्षेत्रावर पेरणीच नाही

Goa Politics: 'गोवा फर्स्ट' 2027चा नवा राजकीय पर्याय ठरणार? सरदेसाईंचे संकेत; काँग्रेससोबतची युतीची बोलणी सध्या स्थगित

Houthi Missile Attack Saudi Arabia: हुतींच्या सौदीवरील हल्ल्याने बिथरला पाकिस्तान, इराणला दिली तंबी; मुस्लीम जगतात खळबळ

SCROLL FOR NEXT