Indian citizen Twitter/ ANI
देश

Afghanistan तून भारतात आलेल्या नागरिकांमधील 2 नागरिक कोरोना पॉझिटिव्ह

अटलांटिक करार संघटनेच्या (NATO) विमानाने गेल्या काही दिवसांत काबूलहून दोहा येथे नेण्यात आले होते. मात्र यातील दोन प्रवाशांचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे.

दैनिक गोमन्तक

अफगाणिस्तानातून (Afghanistan) 146 भारतीय नागरिक (Indian Citizen) सोमवारी कतारमधून चार वेगवेगळ्या विमानांनी भारतात पोहोचले. या नागरिकांना अमेरिका आणि उत्तर अटलांटिक करार संघटनेच्या (NATO) विमानाने गेल्या काही दिवसांत काबूलहून दोहा येथे नेण्यात आले होते. मात्र यातील दोन प्रवाशांचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे.

या प्रकरणाची माहिती असलेल्या लोकांनी सांगितले की, तालिबान्यांनी अफगाणिस्तानवर ताबा मिळवल्यानंतर तणावग्रस्त देशात अडकलेल्या तेथील नागरिक आणि अफगाणिस्तानच्या भागीदारांना बाहेर काढण्यासाठीच्या भारताच्या मोहिमेचा भाग म्हणून या लोकांना दिल्लीत आणण्यात आले. काबूलमध्ये इव्हॅक्युएशन ऑपरेशन सुरु केल्यानंतर दोहाहून भारतात आणलेल्या भारतीयांची ही दुसरी तुकडी आहे. तत्पूर्वी, रविवारी दोहाहून 135 भारतीय एका विशेष विमानाने दिल्लीला पोहोचले होते.

दोहाहून मायदेशी परतलेल्या भारतीयांच्या दुसऱ्या तुकडीपैकी 104 लोकांना 'विस्तारा' विमानाने, 30 'कतार एअरवेज'ने आणि 11' इंडिगो 'विमानाने परत आणले. एक व्यक्ती 'एअर इंडिया' विमानाने परतला. अफगाणिस्तानच्या राजधानीतून आपल्या नागरिकांना बाहेर काढण्याच्या प्रयत्नात रविवारी भारताने तीन उड्डाणांमध्ये दोन अफगाणी खासदारांसह 392 लोकांना परत आणले. अमेरिकन सैन्याच्या माघारीच्या पार्श्वभूमीवर, तालिबानने या महिन्यात अफगाणिस्तानात वेगाने आपले पाय वाढवले असून राजधानी काबूलसह बहुतेक भाग काबीज केला आहे.

अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडन काय म्हणाले?

यापूर्वी, अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडन म्हणाले होते की, अफगाणिस्तानच्या राजधानीतून अमेरिकन आणि इतर हजारो लोकांना विमानातून हलवण्याचे "कठीण आणि वेदनादायक" असे काम होते. त्याच वेळी, तणावग्रस्त देशातून 31 ऑगस्टच्या अंतिम मुदतीनंतर ही मोहीम चालवण्याची शक्यता त्यांनी नाकारली नाही. बायडन यांनी रविवारी व्हाईट हाऊसमध्ये युद्ध संपवण्याच्या आपल्या निर्णयाचा बचाव केला आणि असा आग्रह धरला की सर्वोत्तम परिस्थितीत सर्व अमेरिकनांना देशाबाहेर काढणे कठीण आहे. बायडन (Joe Biden) यांनी विलंबाने निर्वासन मोहीम सुरु केल्याबद्दल टीकाकारांनी टीका केली आहे.

बायडन म्हणाले, "काबूलमधून हजारो लोकांना परत आणण्याचे काम कठीण आणि वेदनादायक आहे. किती वेळ सुरु असणार हे महत्त्वाचे नाही. दूरचित्रवाणीवर वेदनादायक आणि हृदयद्रावक दृश्ये दाखवल्याशिवाय एवढ्या मोठ्या प्रमाणात लोकांना बाहेर काढण्याचा कोणताही मार्ग नव्हता. "बायडन म्हणाले की, 31 ऑगस्टच्या अंतिम मुदतीनंतर लोकांना हवाई मार्गाने परत आणण्याचे काम आणखी गतीने करावे लागणार आहे. त्यासह सैन्य चर्चा देखील सुरु आहे. ते पुढे म्हणाले, आम्हाला आशा आहे की आम्हाला ती वाढवावी लागणार नाही परंतु तरीही चर्चा सुरु ठेवावी लागणार आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

ED Goa: गोव्यात ईडीची झाडाझडती; 'सडा अर्बन'ची 1.05 कोटींची मालमत्ता तर जमीन हडप प्रकरणी संदीप वझरकर 3.19 कोटींची जमीन जप्त

Video: अप्रतिम अन् शानदार...! भर पावसात मुलांसोबत 'गजराज'नं लुटला क्रिकेटचा आनंद; सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल

Goa: भर पावसात प्रवासी बोट नदीत बुडाली; बाहेर काढण्यासाठी गोवा सरकारने 11 दिवसांत खर्च केले 20 लाख रुपये

Multiple Organ Failure Diseases: एकाच आजारानं हृदय, यकृत अन् मूत्रपिंड खराब होऊ शकतं का? जाणून घ्या वैज्ञानिक कारण अन् प्रतिबंधात्मक उपाय

Goa News: अडवलपालमध्ये गढूळ पाण्याचा पुरवठा, 'फोमेंतो' कंपनीच्या रिजेक्शनमुळे समस्या; वाचा गोव्यातील दिवसभरातील ठळक घडामोडी

SCROLL FOR NEXT