nirmala sitharaman
nirmala sitharaman  Dainik Gomantak
अर्थविश्व-

सरकारची निर्गुंतवणूक कोणतेही कंपनी बंद करण्यासाठी नाही - अर्थमंत्री निर्मला सीतारामन

दैनिक गोमन्तक

केंद्रीय सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रम कार्यक्रमाबाबत बोलताना केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी कोणते ही युनिट अथवा कंपनी बंद करण्यासाठी केंद्र सरकारने निर्गुंतवणूक कार्यक्रमाचे तत्त्व अवलंबलेले नाही. तर कंपन्या कार्यक्षमतेने आणि किफायतशीरपणे चालवल्या जातील याची खात्री करण्यासाठी केंद्रीय सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रमाचे खाजगीकरण करण्याचे उदिष्ट केंद्राने ठेवले असल्याचं ही त्या म्हणाल्या. 'आझादी का अमृत महोत्सव' समारंभाला संबोधित करताना त्या बोलत होत्या. (The government's disinvestment is not to close any company - Finance Minister Nirmala Sitharaman )

पुढे बोलताना मंत्री सीतारामन यांनी स्पष्ट केलं की, 1994 ते 2004 दरम्यान खाजगीकरण केलेल्या सार्वजनिक क्षेत्रातील उद्योगांमध्ये केवळ सुधारणा झाली आहे.तसेच या कंपन्या कार्यक्षमतेने आणि किफायतशीरपणे चालवल्या जातील याची खात्री करण्यासाठी केंद्रीय सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रमाचे खाजगीकरण करण्याचे उद्दिष्ट केंद्र सरकारने समोर ठेवले आहे. असं ही त्या यावेळी म्हणाल्या.

आता निर्गुंतवणूक ज्या तत्त्वावर होत आहे, ते म्हणजे युनिट बंद करणे योग्य नाही. सद्या भारतीय अर्थव्यवस्थेला अशा अनेक कंपन्यांची गरज आहे. "म्हणून जर आम्हाला ती क्रिया व्यावसायिकरित्या करायची असेल आणि लोकांना येण्यासाठी आणि ते करण्यासाठी मोकळ्या जागा खुल्या करायच्या असतील, तर ते अधिक कार्यक्षमतेने चालवणे आवश्यक आहे, आणि आम्हाला ते अधिक कार्यक्षमतेने चालवायचे आहे. असं ही त्या यावेळी म्हणाल्या.

सितारामन यांनी यावेळी बोलताना स्पष्ट केले की, निर्गुंतवणुकीचे तत्व हे सुनिश्चित करणे आहे की खाजगी कंपन्या अशा लोकांच्या हातात आहेत जे त्यांना चालवू शकतात, अधिक भांडवल आणू शकतात आणि उत्पादनाची समान पातळी राखू शकतात.“म्हणून ते बंद करण्यासाठी नाही तर चांगल्या आणि अधिक गुंतवणुकीसाठी संधी आणण्यासाठी आहे,” असं त्या म्हणाल्या.

मागील आर्थिक वर्षात केंद्रीय सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रम निर्गुंतवणुकीद्वारे 13,500 कोटींहून अधिकची प्राप्ती झाली, त्यात एअर इंडियाच्या खाजगीकरणातून मिळालेल्या रकमेचा समावेश आहे. सीतारामन यांच्या मते, केंद्रीय सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रम भारत बाँड ईटीएफ, बाजारातील सर्व एक्सचेंज ट्रेडेड फंडांपैकी सुमारे 84 टक्के आहे. भारत बाँड ईटीएफची एयूएम सुमारे 53,000 कोटी रुपये आहे. असं ही त्यांनी यावेळी स्पष्ट केलं आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Congress: सार्दिन घरात बसून विरियातोंचा प्रचार करतात; पाटकरांनी टोचले MP फ्रान्सिस यांचे कान

Shashi Tharoor In Goa: भाजपला धक्का बसणार, 400 नव्हे 200 पार करने देखील जड जाणार - थरुर

Goa Police : २४ वर्षांपासून अजूनही ‘ते’ न्यायाच्या प्रतिक्षेत; बडतर्फ पोलिसाची व्यथा

Goa Today's Live News: चारशे नव्हे दोनशे पार देखील भाजपला जड जाणार - शशी थरुर

United Nations मध्ये भारताचा अमेरिका आणि इस्रायलला दणका; स्वतंत्र पॅलेस्टाईनच्या मागणीला दिला पाठिंबा

SCROLL FOR NEXT