केंद्रीय कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्री नरेंद्र सिंह तोमर Danik Gomantak
अर्थविश्व

देशाच्या अर्थव्यवस्थेत कृषीचे स्थान महत्वाचे

कृषी विद्यापीठांमधून चांगले कृषी शास्त्रज्ञ (Scientist)बाहेर पडले पाहिजेत, जेणेकरून देशात कृषी (Agriculture)प्रगती होईल. कृषी उत्पादनांची निर्यात वाढवण्यासाठी कृषी विद्यापीठांनीही योगदान दिले पाहिजे.

दैनिक गोमन्तक

केंद्रीय कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्री नरेंद्र सिंह तोमर (Narendra Singh Tomar)यांनी म्हटले आहे की, कृषीच्या प्रगतीमध्ये आणि यासाठी आधुनिक ज्ञान पसरवण्यात कृषी महाविद्यालये आणि विद्यापीठांची (university)मोठी भूमिका आहे. सरकार शेतीचे आधुनिकीकरण करण्याचा प्रयत्न करत आहे, त्यासाठी डिजिटल कृषी अभियान सुरू करण्यात आले आहे.

ते म्हणाले की, अर्थव्यवस्थेत (economy)कृषी क्षेत्राचे महत्त्वाचे योगदान आहे आणि प्रतिकूल परिस्थितीतही भारतीय शेतीने त्याची प्रासंगिकता अनेक वेळा सिद्ध केली आहे. देशातील शेतीला प्राधान्य दिल्यामुळे, त्याच्या ताकदीने, देश देखील सशक्त होईल आणि पुढे जाईल.

जवाहरलाल नेहरू कृषी विद्यापीठ, जबलपूरच्या 58 व्या स्थापना दिन सोहळ्यात प्रमुख पाहुणे म्हणून केंद्रीय मंत्री तोमर यांनी हे सांगितले. तोमर म्हणाले की, शेतीबरोबरच ग्रामीण वातावरणातही समृद्धी आली पाहिजे, ज्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अनेक योजना तयार केल्या आहेत. शेतकऱ्यांना स्वातंत्र्य देण्यासाठी कायदेशीर निर्बंध मोडून शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवण्यास प्राधान्य देण्यात आले आहे.

1600 पेक्षा जास्त पिकाच्या जाती विकसित:

शेतकऱ्यांची मेहनत, शास्त्रज्ञांचे संशोधन आणि सरकारच्या शेतकरी-अनुकूल धोरणांमुळे अनेक पिकांच्या उत्पन्नाच्या बाबतीत भारत जगात पहिल्या किंवा दुसऱ्या क्रमांकावर आहे. गेल्या पाच वर्षात, भारतीय कृषी संशोधन परिषद (ICAR) आणि त्याच्या संस्था, कृषी विद्यापीठे आणि कृषी विज्ञान केंद्रांच्या योगदानाने 1600 हून अधिक पीक वाण विकसित केले गेले आहेत. ज्यामध्ये जवाहरलाल नेहरू कृषी विद्यापीठाने 294 सुधारित वाणही विकसित केले आहेत.

कृषी निर्यात वाढवण्यासाठी योगदान:

ICAR यासंदर्भात तयारी केली आहे आणि अलीकडेच त्यांचे दस्तऐवज त्यांच्याकडून जारी करण्यात आले आहे. तोमर यांनी कृषी विद्यापीठांमधून चांगले कृषी शास्त्रज्ञ बाहेर पडले पाहिजेत, जेणेकरून देशात कृषी प्रगती होईल. कृषी उत्पादनांची निर्यात वाढवण्यासाठी कृषी विद्यापीठांनीही योगदान दिले पाहिजे.

मध्य प्रदेशचे कृषिमंत्री कमल पटेल (Agriculture Minister Kamal Patel)विशेष अतिथी म्हणून उपस्थित होते. यावेळी बोलताना ते म्हणाले की, त्यांचे राज्य कृषी क्षेत्रात आघाडीचे राज्य बनेल, आम्ही पंजाब आणि हरियाणालाही मागे टाकले आहे. यामध्ये शास्त्रज्ञांच्या संशोधनाचे महत्त्वाचे योगदान आहे. सेंद्रिय शेतीला(Farm) प्रोत्साहन देण्यावर त्यांनी भर दिला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

IND vs PAK: "त्यांनी नकार दिलाय, आम्ही नाही''! पाकड्यांच्या बहिष्कार नाट्यावर सूर्याचा रुबाब; वर्ल्ड कपच्या वादावर भारताची भूमिका स्पष्ट

Goa Sexual Assault: 23 वर्षीय तरुणानं अल्पवयीन मुलीला बनवलं शिकार! मायणा-कुडतरीतील संतापजनक प्रकार; नराधमाला पोलिसांनी ठोकल्या बेड्या

वळण ठरलं जीवघेणं! धार्मिक उत्सवावरुन परतताना काळाचा घाला, चालकाचं नियंत्रण सुटल्यानं बसचा भीषण अपघात; 15 ठार VIDEO

Shani Trayodashi 2026: 14 की 15 फेब्रुवारी, कधी आहे 'शनि त्रयोदशी'? साडेसातीपासून मुक्ती मिळवण्याचा सर्वोत्तम योग; जाणून घ्या पूजेची अचूक वेळ अन् शुभ मुहूर्त

"रिफ्रेश आणि रिचार्ज!" फायनलपूर्वी RCBच्या पोरींची गोव्यात धम्माल; स्मृती अन् सायलीचा कूल अंदाज तर श्रेयंका-अरुंधतीचा स्टायलिश लूक चर्चेत

SCROLL FOR NEXT