Reliance 5G Dainik Gomantak
अर्थविश्व

Jio 5G: रिलायन्सच्या 5G नेटवर्कबाबत मुकेश अंबानी यांनी केली महत्वपूर्ण घोषणा

गोमन्तक डिजिटल टीम

रिलायन्स इंडस्ट्रीजचे प्रमुख मुकेश अंबानी (Reliance Chairman Mukesh Ambani) यांनी भारतासाठी पुढील 25 वर्षे अमृतकाळ असे वर्णन केले आहे. रिलायन्स भारताच्या प्रगतीत मोठी भूमिका बजावणार आहे. नुकतेच रिलायन्स इंडस्ट्रीजची 45 वी एजीएम (Reliance AGM 2022) पार पडली. यावेळी मुकेश अंबानी यांनी काही महत्वपूर्ण गोष्टींचा उल्लेख केला. तसेच, लवकरच रिलायन्सच्या 5G नेटवर्कबाबत देखील माहिती दिली.

मुकेश अंबानी म्हणाले, जगातील अनेक देश प्रचंड महागाई आणि आर्थिक संकटाचा सामना करत आहेत. रिलायन्स दिवाळीपर्यंत देशभरात Jio 5G नेटवर्क लॉन्च करेल असे त्यांनी सांगितले. यासाठी जिओ ₹ 2,00,000 कोटी रूपयांची गुंतवणूक करणार आहे. भारत सरकारने ज्या पद्धतीने कोरोना संसर्गाचा सामना केला आणि त्यानंतर उद्भवलेली परिस्थिती प्रशंसनीय असल्याचे मुकेश अंबानी म्हणाले.

यावर्षी दिवाळीपर्यंत दिल्ली, मुंबई, कोलकाता आणि चेन्नई या महानगरांमध्ये 5G सेवा सुरू होईल. डिसेंबर 2023 पर्यंत देशातील प्रत्येक शहरात 5G सेवा सुरू होईल. Jio ची 5G सेवा संपूर्ण देशात जगातील सर्वात जलद पोहोचू शकेल. असे अंबानी म्हणाले.

रिलायन्सच्या एजीएममध्ये मुकेश अंबानी म्हणाले, गेल्या वर्षभरात जिओने डेटा वापर दुप्पट केला आहे. देशात पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वाखाली अनेक योजनांचे लाभ सामान्य लोकांपर्यंत पोहोचले आहेत, नेटवर्क प्रदाता म्हणून जिओने यामध्ये मोठी भूमिका बजावली आहे. असे अंबानी म्हणाले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Kendra Drishti Yog 2026: शुक्र-गुरुची गट्टी जमणार, पैसा आणि प्रेम दोन्ही मिळणार! केंद्र दृष्टी योग 'या' 4 राशींसाठी ठरणार वरदान

RO Water: आर.ओ.चं पाणी खरंच आरोग्यासाठी घातक? तज्ज्ञ डॉक्टरांनी स्पष्टच सांगितलं; अफवांवर विश्वास ठेवण्यापूर्वी जाणून घ्या

Budh Margi 2026: "तुमची स्वप्ने होणार पूर्ण, बुध ग्रहाचा मेगा धमाका'' 21 मार्चपासून 'या' 7 राशींच्या नशिबात मोठा राजयोग

High Court: 'रागाच्या भरात मुलगी बापावर बलात्काराचा आरोप कधीच करणार नाही', जन्मठेपेची शिक्षा कायम ठेवताना हायकोर्टाने ओढले ताशेरे; काय नेमकं प्रकरण?

डोळ्यांत पाणी अन् हृदयात धडधड... कुवेतमध्ये अडकलेल्या उर्वशी रौतेलाला विमानातचं कोसळलं रडू; युद्धजन्य स्थितीतील मांडली व्यथा VIDEO

SCROLL FOR NEXT