PNB  Dainik Gomantak
अर्थविश्व

करोडो शेतकऱ्यांसाठी खुशखबर! PNB देतेय पूर्ण 50,000 रुपये, पैसे थेट खात्यात येणार

PNB Kisan Scheme: पंजाब नॅशनल बँकेने शेतकऱ्यांसाठी खास योजना आणली आहे.

दैनिक गोमन्तक

PNB Kisan Scheme: पंजाब नॅशनल बँकेने शेतकऱ्यांसाठी खास योजना आणली आहे, ज्यामध्ये तुम्हाला आर्थिक मदत दिली जाणार आहे. शेतकऱ्यांना बँकेकडून 50 हजार रुपये दिले जाणार आहेत. हे पैसे तुम्ही शेतीशिवाय तुमच्या वैयक्तिक गरजा पूर्ण करण्यासाठी वापरु शकता. विशेष म्हणजे, हे पैसे तुम्हाला बँकेच्या कोणत्या स्कीम अंतर्गत दिले जात आहेत आणि तुम्ही त्यासाठी अर्ज कसा करु शकता हे आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.

शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा होतील

पंजाब नॅशनल बँक 'पीएनबी किसान तत्काळ कर्ज योजनेची' सुविधा ग्राहकांना देत आहे, ज्या अंतर्गत हे पैसे शेतकऱ्यांच्या (Farmers) खात्यात जमा केले जातील. पीएनबीने (PNB) ट्विट करुन या सुविधेची माहिती दिली आहे. या योजनेत नेमकं काय खास आहे, ते आम्ही तुम्हाला सांगणार आहोत-

पीएनबीने ट्विट केले

पीएनबीने आपल्या अधिकृत ट्विटमध्ये लिहिले आहे की, 'प्रत्येक शेतकऱ्याच्या गरजा पूर्ण करण्यासाठी पीएनबीने किसान तत्काळ कर्ज योजना आणली आहे.'

कोणत्याही कामासाठी कर्ज घेता येते

पंजाब नॅशनल बँकेने सांगितले आहे की, 'या योजनेअंतर्गत तुम्हाला शेतीसाठी किंवा घरगुती गरजांच्या पूर्ततेसाठी कर्ज घेऊ शकता. त्याचबरोबर, तुम्ही इतर कोणत्याही प्रकारच्या गरजा पूर्ण करण्यासाठी या योजनेचा लाभ घेऊ शकता. किसान तत्काळ कर्ज योजना प्रत्येक मदतीसाठी तयार आहे.'

कोणत्या लोकांना मिळणार फायदा?

PNB तत्काळ कर्ज योजनेचा लाभ घेण्यासाठी, तुम्ही कृषी क्षेत्रात काम करणारे शेतकरी किंवा शेतजमिनीचे भाडेकरु असणे आवश्यक आहे. बँकेच्या म्हणण्यानुसार, फक्त शेतकरी किंवा शेतकरी गट, ज्यांच्याकडे आधीच किसान क्रेडिट कार्ड (KCC) आहे, त्यांनाच या योजनेचा लाभ दिला जाईल. यासाठी त्यांच्याकडे मागील दोन वर्षांचे अचूक बँक रेकॉर्ड असणे आवश्यक आहे.

सेवा शुल्क भरावे लागणार नाही

बँकेच्या (Bank) अधिसूचनेनुसार, शेतकर्‍यांना किसान तत्काळ कर्ज योजनेअंतर्गत त्यांच्या विद्यमान कर्ज मर्यादेच्या 25 टक्क्यांपर्यंत कर्ज दिले जाईल, कमाल मर्यादा 50,000 रुपये आहे. हे कर्ज घेण्यासाठी शेतकर्‍यांना काहीही तारण ठेवण्याची गरज नाही किंवा त्यांना कोणतेही सेवा शुल्क भरावे लागणार नाही.

कर्जाची परतफेड 5 वर्षांत करता येते

या योजनेंतर्गत शेतकऱ्यांना कर्जाची परतफेड करण्यासाठी जास्तीत जास्त 5 वर्षांचा कालावधी दिला जाईल. या कर्जाचे हप्तेही सोपे ठेवण्यात आले आहेत, जेणेकरुन शेतकऱ्यांना परतफेड करताना कोणतीही अडचण येऊ नये.

ऑनलाइन आणि ऑफलाइन कर्ज कसे घ्यावे

कर्ज घेण्यासाठी शेतकरी पीएनबीच्या शाखेत जाऊन अर्ज करु शकतात. येथे तुम्ही फॉर्म मागवून कर्जासाठी अर्ज करु शकता. त्याच वेळी, ऑनलाइन अर्ज करण्यासाठी, तुम्हाला बँकेच्या अधिकृत वेबसाइटवर जावे लागेल.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT