Farmer Dainik Gomantak
अर्थविश्व

Farmers: शेतकऱ्यांचे बल्ले-बल्ले, सरकारने केली 'ही' मोठी घोषणा; खराब हवामानामुळे...

Farmers: सध्या देशातील अनेक राज्यांमध्ये पावसाचा कहर पाहायला मिळत आहे. या अवकाळी पावसाचा सर्वाधिक फटका शेतकऱ्यांना बसला आहे.

Manish Jadhav

Farmers: सध्या देशातील अनेक राज्यांमध्ये पावसाचा कहर पाहायला मिळत आहे. या अवकाळी पावसाचा सर्वाधिक फटका शेतकऱ्यांना बसला.

हे पाहता आता सरकारने शेतकऱ्यांना नुकसान भरपाई वाढवण्याची घोषणा केली आहे. पंजाब सरकारने ही घोषणा केली.

यासोबतच पंजाब सरकारकडून राज्यातील शेतकऱ्यांना अधिक भरपाई दिली जाणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना काहीसा दिलासा मिळणार आहे.

नुकसान भरपाई वाढवली

मंत्रिमंडळाने खराब हवामानामुळे पिकांच्या नुकसानीच्या भरपाईमध्ये 25 टक्के वाढ करण्यास मान्यता दिली आहे. मुख्यमंत्री भगवंत मान (Bhagwant Mann) यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आल्याचे अधिकृत निवेदनात म्हटले आहे. यासोबतच आता पंजाबमधील शेतकऱ्यांना 25 टक्के वाढीव भरपाई दिली जाणार आहे.

इतकी भरपाई

किंबहुना, अतिवृष्टी, गारपीट आणि जोरदार वाऱ्यामुळे शेतकऱ्यांचे (Farmers) नुकतेच झालेले नुकसान लक्षात घेता, 76 ते 100 पर्यंत पीक नुकसानीसाठी मदत रक्कम 12,000 रुपये प्रति एकरवरुन 15,000 रुपये प्रति एकर करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळणार आहे. हा दिलासा दर 1 मार्चपासून लागू होणार आहे.

पिकांचे नुकसान

अलीकडच्या काळात राज्यातील अनेक भागात गारपिटीसह अवकाळी पावसाने आणि जोरदार वाऱ्यामुळे गव्हाचे नुकसान झाले आहे. दुसर्‍या निर्णयात, मंत्रिमंडळाने मालमत्तांच्या नोंदणीवरील 2.25 टक्के मुद्रांक शुल्क आणि शुल्कात सूट 30 एप्रिलपर्यंत वाढवण्यास संमती दिली. यापूर्वी अंतिम तारीख 31 मार्च होती.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

PSI Recruitment Goa: महिला 'पीएसआय' भरतीत मोठी गळती, उमेदवार नाराज; 216 पैकी केवळ 13 उमेदवार पात्र, नियम बदलाचा फटका

British Nationals Death In Goa: एक महिन्यात कांदोळीत तीन ब्रिटिश नागरिकांचा मृत्यू

Bank Loan: 181 कोटींची कर्जे थकित, बँकांकडून पाच वर्षांत घेतली 43,103 कोटींची कर्जे

E Challan Cyber Fraud: बनावट 'ई-चलन', सायबर भामट्यांचा नवा सापळा! वाहतूक विभागाकडून सतर्क राहण्याचे आवाहन

Fishing Boat Missing: भरकटलेल्या मच्छिमारांचा अखेर 12 तासांनंतर शोध, चारही जण सुखरूप तळपण जेटीवर

SCROLL FOR NEXT