Money Dainik Gomantak
अर्थविश्व

Old Pension Scheme बाबत सरकारचा 'हा' नवा फॉर्म्युला! कर्मचाऱ्यांची चांदी

OPS: नुकतेच हरियाणातील शेकडो माजी आणि वर्तमान कर्मचाऱ्यांनी जुन्या पेन्शनच्या मागणीसाठी मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानाजवळ निदर्शने केली.

Manish Jadhav

Old Pension Scheme: जुन्या पेन्शन योजनेच्या मागणीवरुन सुरु असलेले युद्ध अधिक तीव्र होत आहे. नुकतेच हरियाणातील शेकडो माजी आणि वर्तमान कर्मचाऱ्यांनी जुन्या पेन्शनच्या मागणीसाठी मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानाजवळ निदर्शने केली. जुनी पेन्शन पूर्ववत करण्याची या कर्मचारी आणि निवृत्ती वेतनधारकांची मागणी होती.

यापूर्वी, अनेक राज्य सरकारांनी जुनी पेन्शन बहाल केली आहे. जुनी पेन्शन बहाल करणारे छत्तीसगडचे मुख्यमंत्री भूपेश बघेल यांनी नुकतीच एका मुलाखतीदरम्यान देशभरात ती बहाल करण्याची मागणी केली होती.

पक्षपातळी सोडून निवेदन दिले

आता जुन्या पेन्शनच्या मागणीत मोठी सुधारणा अशा वेळी आली आहे, जेव्हा मध्यप्रदेशात भाजपचे (BJP) आमदार गौरीशंकर बिसेन यांनी वक्तव्य केले. माजी कृषिमंत्री बिसेन यांनी आपल्याच सरकारवर हल्लाबोल केला. या वेळी ते म्हणाले की, जुनी पेन्शन योजना पूर्ववत करावी.

हमी पेन्शन 50% दराने दिली जाईल

दुसरीकडे, सूत्रांनी दावा केला आहे की, मोदी सरकार जुन्या पेन्शनच्या मागणीवर मध्यम मार्ग शोधण्याचा विचार करत आहे. पहिला पर्याय म्हणून, सरकारी कर्मचार्‍यांना NPS अंतर्गत मिळालेल्या शेवटच्या पगाराच्या सुमारे 50% हमी पेन्शन द्यावी, असा सरकारकडून (Government) विचार केला जात आहे. या नियमाच्या अंमलबजावणीमुळे, सरकारी तिजोरीवर जास्त बोजा न पडता सध्याच्या NPS मध्ये बदल करता येतील.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Virat Kohli: 'किंग'चा लाजिरवाणा कमबॅक: 7 महिन्यांनी परतला, पण फक्त 8 चेंडू खेळून 'शून्य'वर बाद; लज्जास्पद विक्रमाची नोंद VIDEO

कणखर गृहमंत्री ते संवेदनशील कृषीमंत्री: रवी नाईक यांच्या व्यक्तिमत्त्वाचं मुख्यमंत्री फडणवीसांकडून गौरवोद्गार

Ravi Naik: 'मी फक्त पुढे, सेनापती मात्र रवीच'; दिवंगत नेत्याला भावनिक आदरांजली

Horoscope: 71 वर्षांनंतर महासंयोग! यंदाची दिवाळी 5 शुभ योगांची, 'या' राशींचे भाग्य उजळणार; शुभ कार्यांसाठी सर्वोत्तम काळ

1310-1312 मध्ये अल्लाउद्दीन खिलजीच्या मोठ्या सैन्याने कोकणात प्रवेश केला, कदंबांची गोव्यातील राजधानी गोपकपट्टणाचा नाश केला..

SCROLL FOR NEXT