Finance Minister Nirmala Sitharaman Dainik Gomantak
अर्थविश्व

Nirmala Sitharaman: अर्थमंत्र्यांची घोषणा, मोदी सरकारच्या आठ वर्षात दोन लाख कोटींची बचत!

DBT: सीतारामन म्हणाल्या की, 'भाजप आणि मोदी सरकारने स्टार्टअप धोरण तयार करुन प्रोत्साहन दिले. आम्ही पुढील 25 वर्षांसाठी तंत्रज्ञान जाणणारा भारत तयार करत आहोत.

दैनिक गोमन्तक

Direct Benefit Transfer: गेल्या आठ वर्षांत, मोदी सरकारने आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करुन डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर (DBT) द्वारे दोन लाख कोटी रुपये 'चुकीच्या हातात' जाण्यापासून वाचवले आहेत. अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी एका कार्यक्रमात ही माहिती दिली. त्या भोपाळमध्ये '21 व्या शतकातील जागतिक परिस्थितीमध्ये भारताची आर्थिक क्षमता' या विषयावर 'दत्तोपंत ठेंगडी मेमोरियल नॅशनल लेक्चर सिरीज-2022' या विषयावर बोलत होत्या. सीतारामन म्हणाल्या की, 'भाजप आणि मोदी सरकारने स्टार्टअप धोरण तयार करुन प्रोत्साहन दिले. आम्ही पुढील 25 वर्षांसाठी तंत्रज्ञान जाणणारा भारत तयार करत आहोत.'

भारतात स्टार्टअप्स वेगाने वाढत आहेत

त्या पुढे म्हणाल्या की, 'गेल्या सात-आठ वर्षांत तंत्रज्ञानाचा वापर करुन सरकारने दोन लाख कोटींहून अधिक बचत केली आहे. डीबीटीच्या माध्यमातून जाणाऱ्या पैशांसाठी पडताळणी केली जाते. यूपीए सरकारवर टीका करताना त्या म्हणाल्या की, 'जे काँग्रेसच्या (Congress) काळात मेले, जे जन्माला आले नाहीत, त्यांनाही पैसे मिळायचे.'

सीतारामन पुढे म्हणाल्या की, 'स्वयंरोजगाराच्या क्षेत्रात स्टार्टअप्स वेगाने वाढत आहेत. स्टार्टअप क्रांती ही भारतातील (India) तरुणांची आहे. भारताच्या डीएनएमध्ये उद्योजकता आहे.'

सभ्यता आणि संस्कृतीत भारताचे स्थान आघाडीवर

त्या पुढे म्हणाल्या की, 'काँग्रेसच्या राजवटीत केंद्राची जी योजना होती, तेच मॉडेल देशभरातील सर्व राज्यांमध्ये लागू करण्यात आले. कम्युनिझमच्या नावावर जगात फक्त चीन उरला आहे, पण तो भांडवलदारांच्या मदतीने आपली अर्थव्यवस्थाही उभारत आहे.' यावेळी मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान म्हणाले की, 'भारत हे एक प्राचीन, अद्भुत आणि महान राष्ट्र आहे. भारताने जगाला ज्ञानाचा प्रकाश दिला आहे. सभ्यता आणि संस्कृतीत भारताचे स्थान अग्रस्थानी राहिले आहे.'

ते पुढे म्हणाले की, 'आज जागतिक अर्थव्यवस्थेत भारताचे योगदान पूर्वीच्या सरकारांच्या तुलनेत पंतप्रधान मोदींच्या मार्गदर्शनाखाली 9.5 टक्क्यांवर पोहोचले आहे.' 2025 पर्यंत देशाची अर्थव्यवस्था 5,000 अब्ज डॉलर्सपर्यंत पोहोचवण्याचे मोदींनी ठेवलेले लक्ष्य पूर्ण करण्याच्या दिशेनेही मध्य प्रदेशचे प्रयत्न कौतुकास्पद असल्याचे चौहान म्हणाले. चौहान पुढे म्हणाले की, भारत पुन्हा एकदा विश्वगुरुच्या मार्गावर वाटचाल करत आहे. भारताची क्षमता जगाला दिसत आहे. भारत जगातील अनेक देशांमध्ये अन्नधान्य पाठवत आहे.'

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Kendra Drishti Yog 2026: शुक्र-गुरुची गट्टी जमणार, पैसा आणि प्रेम दोन्ही मिळणार! केंद्र दृष्टी योग 'या' 4 राशींसाठी ठरणार वरदान

Goa Politics: 'त्या' वर्तणुकीची जबाबदारी आमदाराची कशी? सरदेसाईंनी माफी मागण्यास दिला नकार; कोळसा मुद्द्यावरुन काब्रालही आक्रमक

RO Water: आर.ओ.चं पाणी खरंच आरोग्यासाठी घातक? तज्ज्ञ डॉक्टरांनी स्पष्टच सांगितलं; अफवांवर विश्वास ठेवण्यापूर्वी जाणून घ्या

Budh Margi 2026: "तुमची स्वप्ने होणार पूर्ण, बुध ग्रहाचा मेगा धमाका'' 21 मार्चपासून 'या' 7 राशींच्या नशिबात मोठा राजयोग

High Court: 'रागाच्या भरात मुलगी बापावर बलात्काराचा आरोप कधीच करणार नाही', जन्मठेपेची शिक्षा कायम ठेवताना हायकोर्टाने ओढले ताशेरे; काय नेमकं प्रकरण?

SCROLL FOR NEXT