RBI News | RBI Increased Repo Rate ANI
अर्थविश्व

RBI ने रेपो दरात केली वाढ, होम-ऑटो कर्जाच्या EMIमध्येही वाढ

RBI ने रेपो दर 4.4 टक्क्यांवरून 4.90 टक्के केला

दैनिक गोमन्तक

RBI गव्हर्नर शक्तीकांत हे चलनविषयक धोरण समितीच्या बैठकीत घेतलेल्या निर्णयांची घोषणा करत आहेत युक्रेन संकटामुळे महागाई वाढल्याचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी सांगितले. मात्र, भारतीय अर्थव्यवस्था सुधारण्याच्या मार्गावर आहे. एमपीसीच्या बैठकीत रेपो दरात 50 बेसिस पॉइंट्सने वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. आता रेपो दर 4.4 टक्क्यांवरून 4.90 टक्के झाला आहे. रेपो रेट वाढल्यामुळे तुमचे गृहकर्ज, वाहन कर्ज ईएमआय वाढणार आहे. (RBI Repo Rate)

बाजाराचा अंदाज आहे की रेपो दर 0.25 टक्क्यांवरून 0.50 टक्क्यांपर्यंत वाढवला जाण्याची शक्यता होती. याशिवाय रोख राखीव प्रमाणही 4.5 टक्क्यांनी वाढवता येऊ शकते असाही अंदाज लावण्यात आला होता. मात्र, रिझर्व्ह बँकेने सीआरआर वाढवू नये, असे बँकांचे म्हणणे आहे. मे महिन्यात रिझर्व्ह बँकेने सीआरआर वाढवला तेव्हा वित्तीय यंत्रणेतून 90 हजार कोटी रुपये कमी झाले. सीआरआर वाढल्याने तरलता कमी होते, त्यामुळे महागाई नियंत्रित होते.

रिझर्व्ह बँकेने आर्थिक वर्ष 2022-23 साठी GDP वाढीचा अंदाज 7.2 टक्के राखून ठेवला आहे. राष्ट्रीय सांख्यिकी कार्यालयाने 31 मे रोजी वाढीची आकडेवारी जाहीर केली. त्यानुसार 2021-22 या आर्थिक वर्षात 8.7 टक्के वाढ झाली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

बागातील 'त्या' प्रकाराबाबत उत्कंठा वाढली! क्राईम ब्रँचकडून गुन्ह्याची नोंद; व्हिडिओतील टोळक्यापर्यंत पोलिस पोहोचले

VIDEO: "नुसते फटके मारुन चालत नाही!" बाबर आझमचा 'स्लो' खेळ अन् 'फास्ट' उत्तर; सोशल मीडियावर फुटले वादाला तोंड

Bihar Food Poisoning: सत्यनारायणाचा प्रसाद ठरला जीवघेणा! मुजफ्फरपूरमध्ये 100 हून अधिक जणांना अन्नातून विषबाधा; एकाच वेळी अख्खं गाव पडलं आजारी

IPL 2026 Points Table : राजस्थानला नमवून SRH चा गुणतालिकेत धमाका! मोठ्या उलटफेरासह टॉप-5 मध्ये एन्ट्री; मुंबई, चेन्नई आणि कोलकाताची अवस्था बिकट

IPL 2026: उष्णतेचा आयपीएल खेळाडूंवर परिणाम; रोहित शर्मा, विराट कोहली यांनाही त्रास; वाढत्या आर्द्रतेचा फटका

SCROLL FOR NEXT