India is favorite country for FDI Dainik Gomantak
अर्थविश्व

देशाच्या अर्थव्यवस्थेसाठी गूड न्यूज; FDI साठी भारत जगात भारी!

डेलॉईटच्या सर्वेक्षणानुसार (deloitte survey), आर्थिक वाढीच्या चांगल्या संधी आणि कुशल कामगारांच्या संख्येमुळे भारत थेट विदेशी गुंतवणुकीसाठी (FDI) आकर्षक केंद्र बनले आहे.

दैनिक गोमन्तक

डेलॉईटच्या सर्वेक्षणानुसार (deloitte survey), आर्थिक वाढीच्या चांगल्या संधी आणि कुशल कामगारांच्या संख्येमुळे भारत थेट विदेशी गुंतवणुकीसाठी (FDI) आकर्षक केंद्र बनले आहे. मंगळवारी प्रसिद्ध झालेल्या सर्वेक्षणाच्या निकालांवरून असे दिसून आले की अनेक आंतरराष्ट्रीय उद्योगपतींना (International Businessmen's) भारताच्या अल्प आणि दीर्घकालीन संभावनांवर विश्वास आहे आणि ते अतिरिक्त गुंतवणूक आणि देशात प्रथमच गुंतवणूक करण्याची योजना आखत आहेत.(India is favorite country for FDI)

‘इंडियाज FDI ऑपर्चूनिटी’ सर्वेक्षणानुसार अमेरिका, यूके, जपान आणि सिंगापूर येथील बहुराष्ट्रीय कंपन्यांच्या 1,200 शीर्ष अधिकाऱ्यांना सर्वेक्षणात गुंतवणुकीबाबतचे प्रश्न विचारण्यात आले. त्यात असे आढळून आले की भारत गुंतवणूकीसाठी एक आकर्षक केंद्र आहे, भारत त्याच्या कुशल कार्यबल आणि उच्च आर्थिक वाढीच्या संभावनांसाठी उच्च गुण मिळवित आहे.

अवाहलात म्हटले आहे की भारत सात भांडवली -केंद्रित क्षेत्र कापड , अन्न प्रक्रिया, इलेक्ट्रॉनिक्स, फार्मास्युटिकल्स, वाहने आणि स्पेअर पार्टस , रसायने आणि भांडवली उत्पादने. या क्षेत्रांनी 2020-21 मध्ये देशाच्या व्यापार निर्यातीसाठी 181 अब्ज डॉलर्सचे योगदान दिले.आणि याचमुळे भारत या क्षेत्रांमध्ये मध्ये अधिक एफडीआय आकर्षित करण्याचे लक्ष्य ठेवू शकतो.

सर्वेक्षणानुसार, या सात क्षेत्रांकडे आवश्यक उत्पन्नचा परिणाम, उत्पादनच्या मोठ्या संधी आणि जागतिक मिसाल स्थापित करण्याची क्षमता आहे. त्यात असे आढळून आले की चीन, ब्राझील, मेक्सिको आणि व्हिएतनाम सारख्या बाजारपेठांच्या तुलनेत अमेरिकेची भारताबद्दल सर्वात सकारात्मक भावना आहे. अमेरिका आणि ब्रिटनमधील उद्योगपतींनी भारताच्या स्थिरतेवर अधिक विश्वास व्यक्त केला आहे.

त्याचबरोबर या सर्वेक्षणात असे दिसून आले आहे की भारतात व्यवसायात सुलभता सुधारण्यासाठी अलीकडील सुधारणा असूनही, गुंतवणूकदारांमध्ये या सुधारणांविषयी कमी जागरूकता आहे. त्यानुसार, चीन आणि व्हिएतनामपेक्षा व्यवसाय करण्यासाठी भारताला अधिक आव्हानात्मक वातावरण मानले गेले आहे.

भारताला राजकीय आणि आर्थिकदृष्ट्या स्थिर मानले जाते, परंतु देशाने संस्थात्मक स्थिरतेच्या श्रेणीत कमी गुण मिळवले, म्हणजे नियामक स्पष्टता आणि कार्यक्षम न्यायिक निवारण आणि यंत्रणा. विद्यमान आणि संभाव्य गुंतवणूकदारांनी नोंदवलेला अपुरा पायाभूत सुविधा हा आणखी एक नकारात्मक घटक असल्याचेही त्यात म्हटले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

IND vs ENG: रोहित-विराटला जमलं नाही ते शुभमन गिल करुन दाखवणार, ओव्हलवर इतिहास रचण्याची संधी; पहिल्यांदाच घडणार 'हा' पराक्रम

मुख्यमंत्र्यांनी करुन दाखवलं, ग्रामसेवकावर Strict Action; सरदेसाईंकडून प्रमोद सावंतांचे कौतुक, रायच्या 'सायको' सचिवाचीही केली तक्रार

Valpoi News: पुलावरून घेतली उडी, स्थानिकांच्या धाडसामुळे वाचले प्राण; वाळपईत आत्महत्येचा प्रयत्न

Goa Assembly: 'भाजपशासित प्रदेशात अल्पसंख्यांकांना धोका' आलेमाव आक्रमक; 'इतरांची उदाहरणं देऊ नका' मुख्यमंत्र्यांचा पलटवार

Viral: देशाचं नाव खराब होतंय... विदेशी महिलेसोबत तरूणांकडून सेल्फीचा बहाणा, पुढे जे घडलं ते संतापजनक! पाहा VIDEO

SCROLL FOR NEXT