पणजी: गोव्यात सोमवार (दि. २४ मार्च) अर्थसंकल्पीय अधिवेशनाला सुरुवात झालीये. पहिल्या दिवशी म्हणजेच झिरो आवरच्या वेळी सत्ताधारी पक्ष तसेच विरोधी पक्षांमध्ये अनेक मुद्यांवरून वादविवाद झाले. यावेळी गोवा फॉरवड पक्षाचे प्रमुख विजय सरदेसाई यांनी गोव्यात जातींची गणना व्हावी अशी मागणी केली.
बहुजन समाज त्यांच्या सामाजिक, आर्थिक आणि राजकीय हक्कांपासून वंचित आहे आणि त्यांना त्यांचा अधिकार मिळालाच पाहिजे असं म्हणत "मला सरकारकडून खात्री हवी आहे" असा जोर त्यांनी धरला होता.
गोव्यात ओबीसीच्या अंतर्गत १९ जातींचा समावेश आहे, यात भंडारी समाजाचा देखील समावेश आहे. गोव्यातील जवळपास अर्धी जनसंख्या ही या ओबीसी वर्गातील आहे. राज्यात जातीय गणना वर्ष २०११ मध्ये झाली होती. आता बराच काळ उलटून गेला असल्याने सरकारने पुन्हा एकदा जनगणनेचा विचार केला पाहिजे. यानंतर मुख्यमंत्री आणि सरदेसाई यांच्यात काहीशी बाचाबाची झाली. सरदाइसाई म्हणाले की, "मी ओबीसी नाही मी त्या लोकांसाठी मागणी करतोय" मात्र यावर शेवटी मुख्यमंत्री फक्त ‘नोटेड’ असं म्हणाले त्यांनी कोणतीही ठोस खात्री दिलेली नाही.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.