डिचोली: आमठाणे धरणावरील ‘गेट’चे काम सध्या युद्धपातळीवर सुरू असून चालू जुलै महिन्याच्या अखेरपर्यंत ‘आमठाणे’तील जलसाठा पूर्वपदावर आणण्यासाठी जलसंपदा खात्याचे जोरदार प्रयत्न चालू आहेत. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनीही तशी शक्यता व्यक्त करताना ‘आमठाणे’बाबत चिंता करण्याचे कारण नाही, असे म्हटले. कामानिमित्त आमठाणे धरणावर यंदा वर्षा पर्यटनाचे चित्र आढळून येत नाही.
मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत हे सोमवारी मेणकूरे येथे आले होते. त्यावेळी आमठाणेहून मेणकूरेला जाताना मुख्यमंत्र्यांनी आमठाणे धरणाची धावती पाहणी करून, कंत्राटदाराकडून सध्याच्या कामाचा आढावा घेतला. जनतेने आमठाणेबाबत चिंता करण्याची गरज नाही, असे मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी मेणकूरे येथील कार्यक्रमात बोलताना सांगून, पुढील आठ-दहा दिवसात गेटीचे काम पूर्ण होणार असून, नंतर धरणात पाणी साठवण्यात येणार आहे. सतत पाऊस पडल्यास हे धरण लवकर भरणार.असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. धरणावरील दुरुस्तीचे काम चालू जुलैपर्यंत पूर्ण होणार आहे, असे जलसंपदा खात्याचे मंत्री सुभाष शिरोडकर यांनी गेल्याच आठवड्यात स्पष्ट केले आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.