HBD Suman Kalyanpur: 'ऐ मेरे वतन के लोगो' सुमन कल्याणपूर यांच्याकडून काढुन घेण्यात आलं होतं?

एक अत्यंत मधुर गळा लाभलेला असुनही तेवढं यश न मिळालेल्या सुमन कल्याणपूर यांची ही वेदनादायी कहाणी....
Suman Kalyanpur
Suman Kalyanpur Dainik Gomantak

why didn't suman Kalyanpur get ae Mere Watan Ke Logo? प्रसिद्ध गायिका सुमन कल्याणपूर(Suman Kalyanpur) यांचा आज वाढदिवस आहे. त्यांनी आपल्या सुरेल आवाजाने अनेक सुपरहिट गाणी दिली आहेत. मराठी आणि हिंदी चित्रपट संगीतातलं त्यांचं योगदान नक्कीच कौतुकास्पद असंच आहे. आज जाणुन घेऊया त्यांच्या लाईफचा एक किस्सा ज्याने इतिहास घडवून गेलेलं हे गाणं त्यांना मिळू शकलं नाही.

आजवर सुमनजीनी गायलेल्या गाण्यांमध्ये 'ना तुम जानो ना हम', 'दिल गम से जल रहा है', 'मेरे संग गा', 'मेरे मेहबूब ना जा', 'जो हम पे गुजराती है', 'बेहना ने भाई की कलाई में' या गाण्यांचा समावेश होता. या गाण्यात 'नावीका रे वारा वाहे रे' या प्रचंड गोडवा लाभलेल्या गाण्याचाही समावेश आहे.

लता मंगेशकर (Lata Mangeshkar) यांनी गायलेले 'आये मेरे वतन के लोगों' हे गाणं आधी सुमन कल्याणपूर यांनी गायले होते. याचा खुलासा स्वतः सुमनजींनीच केला आहे. सुमन कल्याणपूर यांचा जन्म 28 जानेवारी 1937 रोजी ढाका (तत्कालीन भारताचा भाग) येथे सेंट्रल बँक ऑफ इंडियाचे प्रमुख शंकर राव हेमाडी यांच्या पोटी झाला. सुमनजी त्यांचं पहिलंच अपत्य होत्या.

शंकर बाबू आणि त्यांची पत्नी सीता यांनी त्यांच्या मुलीचे नाव 'सुमन' ठेवले. शंकर बाबूंना पाच मुलं होती. मुलांना चांगले शिक्षण देण्याचे स्वप्न घेऊन शंकर बाबू 1943 मध्ये कुटुंबासह मुंबईत आले. 

सुमन यांचा लहानपणापासूनच चित्रकला आणि संगीताकडे ओढा होता. त्यांनी कला शाखेत पदवीही पूर्ण केली. सुमनजीना चित्रकार व्हायचे होते, पण तिच्या वडिलांचे मित्र पंडित केशव राव यांना तिच्या मधुर आवाजाची कल्पना आली.

ही मुलगी उत्तम गायीका होऊ शकते हे त्यांच्या लक्षात आलं . त्यांनी सुमनजींच्या वडिलांना संगीत शिकवायला सांगितले. आणि मग सुरू झाला सुमनजींच्या संगीताचा सराव.

सुमन कल्याणपूर या सुरुवातीला हौशी म्हणून संगीत शिकत होत्या, पण कालांतराने तिची आवड वाढू लागली. सुमनने त्यांचे गुरू यशवंत देव यांच्याकडून संगीताचे शिक्षण घेतले. त्यांनीच तिला 'शुक्राची चांदणी' या मराठी चित्रपटात पहिल्यांदा गाण्याची संधी दिली.

 मात्र, ते चित्रपटात येऊ शकले नाही. पण, संगीतकार मोहम्मद शफी यांनी सुमनला 'मंगू' (1954) चित्रपटात गाण्याची संधी दिली. त्यावेळी सुमन फक्त 17 वर्षांची होती. 

या सगळ्यानंतर परिस्थिती अशी बनली की चित्रपटात सुमनचे एकच गाणे ठेवण्यात आले - 'कोई पुकारे धीरे से तुझे'. त्याच वर्षी सुमनला संगीतकार नौशाद यांच्या दिग्दर्शनाखालील 'दरवाजा' चित्रपटात पाच गाणी गाण्याची संधी मिळाली, त्यानंतर सुमनजींनी इंडस्ट्रीत आपले पाय घट्ट रोवले. मात्र, 'ऐ मेरे वतन के लोगों' गाता येत नसल्याची खंत त्यांना अजूनही आहे.

एका मुलाखतीदरम्यान सुमन कल्याणपूर यांनीच 'ए मेरे वतन के लोगो' या गाण्याबाबत मोठा खुलासा केला होता. त्यांनी सांगितले की, 'मला पंडित जवाहरलाल नेहरूंसमोर हे गाणे गाण्यासाठी बोलावण्यात आले होते, रिहर्सलही झाली होती, पण मी स्टेजवर पोहोचताच मला या गाण्याऐवजी दुसरे गाणे गाण्यास सांगण्यात आले.

Suman Kalyanpur
Pawan Kalyan: पवन कल्याण विवाहित असुनही या अभिनेत्रीच्या प्रेमात झाला होता वेडा..पण दुसरे लग्नही टिकले नाही...

' हे गाणे त्यांच्याकडून का हिसकावले गेले हे अद्याप कळले नसल्याचेही कल्याणपूर यांनी सांगितले. पंडित नेहरूंसमोर 'ए मेरे वतन के लोगो' गाण्याची संधी मिळाली तेव्हा आनंदाला थारा नाही, असे गायक म्हणाले होते. पण कार्यक्रमादरम्यान गाणे गाण्यासाठी मी स्टेजजवळ पोहोचल्यावर मला थांबवण्यात आले आणि या गाण्याऐवजी दुसरे गाणे गाण्यास सांगितले. 

हे गाणे माझ्याकडून हिरावले गेले, हा माझ्यासाठी मोठा धक्का होता. ती गोष्ट आजही डळमळते. सुमन कल्याणपूर यांना नुकतेच कला क्षेत्रातील योगदानाबद्दल पद्म पुरस्कार देण्याची घोषणा करण्यात आली आहे. आज त्यांना पद्म पुरस्कार मिळाला तरी त्यांच्यासाठी आयुष्यातली सगळ्यात मोठी खंत राहणारच

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com