The Kerala Story : विरोधानंतरही केरळ स्टोरीच्या कलाकारांनी पुण्यात प्रेक्षकांशी साधला संवाद...

गेले काही दिवस केरळ स्टोरी या चित्रपटाला पुण्यातही विरोध झाला यानंतर चित्रपटाच्या टीमने प्रेक्षकांशी संवाद साधला..
The Kerala Story
The Kerala StoryDainik Gomantak

द केरळ स्टोरी हा सुदिप्तो सेन दिग्दर्शित चित्रपट एका बाजूला बॉक्स ऑफिसवर तुफान कमाई करत असताना दुसरीकडे चित्रपटाचे कलाकार प्रेक्षकांशी संवाद साधत आहेत. असाच एक संवाद रविवारी म्हणजेच 21 मे रोजी पुण्यात पार पडला.

'द केरल स्टोरी' रिलीज झाल्यापासूनच प्रेक्षकांच्या मनात आणि बॉक्स ऑफिसवर छाप पाडत आहे. रिलीजच्या तीन आठवड्यात या चित्रपटाने 200 कोटींचा टप्पा ओलांडला आहे.

प्रेक्षक या चित्रपटाला मनापासून पाठिंबा देत असून, निर्माते विपुल अमृतलाल शाह चित्रपटासाठी कठोर मेहनत घेत आहेत. ते सतत लोकांना भेटून आणि चित्रपटाबद्दल त्यांची मते मांडून त्यांच्यासाठी स्क्रीनिंगची व्यवस्था करत आहेत.

पुण्यात झाला संवाद

काल रविवारी चित्रपट निर्माते विपुल शाह, दिग्दर्शक सुदिप्तो सेन आणि अभिनेत्री अदा शर्मा पुण्यात आले आणि त्यांनी दिवसभरात आयोजित सहा विविध उपक्रमांमधून प्रेक्षकांशी संवाद साधला. यावेळी चित्रपटाच्या विषयाचं गांभीर्य प्रेक्षकांना समजावण्यात आलं.

FTII च्या विद्यार्थ्यांचा विरोध

मात्र, पुणे फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया (एफटीआयआय) च्या विद्यार्थ्यांमध्ये 'द केरल स्टोरी' या चित्रपटाबाबत वाद निर्माण झाला असून, एफटीआयआयच्या एका गटाने चित्रपटाच्या समर्थनार्थ तर दुसऱ्या गटाने चित्रपटाला विरोध केला.

वाढता तणाव आणि चित्रपटसृष्टीतील व्यक्तींच्या आगमनाची माहिती मिळताच सुमारे दीडशे पोलिसांचा बंदोबस्त करून सुरक्षा व्यवस्था कडक करण्यात आली आणि त्यांच्या उपस्थितीत चित्रपटाचे प्रदर्शन पार पडले..

शालेय विद्यार्थीनींसाठी स्क्रिनींग

पुण्यातील महर्षी कर्वे विद्यालयात शिकणाऱ्या हजारो विद्यार्थिनींसाठी स्क्रिनिंग आयोजित करण्यात आले होते, जेणेकरून तरुणींची दिशाभूल कशी होते आणि मुलींची दिशाभूल झाल्यानंतर त्यांना कोणत्या प्रसंगांना आणि परिस्थितींना सामोरे जावे लागते, हे चित्रपटाच्या माध्यमातून समजावे असा यामागे दृष्टीकोन होता

राम गोपाल वर्मांकडून द केरळ स्टोरीचं कौतुक

राम गोपाल वर्मा हे त्यांच्या धारदार ट्विटसाठी आणि जवळपास प्रत्येक मुद्द्यावर त्यांच्या मतासाठी ओळखले जातात. त्यांनी 'रंगीला', 'सत्या', 'शूल', 'कंपनी' असे अनेक हिट सिनेमे केले आहेत. 

अनेक अभिनेत्यांना असेही वाटते की त्यांनी हिंदी चित्रपटसृष्टीची अनेक प्रकारे व्याख्या बदलली आहे. आत्तापर्यंत, त्यांनी चित्रपट दिग्दर्शित करुन बनवून बराच काळ लोटला आहे, परंतु अलीकडे ते मुख्य प्रवाहातील बॉलीवूडवर टीका करताना आणि 'द केरळ स्टोरी' चं कौतुक करताना दिसले.

The Kerala Story
Salman Khan New Business : बॉलिवूडचा हा सुपरस्टार मुंबईत बांधतोय हॉटेल...

"हा तर बॉलिवूडचा आरसा !"

राम गोपाल वर्मा पुढे म्हणाले की, हा बॉलिवूडच्या मुख्य प्रवाहाचा आरसा आहेम, "#KeralaStory ही एक सुंदर भुताच्या आरशासारखी आहे, जी मुख्य प्रवाहातील बॉलीवूडचा मृत चेहरा त्याच्या सर्व कुरूपतेसह दाखवतो." येत्या काही वर्षांत हा चित्रपट अनेकांना त्रास देईल, ते पुढे म्हणाले, "#KeralaStory बॉलीवूडमधील प्रत्येक कथा डिस्कशन हॉल आणि कॉर्पोरेट हाऊसमध्ये एका रहस्यमय धुक्याप्रमाणे कायम राहील.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com