Dhanush ऐश्वर्याचं लग्न वाचवण्यासाठी Rajinikanth यांचा पुढाकार, दोघांच नातं पूर्ववत होणार का?

दोघांमधील मतभेद दूर व्हावे यासाठी खुद्द रजनीकांत परिश्रम घेत आहेत.
Dhanush, Rajinikanth
Dhanush, Rajinikanth Dainik Gomantak
Published on
Updated on

साऊथचा सुपरस्टार धनुष आणि रजनीकांत यांची मुलगी ऐश्वर्या यांनी घटस्फोट घेऊन विभक्त होण्याचा निर्णय घेतला. काही दिवस उलटल्यानंतर दोघेजण पुन्हा एकत्र येण्याच्या चर्चांना उधाण आले आहे. पण, पती-पत्नीने या संबधित प्रसारित होणाऱ्या बातम्या निव्वळ अफवा असल्याचे म्हटले आहे. धनुष आणि ऐश्वर्या यांचे नाते पूर्ववत होण्यासाठी आता खुद्द रजनीकांत यांनी पुढाकार घेतल्याची माहिती समोर आली आहे.

धनुष आणि ऐश्वर्या यांना एकत्र आणण्यासाठी सुपरस्टार रजनीकांत प्रयत्नशील आहेत. रजनीकांत दोघांच्या कुटुंबीयांना समजवण्यासाठी सध्या धडपडत आहेत. रजनीकांत धनुषचे सासरे असल्याने दोघांचे नाते टिकावे अशी त्यांची इच्छा आहे. त्यामुळेच रजनीकांत यांनी धनुष आणि ऐश्वर्या यांची दोनवेळा भेट घेतली. दोघांमधील मतभेद दूर व्हावे यासाठी खुद्द रजनीकांत परिश्रम घेत आहेत.

Dhanush, Rajinikanth
Rakhi Sawant: साजिद खानच्या मदतीला धावली राखी सावंत

धनुष आणि ऐश्वर्याने या वर्षाच्या सुरुवातीला सोशल मीडियावर द्वारे वेगळे होण्याची घोषणा केली. तसेच, दोघांनी त्यांच्या गोपनीयतेचा आदर करण्याची विनंती केली. 'आमचा 18 वर्षांचा प्रवास समजूतदारपणाचा होता. पण, आज आमचे मार्ग वेगळे आहेत. ऐश्वर्या आणि मी वेगळे होण्याचा निर्णय घेतला आहे. कृपया आमच्या निर्णयाचा आदर करा.' असे धनुषने आपल्या सोशल मिडियावर लिहिले आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com