काश्मिरी पंडितांच्या मागे महाराष्ट्र ठामपणे उभा राहील : मुख्यमंत्री ठाकरे

महाराष्ट्राने कश्मिरी पंडितांसोबत कायमच संवेदनशील नाते जपले आहे : उद्धव ठाकरे
Uddhav Thackeray
Uddhav Thackeray Dainik Gomantak

मागील काही दिवसांपासून काश्मीरमध्ये काश्मिरी पंडितांच्या हत्येचे प्रकार घडले आहेत. परिणामी अनेक काश्मिरी पंडितांचे पलायन सुरू झाले आहे. अनेक राजकीय नेत्यांनी यावर प्रतिक्रिया दिली आहे. (Uddhav Thackeray Kashmiri Pandit)

Uddhav Thackeray
महाराष्ट्रात सार्वजनिक ठिकाणी मास्क अनिवार्य

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी देखील खोऱ्यातील या परिस्थितीबाबत चिंता व्यक्त केली. ते म्हणाले, “कश्मीर खोऱ्यात कश्मिरी पंडितांचे अक्षरश: शिरकाण सुरू आहे. त्यांना घरवापसीची स्वप्ने दाखविली गेली, पण घरवापसी तर दूरच उलट तेथील पंडितांना वेचून वेचून मारले जात आहे. या भयानक परिस्थितीत पंडितांचे मोठ्या प्रमाणावर पलायन सुरू झाले, ही धक्कादायक तितकीच अस्वस्थ करणारी घटना आहे. याक्षणी शिवसेना पक्षप्रमुख आणि महाराष्ट्राचा मुख्यमंत्री म्हणून मी इतकंच वचन देऊ शकतो की, या कठीण काळात काश्मिरी पंडितांच्या मागे महाराष्ट्र ठामपणे उभा राहील.”

ठाकरे पुढे म्हणाले, "महाराष्ट्राने कश्मिरी पंडितांसोबत कायमच संवेदनशील नाते जपले आहे."
केंद्र सरकारने परिस्थितीचा आढावा घेऊन काश्मिरी पंडितांना संरक्षण द्यावे, अशी मागणी देशभरातून होत आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com