अमित शाहांच्या 'त्या' व्यक्तव्यावर संजय राऊतांचा घणाघात...

राजीनामा कशाला ? तुम्ही समोर येऊन लढा.
संजय राऊत

संजय राऊत

Dainik Gomantak 

Published on
Updated on

अमित शाह (Amit Shah) यांचा दोन दिवशीय महाराष्ट्र दौरा होते. दौऱ्यादरम्यान अमित शाह यांनी ठाकरे सरकारवर व्यक्तव्य केले होते. यावर संजय राऊत म्हणाले, अमित शाहांच व्यक्तव्य चुकीचे आहे. हिंदुवत्वाला आम्ही कधीच सोडले नाही.

शिवसेनेचे नेते संजय राऊत (Sanjay Raut) यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या टीकेला प्रत्युत्तर आज दिले. अमित शाह यांचे वक्तव्य खोटे आहे. ठाकरे सरकारविरोधात, शिवसेनेबद्दल, हिंदूत्वाबद्दल बोलू नये. असे खोटे बोलून राज्यातील जनतेला भ्रमित करण्याचा प्रयत्न भाजप नेते करत गेल्या दोन वर्षांपासून करत आहेत. त्यातच भाजपमधील (BJP) केंद्रीय नेते देखील वैफल्यातून तशीच भाषा करत आहेत. असेही राऊत यांनी म्हटले.

2014 साली आमचा पक्ष हा एकट्याने च लढला होता. 2014 पासून हिंदुत्ववादी म्हणून कोणी फसवले हे पहावे. महाराष्ट्रातील नेत्यांसह केंद्रातील नेतेही चुकीचे व्यक्तव्य करत सुटले आहे.

<div class="paragraphs"><p>संजय राऊत</p></div>
केंद्रीय मंत्री अमित शाह महाराष्ट्र दौऱ्यावर

पुढे बोलताना ते म्हणाले, CBI, ED चिलखते घालून महाराराष्ट्रात हे लोक फिरत आहे. केंद्राने खूप प्रयत्न करून महाराष्ट्रामध्ये काहीही बदल करता आले नाही.

शिवसेना (shivsena) पक्ष छातीवर वार झेलणारी आहे. राजीनामा कशाला ? तुम्ही समोर येऊन लढा. पुण्यात येऊन आम्हाला शिकवू नका. ही छत्रपती शिवाजी महाराजांची (Chhatrapati Shivaji Maharaj) भूमी आहे. येथे महाराजांनी सोन्याने नांगर फिरवले आहेत. 105 आमदारांनी राजीनामा द्यावा आणि नंतर त्यांनी निवडून दाखवावे. असे संजय राऊत म्हणाले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com