Mumbai Goa Highway: मुंबई गोवा महामार्गसाठी 'महायज्ञ'; कोकणवासीयांनी लावली हजेरी

Mumbai Goa Highway: कोकणात गेल्या काही दिवसांपासून जोरदार पाऊस पडत आहे. सातत्याने पडणाऱ्या पावसामुळे जनजीवन पुरते विस्कळीत झाले आहे.
Mumbai Goa Highway: मुंबई गोवा महामार्गसाठी 'महायज्ञ'; कोकणवासीयांनी लावली हजेरी
Mumbai Goa HighwayDainik Gomantak
Published on
Updated on

कोकणात गेल्या काही दिवसांपासून जोरदार पाऊस पडत आहे. सातत्याने पडणाऱ्या पावसामुळे जनजीवन पुरते विस्कळीत झाले आहे. तर दुसरीकडे, मुंबई-गोवा महामार्गावरुन प्रवास करणाऱ्यांनाही मोठ्या त्रासाचा सामना करावा लागत आहे. कोकणात जाणारा एकमेव महत्त्वपूर्ण मार्ग म्हणजे मुंबई-गोवा महामार्ग...

मात्र आता हाच महामार्ग कोकणवासीयांसाठी त्रासदायक ठरत आहे. गेल्या 12 वर्षांपासून या महामार्गाच्या रुंदीकरणाचे काम सुरु आहे. त्यातच पावसाळा सुरु होताच हा महामार्ग खड्डे आणि चिखलानं भरुन गेलाय. त्यामुळे या महामार्गावरुन प्रवास करणं जिकरीचं बनलं आहे.

याचदरम्यान, या महामार्गाचे काम पूर्ण व्हावे यासाठी कोकणवासीयांनी शेवटचा पर्याय अवलंबला आहे. हा महामार्ग लवकरात लवकर पूर्ण व्हावा यासाठी महायज्ञ करण्यात आला आहे.

दरम्यान, गेल्या 12 वर्षांपासून या महामार्गाचे काम रखडलेले आहे. या महामार्गाला आलेली अवकळा दूर करण्यासाठी जन आक्रोश समितीच्या वतीने माणगाव येथे महायज्ञ करण्यात आला.

महामार्गाचे दुष्ट चक्र लवकरात लवकर संपावे आणि त्यासाठी प्रशासनाला सदबुद्धी यावी, चांगला ठेकेदार मिळावा यासाठी आता देवाकडे साकडे घालण्यात आले आहे. माणगावच्या बस स्थानक परिसरात हा यज्ञ करण्यात आला. या यज्ञासाठी शेकडो कोकणवासी सहभागी झाले होते.

Mumbai Goa Highway: मुंबई गोवा महामार्गसाठी 'महायज्ञ'; कोकणवासीयांनी लावली हजेरी
Mumbai Goa Highway: मुंबई-गोवा महामार्गाची किती पाहणी करणार? सरकारच्या उदासीनेतर कोकणवासीयांचा सवाल

दुसरीकडे, पावसाळ्यातही मुंबई-गोवा महामार्गावरील (Mumbai Goa Highway) खड्ड्याचं दुष्टचक्र कायम आहे. महामार्गावर मोठे खड्डे पडले आहे. त्यामुळे प्रवास करताना मोठ्या त्रासाचा सामना करावा लागतो. महामार्गावरील खड्डे बुजवण्यासाठी पेव्हर ब्लॉकचा मुलामा दिला जातो.

Mumbai Goa Highway: मुंबई गोवा महामार्गसाठी 'महायज्ञ'; कोकणवासीयांनी लावली हजेरी
Mumbai Goa Highway: मुंबई गोवा महामार्ग नितीन गडकरी, भाजपवर लागलेला काळा डाग; सोशल मिडियावर नेटकऱ्यांचा संताप

दरम्यान, महामार्गाचे अर्धवट बांधकाम करणाऱ्या ठेकेदारांवर कारवाईचा बडगा उगारण्यात आलाय. खुद्द केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी यासंबंधी आदेश दिलेत. गेल्या काही दिवसांपासून पुन्हा एकदा महामार्गावरील अर्धवट पुलांचा प्रश्न ऐरणीवर आलाय.

रत्नागिरी-सिंधुदुर्गमधील तब्बल 12 पुलांची कामे ठप्प आहेत. अंजणारी, वशिष्ठी, जगबुडी, शास्त्री, वाकडे पुलांची कामं अर्धवट स्थितीत आहेत. त्यामुळे ठेकेदारावर कारवाई करण्याचे आदेश गडकरींनी दिले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com