Wasim Jaffer: तीन स्पिनर, एक ऑलराउंडर अन् पहिल्यांदा... चंद्राचा पृष्ठभाग पाहून वसीम जाफरने बनवला पिच रिपोर्ट

chandrayaan 3: चंद्राच्या पृष्ठभागाकडे पाहून वसीम जाफरने साजेसा संघ निवडला आहे. तसेच त्याचा पिच रिपोर्ट वाचून चाहते तो एन्जॉय करत आहेत.
Wasim Jaffer Made A Pitch Report After Seeing The Surface Of The Moon.
Wasim Jaffer Made A Pitch Report After Seeing The Surface Of The Moon.Dainik Gomantak
Published on
Updated on

Wasim Jaffer Made A Pitch Report After Seeing The Surface Of The Moon:

भारताचा माजी क्रिकेटपटू वसीम जाफर सोशल मीडियावर चांगलाच सक्रिय आहे आणि तो त्याच्या मजेशीर पोस्टसाठी प्रसिद्ध आहे. जाफरने पुन्हा एकदा ट्विटरवर मजेशीर पोस्ट शेअर केली आहे. त्याने चंद्राचा पृष्ठभाग पाहून पिच रिपोर्ट आणि आपली टीम बनवली आहे. जाफरची ही पोस्ट चाहते खूप एन्जॉय करत आहेत.

वसीम जाफरने सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ट्विटरवर चंद्राच्या पृष्ठभागाचे छायाचित्र पोस्ट केले आणि लिहिले "नक्कीच, याकडे पाहून असे वाटते हे पिच प्रथम फलंदाजीसाठी योग्य आहे. मी तीन फिरकी गोलंदाज, एक वेगवान गोलंदाज आणि अष्टपैलू खेळाडूंसोबत मैदानात उतरेन."

दरम्यान, चंद्राच्या पृष्ठभागाचा फोटो शेअर करत वसीम जाफरने आपल्या टीम निवडीनंतर आणि पिच रिपोर्टही बनवल्याने. जाफरने केलेल्या ट्विटला क्रिकेट चाहते भरभरुन प्रतिसाद देत आहेत.

Wasim Jaffer Made A Pitch Report After Seeing The Surface Of The Moon.
Team India: भारतीय क्रिकेटर्ससाठी आशिया कप-वर्ल्डकपची परीक्षा सोपी नाही! BCCI घेणार फिटनेस टेस्ट

भारताच्या इस्रोने बुधवारी आपले चांद्रयान 3 (chandrayaan 3) चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर यशस्वीरित्या उतरवले. यासह चंद्रावर रोव्हर उतरवणारा भारत हा जगातील चौथा देश ठरला आहे. भारतापूर्वी अमेरिका, रशिया आणि चीनने हे केले आहे.

भारत हा जगातील पहिला देश आहे ज्याने चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर आपले रोव्हर पाठवले आहे. शास्त्रज्ञांच्या मते, चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर पाण्याचा प्रचंड साठा असू शकतो. चंद्राचा हा भाग नेहमीच शास्त्रज्ञांच्या आवडीचा विषय राहिला आहे.

Wasim Jaffer Made A Pitch Report After Seeing The Surface Of The Moon.
न्यूझीलंडची World Cup 2023 ची जय्यत तयारी! CSK ला 5 वेळा विजेता बनवणाऱ्या शिलेदाराला दिली मोठी जबाबदारी

भारताच्या इस्रोने यापूर्वी 2019 मध्ये देखील चांद्रयान पाठवले होते, परंतु त्यानंतर भारताला यश मिळाले नाही. आता चार वर्षांनंतर भारताने चंद्रावर यशस्वीरित्या चांद्रयान उतरवले आहे.

यापूर्वी, इस्रोच्या शास्त्रज्ञांचे छायाचित्र शेअर करताना जाफरने त्यांचे कौतुक केले होते आणि म्हणाला होता की, जे लोक आपल्याला चंद्रावर घेऊन जातात ते जमिनीशी जोडले जाऊ शकतात. हे आपल्या संस्कृतीचे वैशिष्ट्य आहे.

चांद्रयानच्या यशस्वी लँडिंगवर जाफरने लिहिले की, भारत चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर पोहोचणारा पहिला देश बनला आहे. ही आपल्या सर्वांसाठी अभिमानाची बाब आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com