T20 World Cup 2021: विराट कोहलीचा चाहत्यांसाठी भावनिक संदेश

ICC पुरुष T20 विश्वचषक 2021 च्या 'सुपर 12' सामन्यांमधून भारतीय संघाबाहेर (Indian Team) गेल्याने विराट कोहली (Virat Kohli) खूपच निराश झाला आहे.
Virat Kohli gave emotional statement
Virat Kohli gave emotional statementDainik Gomantak
Published on
Updated on

ICC पुरुष T20 विश्वचषक 2021 (ICC Men's T20 World Cup 2021)च्या 'सुपर 12' सामन्यांमधून भारतीय संघाबाहेर (Indian Team) गेल्याने विराट कोहली (Virat Kohli) खूपच निराश झाला आहे. खरे तर भारतीय संघाने या मोठ्या स्पर्धेतील सुरुवातीचे दोन्ही सामने गमावले. यानंतर विराट सेनेने आपल्या त्यानंतरच्या तीन सामन्यांमध्ये चांगली कामगिरी करत स्पर्धेत पुनरागमन करण्याचा सर्वतोपरी प्रयत्न केला, मात्र उपांत्य फेरीसाठी तो पात्र ठरू शकला नाही. याचा परिणाम टीम इंडियाला पहिल्या टप्प्यातून बाहेर व्हावे लागले.

सामना संपल्यानंतर विराट कोहलीने अतिशय भावूक होऊन ट्विटमध्ये लिहिले की, 'आम्हाला एकत्र लक्ष्य गाठायचे आहे. दुर्दैवाने तसे करण्यात अपयश आले. एक संघ म्हणून आमच्यापेक्षा क्वचितच कोणी निराश होईल. तुम्ही लोकांनी आम्हाला खूप पाठिंबा दिला आहे, यासाठी आम्ही तुमचे ऋणी आहोत. आपले पुढचे ध्येय हे आहे की परत मजबूत होणे आणि खंबीर पावले टाकून पुढे जाणे. जय हिंद!'

Virat Kohli gave emotional statement
T20 World Cup 2021: टीम इंडियाची विजयी सांगता !

आम्‍ही तुम्‍हाला सांगूया की टी-20 विश्‍वचषक 2021 च्‍या सेमीफायनलमध्‍ये पोहोचणारे संघ अ गटातील इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया आहेत. दुसरीकडे, शेजारी देश पाकिस्तान आणि न्यूझीलंड हे ब गटातून उपांत्य फेरीसाठी पात्र ठरले आहे.

2021 च्या T20 विश्वचषक स्पर्धेत टीम इंडियाने एकूण पाच सामने खेळले. यादरम्यान संघाला तीन विजय आणि दोन पराभव पत्करावे लागले. भारतीय संघाने अफगाणिस्तान, स्कॉटलंड आणि नामिबियाविरुद्ध विजय मिळवला, तर संघाने अनुक्रमे पाकिस्तान आणि न्यूझीलंडविरुद्ध सुरुवातीचे दोन सामने गमावले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com